शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

यंदा विवाह साेहळे झाले शाॅर्टकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

२०० ते ३०० किंवा जास्तीत जास्त ४००  लाेकांच्या उपस्थितीत यावर्षी विवाह कार्य पार पाडण्यावर कुटुंबिय भर देणार आहेत. दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात एका मंगल कार्यालयाकडे २० ते २५ लग्न कार्यालयाच्या बुकींग राहत हाेत्या. मात्र यावर्षी त्याची संख्या निम्म्याच्या खाली आहे. लग्न कार्य म्हटले की, बॅन्ड, संदल, फेटे, घाेडा आदीसह विविध प्रकारचा तामझाम राहत असताे. सधन लाेक विवाह कार्यावर लाखाे रुपये खर्च करतात.

ठळक मुद्देअनेकांनी केली बुकींग : डिसेंबर व जानेवारीत माेठ्या प्रमाणात मुहूर्त

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना महामारीने शासकीय नाेकरदार वगळता इतर बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे जुळलेले उपवर-वधूचे विवाह साेहळे कमी लाेकांच्या उपस्थितीत शाॅर्ट बट स्विट पद्धतीने पार पडणार आहेत. तशी माहिती मंगल कार्यालयाचे संचालक व वर-वधू कुटुंबांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. २०० ते ३०० किंवा जास्तीत जास्त ४००  लाेकांच्या उपस्थितीत यावर्षी विवाह कार्य पार पाडण्यावर कुटुंबिय भर देणार आहेत. दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात एका मंगल कार्यालयाकडे २० ते २५ लग्न कार्यालयाच्या बुकींग राहत हाेत्या. मात्र यावर्षी त्याची संख्या निम्म्याच्या खाली आहे. लग्न कार्य म्हटले की, बॅन्ड, संदल, फेटे, घाेडा आदीसह विविध प्रकारचा तामझाम राहत असताे. सधन लाेक विवाह कार्यावर लाखाे रुपये खर्च करतात. आपल्या आर्थिक ऐपतीनुसार प्रत्येकजण लग्न साेहळे पार पाड पाडताे. मात्र यावर्षी काेराेना संसर्गामुळे श्रीमंत, गरीब, सामान्य व सर्वच कुटुंबांसाठी विवाह साेहळे मर्यादित स्वरूपाचे झाले आहेत. काेराेनामुळे या कार्यातील अनेकांचा राेजगार हिरावला आहे.  

तुळशी विवाहानंतर बार उडणार७ डिसेंबरपासून तुळशी विवाहास प्रारंभ हाेत आहे. साधारणत: तुळशी विवाहानंतरच उपवर-वधूवरांचे विवाह कार्य संपन्न करण्यावर कुटुंबिय भर देतात. नाेव्हेंबर महिन्यात फारसे विवाह साेहळे पार पडणार नाहीत. मात्र (तुळशी विवाह)  डिसेंबर महिन्यापासून लग्न कार्याला वेग येणार आहे. मर्यादित लाेकांच्या उपस्थितीत लग्न साेहळे पार पडणार आहेत. 

एप्रिल, मे मध्ये सर्वाधिक मुहूर्तसन २०२१ मध्ये नवीन वर्षात विवाहासाठीचे सर्वाधिक मुहूर्त एप्रिल व मे महिन्यात आहे. एप्रिल महिन्यातील विवाहासाठी मुहूर्ताच्या तारखा २२, २४, २६, २७, २८, २९, ३० अशा आहेत. एप्रिल महिन्यात सात तारखा आहेत. मे महिन्यात १६ मुहूर्त आहेत. यामध्ये १, २, ७, ८, ९, १३, १४, २१, २२, २३, २४, २६, २८, २९, ३० या तारखा आहेत. मे महिन्यात विवाह साेहळ्याचा हंगाम जाेमात राहणार आहे. अनेक जाेडपी याच महिन्यात विवाह करतात. 

काेराेना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रम व लग्न समारंभावर बंदी आली. परिणामी मार्चपासून ऑक्टाेबरपर्यंत आम्हा व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. आता अनलाॅक झाल्यापासून शासनाने लग्न समारंभ व कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. मात्र दरवर्षीपेक्षा यंदा निम्म्याच्या खाली मंगल कार्यालयासाठी बुकींग  झाली आहे. काेराेना संसर्गाबाबत मंगल कार्यालयात सॅनिटायझर, मास्कचा वापर करून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. यावर्षी काेराेनामुळे बरेच लाेक मंगल कार्यालयांमध्ये सवलत मागत आहेत. व्यवसाय घसरला आहे. -सुनील पाेरेड्डीवार, सभागृह व मंगल कार्यालय, संचालक, गडचिराेली

 

टॅग्स :marriageलग्न