शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

यंदा शिंगाड्याचे उत्पादन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:42 IST

फळवर्गीय पिकात अत्यंत रूचकर व पौष्टिक फळ असणाऱ्या शिंगाड्याची शेती आता कृषीपूरक व्यवसाय ठरत आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, अरसोडा व देसाईगंज तालुक्याच्या चोप (कोरेगाव) येथील कहार व ढिवर समाजबांधव शिंगाड्याची शेती मोठ्या प्रमाणात करीत आहेत.

ठळक मुद्देसोईसवलती मिळण्याची मागणी : पूरक व्यवसाय असलेली शिंगाड्याची शेती फायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : फळवर्गीय पिकात अत्यंत रूचकर व पौष्टिक फळ असणाऱ्या शिंगाड्याची शेती आता कृषीपूरक व्यवसाय ठरत आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, अरसोडा व देसाईगंज तालुक्याच्या चोप (कोरेगाव) येथील कहार व ढिवर समाजबांधव शिंगाड्याची शेती मोठ्या प्रमाणात करीत आहेत. वैरागड भागासह देसाईगंज तालुक्यात यंदा शिंगाड्याचे उत्पादन वाढले आहे.आरमोरी तालुक्यातील वैरागड हे गाव सीताफळ व शिंगाडा फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. सध्यास्थितीत सीताफळाच्या गावाशेजारी असणाºया बागा नष्ट झाल्या असल्या तरी आजही वैरागड येथे काहार समाज बांधव माराई बोडी, महादेव तलाव, जोडतलाव व इतर लहान-मोठ्या तलावात शिंगाड्याचे उत्पादन घेत आहेत.जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली व इतर तालुक्याच्या ठिकाणच्या बाजारपेठेत तसेच आठवडी बाजारात शिंगाड्याची विक्री करून हे समाजबांधव उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र शासनाकडून या शेतीला कोणतेही संरक्षण वा सोयीसवलती देण्यात आल्या नसल्याने शिंगाडे उत्पादकांना प्रसंगी तोटाही सहन करावा लागत आहे.जिल्ह्यातील धान उत्पादकांना तसेच रेशीम शेती उद्योगासाठी शासनाकडून ज्या सवलती मिळतातच त्याच धर्तीवर शिंगाडे उत्पादकांना सोयसवलती देण्यात याव्या, अशी मागणी वैरागड येथील दामोधर भरद्वार, राजू भरद्वार व इतर शिंगाडे उत्पादकांनी केली आहे.कृषी विभागाच्या वतीने शिंगाडे उत्पादनाची शेती व्यापक प्रमाणात होण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलावी, अशीही मागणी होत आहे. सध्या गडचिरोलीसह शहराच्या बाजारपेठेत शिंगाडे फळाला मोठी मागणी दिसून येत आहे.शिंगाड्याची शेती करण्यासाठी तलावात वेल टाकण्यापासून ते बाजारातील ग्राहकापर्यंत आपला उत्पादित माल पोहोचविण्यासाठी अनेक धोके पत्कारावे लागतात. पावसाळ्यापूर्वी तलावात वेल टाकले जात असल्याने अनेकदा ते पुरात वाहून जातात. शिंगाडे पिकावर किडा, टकोराचा प्रादुर्भाव होत असतो. हे पाण्यात होणारे पीक असल्याने अनेक अडचणी येतात. तसेच धोकेही असतात. त्यामुळे शासनाने शिंगाडे शेतीला सोयीसवतली व संरक्षण द्यावे, अशी शिंगाडे उत्पादकांची मागणी आहे.- दामोधर भरद्वार, शेतकरी, वैरागड