शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी मलेरिया नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:44 IST

प्रशासनाने केलेले प्रयत्न व निसर्गाने दिलेली साथ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मलेरिया (हिवताप) नियंत्रणात असल्याचे दिसून येते. तरीही जुलै महिन्यात दोन नागरिकांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देनिसर्गाने दिली साथ : रुग्णांची संख्या जवळपास निम्म्यावर; दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रशासनाने केलेले प्रयत्न व निसर्गाने दिलेली साथ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मलेरिया (हिवताप) नियंत्रणात असल्याचे दिसून येते. तरीही जुलै महिन्यात दोन नागरिकांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती व वातावरण मलेरियासाठी पोषक आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मलेरियाचा उद्रेक होते. राज्यात सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळत असल्याने मलेरियाबाबत गडचिरोली जिल्हा अतिशय संवेदनशील समजल्या जाते. मलेरियाचा प्रकोप वाढू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कधीकधी निसर्ग साथ देत नाही. वातावरण मलेरिया रोगासाठी पोषक बनते. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते.गडचिरोली जिल्ह्यात पर्जन्यमान अधिक आहे. बहुतांश गावे जंगलात वसली आहेत. तसेच धानाची शेती केली जात असल्याने गावाच्या सभोवताल असलेल्या धानाच्या बांधीत पाणी साचून राहते. याच पाण्यात डासांची पैदास वाढते. परिणामी मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सुमारे ५ हजार ४८४ रुग्ण आढळले होते. यावर्षी मात्र त्या तुलनेत रुग्णांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी असल्याचे दिसून येते. जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यापर्यंत केवळ १ हजार ९७७ रुग्ण आढळून आले आहेत. यावरून मागील वर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असून मलेरिया नियंत्रणात असल्याचे दिसून येते.प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाग्रामीण व दुर्गम भागात प्रामुख्याने मलेरियाचे रुग्ण अधिक आढळतात. मलेरियापासून बचाव करण्यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे हा सर्वोत्तम उपाय असल्याने हिवताप कार्यालयातर्फे नागरिकांना औषधभारीत मच्छरदाण्या मोफत वितरित करण्यात आल्या. झोपताना मच्छरदाणीचा अवश्य वापर करावा, याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली. त्याचबरोबर घराच्या सभोवताल पाणी जमा होऊ देऊ नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील आशाकडे औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे थंडीवाजून ताप आल्याबरोबर नागरिक आशाकडे जाऊन औषधोपचार करून घेतात. हंगामी क्षेत्र कर्मचारी नेमून त्यांच्या मार्फत घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले. रक्त नमूने गोळा करण्यात आले. एवढेच नव्हे तर संबंधित रुग्णाला स्वत:च्या निगराणीत औषध देत होते. त्यामुळे यावर्षी मलेरिया नियंत्रणात आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी दिली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य