शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

यावर्षी मलेरिया नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:44 IST

प्रशासनाने केलेले प्रयत्न व निसर्गाने दिलेली साथ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मलेरिया (हिवताप) नियंत्रणात असल्याचे दिसून येते. तरीही जुलै महिन्यात दोन नागरिकांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देनिसर्गाने दिली साथ : रुग्णांची संख्या जवळपास निम्म्यावर; दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रशासनाने केलेले प्रयत्न व निसर्गाने दिलेली साथ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मलेरिया (हिवताप) नियंत्रणात असल्याचे दिसून येते. तरीही जुलै महिन्यात दोन नागरिकांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती व वातावरण मलेरियासाठी पोषक आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मलेरियाचा उद्रेक होते. राज्यात सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळत असल्याने मलेरियाबाबत गडचिरोली जिल्हा अतिशय संवेदनशील समजल्या जाते. मलेरियाचा प्रकोप वाढू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कधीकधी निसर्ग साथ देत नाही. वातावरण मलेरिया रोगासाठी पोषक बनते. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते.गडचिरोली जिल्ह्यात पर्जन्यमान अधिक आहे. बहुतांश गावे जंगलात वसली आहेत. तसेच धानाची शेती केली जात असल्याने गावाच्या सभोवताल असलेल्या धानाच्या बांधीत पाणी साचून राहते. याच पाण्यात डासांची पैदास वाढते. परिणामी मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सुमारे ५ हजार ४८४ रुग्ण आढळले होते. यावर्षी मात्र त्या तुलनेत रुग्णांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी असल्याचे दिसून येते. जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यापर्यंत केवळ १ हजार ९७७ रुग्ण आढळून आले आहेत. यावरून मागील वर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असून मलेरिया नियंत्रणात असल्याचे दिसून येते.प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाग्रामीण व दुर्गम भागात प्रामुख्याने मलेरियाचे रुग्ण अधिक आढळतात. मलेरियापासून बचाव करण्यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे हा सर्वोत्तम उपाय असल्याने हिवताप कार्यालयातर्फे नागरिकांना औषधभारीत मच्छरदाण्या मोफत वितरित करण्यात आल्या. झोपताना मच्छरदाणीचा अवश्य वापर करावा, याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली. त्याचबरोबर घराच्या सभोवताल पाणी जमा होऊ देऊ नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील आशाकडे औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे थंडीवाजून ताप आल्याबरोबर नागरिक आशाकडे जाऊन औषधोपचार करून घेतात. हंगामी क्षेत्र कर्मचारी नेमून त्यांच्या मार्फत घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले. रक्त नमूने गोळा करण्यात आले. एवढेच नव्हे तर संबंधित रुग्णाला स्वत:च्या निगराणीत औषध देत होते. त्यामुळे यावर्षी मलेरिया नियंत्रणात आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी दिली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य