शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

यंदा खरीपाचे उत्पादन वाढणार

By admin | Updated: September 21, 2016 02:33 IST

यावर्षात गडचिरोली जिल्ह्यात १०८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीत उत्पादन वाढण्याची आशा बळीराजाला वाटू लागली आहे.

तुरीचे पीक जोमात : सप्टेंबरच्या पावसाने दिला दिलासा; हलक्या धानाला बसला फटकागडचिरोली : यावर्षात गडचिरोली जिल्ह्यात १०८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीत उत्पादन वाढण्याची आशा बळीराजाला वाटू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस हा सर्वच प्रकारच्या पिकांसाठी दिलासादायक ठरला असून खरीपबरोबर रबी पिकाचेंही उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती आहे.गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदाच मागील पाच वर्षात खरीप क्षेत्र २ लाख १ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावर पोहोचले आहे. त्याचबरोबर यंदा २०१६-१७ मध्ये ३० आॅगस्टपर्यंत २ लाख १ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ७९ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावर केवळ धानाची लागवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पीक पॅटर्नमध्ये बदल झाला असून खरीप हंगामात भात, मका, तृणधान्य, तूर, मूग, उडीद, भूईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबिन, कापूस, ऊस आदी पिकांची लागवड शेतकरी करू लागले आहे. सिंचनाची सुविधा नसतानाही गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या भरवशावर शेती करताना शेतकरी लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या मागे आहे. सद्य:स्थितीत धानपिकावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नसल्याने शेतकरी समाधानी आहे. सप्टेंबर महिन्यात काही भागात पुरामुळे धानपिकाचे नुकसान झाले. मात्र हा पाऊस बऱ्याच अंशी पिकासाठी दिलासादायक ठरला. कमी मुदतीच्या पिकाला पावसामुळे पोषक वातावरण मिळाले नाही. त्यामुळे हलक्या धानाची नासाडी होऊ शकते. यंदा पाऊस चांगला झाल्याने तलाव, बोड्या, नद्या भरलेल्या असून या वर्षात धान रोवणीची कामे वेळेवर झाल्याने हलके धान परिपक्वहोत आहे. तुरीचे पीकही या वर्षात अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात बांधाच्या पाऱ्यावर तुरी लावल्या जातात. त्या सध्या डौलाने उभ्या आहेत. गेल्या व या वर्षात तुरीचे वाढलेले भाव लक्षात घेऊन तुरीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर वाढले. चांगल्या उत्पन्नाची आशा शेतकऱ्यांना आहे. (जिल्हा प्रतिनिधी)