शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

यंदा खरीपाचे उत्पादन वाढणार

By admin | Updated: September 21, 2016 02:33 IST

यावर्षात गडचिरोली जिल्ह्यात १०८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीत उत्पादन वाढण्याची आशा बळीराजाला वाटू लागली आहे.

तुरीचे पीक जोमात : सप्टेंबरच्या पावसाने दिला दिलासा; हलक्या धानाला बसला फटकागडचिरोली : यावर्षात गडचिरोली जिल्ह्यात १०८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीत उत्पादन वाढण्याची आशा बळीराजाला वाटू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस हा सर्वच प्रकारच्या पिकांसाठी दिलासादायक ठरला असून खरीपबरोबर रबी पिकाचेंही उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती आहे.गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदाच मागील पाच वर्षात खरीप क्षेत्र २ लाख १ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावर पोहोचले आहे. त्याचबरोबर यंदा २०१६-१७ मध्ये ३० आॅगस्टपर्यंत २ लाख १ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ७९ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावर केवळ धानाची लागवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पीक पॅटर्नमध्ये बदल झाला असून खरीप हंगामात भात, मका, तृणधान्य, तूर, मूग, उडीद, भूईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबिन, कापूस, ऊस आदी पिकांची लागवड शेतकरी करू लागले आहे. सिंचनाची सुविधा नसतानाही गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या भरवशावर शेती करताना शेतकरी लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या मागे आहे. सद्य:स्थितीत धानपिकावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नसल्याने शेतकरी समाधानी आहे. सप्टेंबर महिन्यात काही भागात पुरामुळे धानपिकाचे नुकसान झाले. मात्र हा पाऊस बऱ्याच अंशी पिकासाठी दिलासादायक ठरला. कमी मुदतीच्या पिकाला पावसामुळे पोषक वातावरण मिळाले नाही. त्यामुळे हलक्या धानाची नासाडी होऊ शकते. यंदा पाऊस चांगला झाल्याने तलाव, बोड्या, नद्या भरलेल्या असून या वर्षात धान रोवणीची कामे वेळेवर झाल्याने हलके धान परिपक्वहोत आहे. तुरीचे पीकही या वर्षात अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात बांधाच्या पाऱ्यावर तुरी लावल्या जातात. त्या सध्या डौलाने उभ्या आहेत. गेल्या व या वर्षात तुरीचे वाढलेले भाव लक्षात घेऊन तुरीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर वाढले. चांगल्या उत्पन्नाची आशा शेतकऱ्यांना आहे. (जिल्हा प्रतिनिधी)