शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

यावर्षी खरिपातील धान खरेदी अडीच लाख क्विंटलने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:36 IST

गडचिराेली : मागील वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन हाेणे, अनियमित पाऊस, धान गर्भात असताना वादळी पावसाचा फटका, मध्यंतरी ...

गडचिराेली : मागील वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन हाेणे, अनियमित पाऊस, धान गर्भात असताना वादळी पावसाचा फटका, मध्यंतरी अवकाळी पावसाचा जाेरदार फटका बसल्याने गडचिराेली जिल्ह्यात खरीप हंगामात धानाचे उत्पादन घटले. याचा परिणामही आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीवर झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अडीच लाख क्विंटलने महामंडळाची धान खरेदी घटली आहे.

आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्थेच्या वतीने धानाची खरेदी जिल्हाभरात करण्यात आली. महामंडळाच्या गडचिराेली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत खरीप हंगामात ५४ केंद्रांवरून धानाची खरेदी करण्यात आली. अहेरी उपविभागात ३९ धान खरेदी केंद्र ठेवण्यात आले हाेते. गडचिराेली हद्दीतील ५४ केंद्रांवरून १० लाख २७ हजार ३४३ क्विंटल तर अहेरी उपविभागातील ३९ केंद्रांवरून ६ लाख २६ हजार २३८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. दाेन्ही कार्यालये मिळून जिल्हाभरात महामंडळाच्या वतीने सन २०२०-२१ या खरीप हंगामात आधारभूत धान खरेदी याेजनेअंतर्गत एकूण १६ लाख ५३ हजार ५८१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात धान उत्पादनाचा उतारा कमी आला. दरवर्षी प्रतिएकर १७ ते २० पाेती धान शेतकऱ्यांना व्हायचे. यावर्षी शेतकऱ्यांना १० ते १२ पाेती एवढेच उत्पादन हाती आले. शेतकऱ्यांनी १०० टक्के उत्पादनासाठी पूर्ण हंगामात आटापिटा केला. मात्र, शेतकऱ्यांच्या नशिबी ६५ ते ७० टक्केच उत्पादन हाती आले. परिणामी आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास अडीच लाखांनी घटली. गडचिराेली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत गतवर्षीच्या हंगामात ३१ मार्च २०२० पर्यंत एकूण १२ लाख ७ हजार ७१८ क्विंटल धानाची खरेदी झाली. एक महिन्याची मुदत वाढविण्यात आली. दरम्यान, ३० एप्रिल २०२० पर्यंत ही धान खरेदी १२ लाख ८० हजार क्विंटलवर पाेहाेचली.

बाॅक्स...

९८ काेटींचे चुकारे प्रलंबित

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने जिल्हाभरात ३८ हजार ४२१ इतक्या शेतकऱ्यांची आधारभूत किमतीने धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अदा करण्यात आले. अजूनही १८ हजार ११४ शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे प्रलंबित आहेत. या शेतकऱ्यांचे तब्बल ९८ काेटी ६९ लाख ९५ हजार रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत.

बाॅक्स....

धान खरेदीला मुदतवाढ नाही

गतवर्षीच्या खरीप हंगामात काेराेना संकटामुळे राज्य शासनाच्या वतीने आधारभूत धान खरेदीला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली हाेती. या एक महिन्याच्या कालावधीत जवळपास दीड लाख क्विंटल धानाची खरेदी झाली हाेती. यावर्षीसुद्धा किचकट अटी, शर्ती तसेच ऑनलाईन प्रक्रियेमुळे धान खरेदीच्या कामात गती आली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे धान अजूनही विक्रीअभावी घरीच पडून असल्याची माहिती आहे. धान खरेदीला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात शासनाने अद्यापही काेणताही निर्णय घेतला नाही.