शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

यावर्षी कर्जवाटपाचा निम्मा पल्लाही दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:19 IST

आॅगस्ट महिना अर्धा संपण्याच्या मार्गावर असताना उद्दिष्टाच्या निम्मेही कर्ज वाटप झाले नाही. केवळ ४३.३६ टक्केच कर्जाचे वाटप झाले आहे. सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्ती करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत, ग्रामीण व सहकारी बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.

ठळक मुद्देउदास धोरण : उद्दिष्टाच्या केवळ ४३ टक्के कर्ज वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅगस्ट महिना अर्धा संपण्याच्या मार्गावर असताना उद्दिष्टाच्या निम्मेही कर्ज वाटप झाले नाही. केवळ ४३.३६ टक्केच कर्जाचे वाटप झाले आहे.सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्ती करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत, ग्रामीण व सहकारी बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. प्रत्येक बँकेने शेतकºयांना कर्जाचे वितरण करावे, यासाठी त्यांच्यावर दबाव असावा, या उद्देशाने प्रत्येक वर्षी उन्हाळ्यातच कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. बँका शासकीय कर्मचारी, उद्योगपती यांना कर्ज तर देतात. मात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. शेतकरी कर्जाचा भरणा करीत नाही, अशी चुकीची समजूत बँक व्यवस्थापनाची झाली आहे. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार होत नाही.२०१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील बँकांना २०२.९१ कोटी रूपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी केवळ ८७ कोटी ९८ लाख रूपयांचे कर्ज वाटप २० हजार ८४५ शेतकऱ्यांना केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या कर्ज वाटपाचे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी असून ते ४३.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे.गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धान रोवणीसाठी सर्वाधिक खर्च येतो. जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून रोवणीला सुरूवात होते. त्यामुळे त्यापूर्वीच पात्र शेतकरीपीक कर्जाची मागणी करतात. आता मात्र आॅगस्ट महिना सुरू झाला आहे. जवळपास ७० टक्के रोवणीची कामे आटोपली आहेत. पावसाअभावी ३० टक्के रोवणी शिल्लक आहेत. त्यामुळे यानंतर खरीपासाठी कर्जाची मागणी होणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे कर्ज वाटपाचा आकडा पुढे सरकण्याची फार कमी शक्यता आहे. एकंदरीतच या वर्षी कर्जवाटपाचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आतच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासन व लोकप्रतिनिधींना दाखविण्यासाठी काही बँका थोडेफार कर्जवाटप करतात. त्यानंतर मात्र उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले जाते. दुसरीकडे शेतकरीच कर्ज मागत नसल्याचा अहवाल शासनाला पाठवितात. अशा प्रकारे बँक व्यवस्थापन शेतकरी व शासनाची फसवणूक करीत असल्याचे दिसून येते. अशा बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.कर्जमाफीच्या दिरंगाईचा परिणामकर्जमाफीची प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे. कर्जमाफीच्या घोषणेला जवळपास १० महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे. कर्जमाफीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने अनेक शेतकऱ्यांनी जुने कर्ज भरले नाही. त्यामुळे हे शेतकरी थकबाकीदार बनले. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची होती, त्यांचीही कर्जमाफी लवकर झाली नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्यांवर सुध्दा कर्जाचे बोझे असून नवीन कर्जासाठी ते पात्र ठरले नाही. याचा परिणाम म्हणजे, मागील वर्षीपासून कर्ज उचलणाऱ्यांचे प्रमाण अतिशय घटले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बँक आॅफ इंडिया या दोन बँका वगळल्या तर इतर बँकांची कर्ज वाटपाची टक्केवारी ४० टक्क्यांच्या आतच आहे. ती आता पुढे सरकण्याची शक्यता फार कमी आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी