शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

यावर्षी कर्जवाटपाचा निम्मा पल्लाही दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:19 IST

आॅगस्ट महिना अर्धा संपण्याच्या मार्गावर असताना उद्दिष्टाच्या निम्मेही कर्ज वाटप झाले नाही. केवळ ४३.३६ टक्केच कर्जाचे वाटप झाले आहे. सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्ती करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत, ग्रामीण व सहकारी बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.

ठळक मुद्देउदास धोरण : उद्दिष्टाच्या केवळ ४३ टक्के कर्ज वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅगस्ट महिना अर्धा संपण्याच्या मार्गावर असताना उद्दिष्टाच्या निम्मेही कर्ज वाटप झाले नाही. केवळ ४३.३६ टक्केच कर्जाचे वाटप झाले आहे.सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्ती करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत, ग्रामीण व सहकारी बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. प्रत्येक बँकेने शेतकºयांना कर्जाचे वितरण करावे, यासाठी त्यांच्यावर दबाव असावा, या उद्देशाने प्रत्येक वर्षी उन्हाळ्यातच कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. बँका शासकीय कर्मचारी, उद्योगपती यांना कर्ज तर देतात. मात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. शेतकरी कर्जाचा भरणा करीत नाही, अशी चुकीची समजूत बँक व्यवस्थापनाची झाली आहे. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार होत नाही.२०१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील बँकांना २०२.९१ कोटी रूपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी केवळ ८७ कोटी ९८ लाख रूपयांचे कर्ज वाटप २० हजार ८४५ शेतकऱ्यांना केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या कर्ज वाटपाचे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी असून ते ४३.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे.गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धान रोवणीसाठी सर्वाधिक खर्च येतो. जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून रोवणीला सुरूवात होते. त्यामुळे त्यापूर्वीच पात्र शेतकरीपीक कर्जाची मागणी करतात. आता मात्र आॅगस्ट महिना सुरू झाला आहे. जवळपास ७० टक्के रोवणीची कामे आटोपली आहेत. पावसाअभावी ३० टक्के रोवणी शिल्लक आहेत. त्यामुळे यानंतर खरीपासाठी कर्जाची मागणी होणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे कर्ज वाटपाचा आकडा पुढे सरकण्याची फार कमी शक्यता आहे. एकंदरीतच या वर्षी कर्जवाटपाचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आतच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासन व लोकप्रतिनिधींना दाखविण्यासाठी काही बँका थोडेफार कर्जवाटप करतात. त्यानंतर मात्र उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले जाते. दुसरीकडे शेतकरीच कर्ज मागत नसल्याचा अहवाल शासनाला पाठवितात. अशा प्रकारे बँक व्यवस्थापन शेतकरी व शासनाची फसवणूक करीत असल्याचे दिसून येते. अशा बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.कर्जमाफीच्या दिरंगाईचा परिणामकर्जमाफीची प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे. कर्जमाफीच्या घोषणेला जवळपास १० महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे. कर्जमाफीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने अनेक शेतकऱ्यांनी जुने कर्ज भरले नाही. त्यामुळे हे शेतकरी थकबाकीदार बनले. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची होती, त्यांचीही कर्जमाफी लवकर झाली नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्यांवर सुध्दा कर्जाचे बोझे असून नवीन कर्जासाठी ते पात्र ठरले नाही. याचा परिणाम म्हणजे, मागील वर्षीपासून कर्ज उचलणाऱ्यांचे प्रमाण अतिशय घटले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बँक आॅफ इंडिया या दोन बँका वगळल्या तर इतर बँकांची कर्ज वाटपाची टक्केवारी ४० टक्क्यांच्या आतच आहे. ती आता पुढे सरकण्याची शक्यता फार कमी आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी