शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी खरीप पिकांची स्थिती समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:50 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या हंगामी पैसेवारीवरून दिसून येते. मागील वर्षी खरीपाची हंगामी पैसेवारी ६५ पैसे एवढी होती. यावर्षीच्या ही पैसेवारी ७१ एवढी आहे. कीडीचा प्रादुर्भाव न झाल्यास पीक चांगले येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देहंगामी पैसेवारी ७१ : कृषी व महसूल विभागाच्या पाहणीत गेल्यावर्षीपेक्षा स्थितीत सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या हंगामी पैसेवारीवरून दिसून येते. मागील वर्षी खरीपाची हंगामी पैसेवारी ६५ पैसे एवढी होती. यावर्षीच्या ही पैसेवारी ७१ एवढी आहे. कीडीचा प्रादुर्भाव न झाल्यास पीक चांगले येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात एकूण पीक लागवडीच्या सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. धान हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. यावर्षी सुरूवातीपासून अगदी वेळेवर पाऊस झाला. त्यामुळे धान पिकाचे पऱ्हे टाकणीसह रोवणी व इतर कामे अगदी वेळेवर झाली. त्यामुळे धानाची स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत चांगली आहे.पावसाने उसंत घेतल्याने तलाव, बोड्याचे पाणी दिले जात आहे. हलके धान पीक निघले असून मध्यम व धानपीक निघण्याच्या मार्गावर आहे. धान पिकाची स्थिती चांगली आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबिन, तूर या पिकांची स्थिती मात्र फारशी चांगली नाही. पावसामुळे या पिकांची वाढ करपली होती. आता पावसाने उसंत घेतल्याने कापसाला बोंड येण्याच्या मार्गावर असताना कापूस करपत आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. सुमारे १ लाख ७६ हजार ९९९ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पीक परिरिस्थतीचा आढावा घेतला जातो. याला हंगामी पैसेवारी संबोधल्या जाते. या पैसेवारीवरून जिल्हाभरातील पिकांची स्थिती कळून येण्यास मदत होते. कृषी विभाग व महसूल विभागाने केलेल्या पाहणीमध्ये यावर्षी पिकांची स्थिती थोडी चांगली असल्याचे आढळून आले आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक आहे. ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेले जिल्हाभरात एकही गाव आढळले नाही. मागील वर्षी १५ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आढळली होती.धानपीक निघण्याच्या मार्गावर असताना मावा व तुडतुडा रोगाने हल्ला केला. त्यामुळे काही शेतकºयांचे पीक उद्ध्वस्त झाले. परिणामी १६६ अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी आढळली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिकांची स्थिती चांगली असल्याचे दिसून येते.६२ गावांमध्ये पिकांची लागवडच नाहीगडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. यापैकी ६२ गावांमध्ये खरीप पिकाची लागवड केली जात नाही. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १ गाव, धानोरा तालुक्यातील ६ गावे, चामोर्शी तालुक्यातील ६ गावे, आरमोरी १, कुरखेडा ५, कोरची व अहेरी प्रत्येकी ६, एटापल्ली ३, भामरागड तालुक्यातील २२ व सिरोंचा तालुक्यातील ६ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली नाही. भामरागड तालुक्यातील काही गावांची लोकसंख्या अतिशय कमी आहे. या भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्याचबरोबर गावाच्या सभोवताल वन विभागाची जमीन असल्याने शेती करणे शक्य नाही. परिणामी भामरागड तालुक्यातील सर्वाधिक २२ गावांमध्ये खरीपाचे तसेच रबीेचे सुध्दा कोणतेच उत्पादन घेतले जात नाही. भामरागड तालुक्यातील जे शेतकरी खरीप पिकांची लागवड करतात, त्यासाठी सुध्दा अतिशय जुनाट पध्दती अवलंबिली जाते. परिणामी इतर तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्यातील दर हेक्टरी उत्पादन कमी असल्याचे दिसून येते.