शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
3
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
4
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
5
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
6
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
8
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
9
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
10
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
11
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
12
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
13
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
14
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
15
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
16
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
17
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
18
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
19
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
20
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स

यंदाही तुटणार ४० गावांचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2015 01:59 IST

येथून एक किमी अंतरावर असलेल्या गडअहेरी नाल्यावरील ठेंगणा पूल कायम असल्याने ..

अहेरी : येथून एक किमी अंतरावर असलेल्या गडअहेरी नाल्यावरील ठेंगणा पूल कायम असल्याने यावर्षीही या परिसरातील ४० गावांचा संपर्क पावसाळ्यात तुटण्याची शक्यता आहे. याचा फटका हजारो नागरिकांना बसणार आहे.अहेरी-देवलमरी मार्गावर गडअहेरी नाला आहे. या नाल्यावर पूल आहे. मात्र या पुलाची उंची अत्यंत कमी आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होताच पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. परिणामी पावसाळ्यात अनेक वेळा या मार्गावरील वाहतूक खोळंबते. अनेक नागरिक जीव धोक्यात घालून नाल्यातून किंवा पुलावरून पाणी असताना प्रवास करतात. या परिसरात सुमारे ४० गावे असल्याने या पुलाची उंची वाढवावी, याबाबतची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र अजूनपर्यंत या पुलाच्या बांधकामास प्रशासनाने मंजुरी दिली नाही. मागील वर्षी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी देवलमरी भागाचा दौरा केला होता. त्यावेळी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी या पुलाची समस्या लक्षात आणून दिली होती. लवकरच पुलाच्या बांधकामाला मंजुरी दिले जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही. आ. दीपक आत्राम यांनीही दिलेला शब्द पूर्णत्वास नेला नाही. त्यामुळे आजतागायत ही समस्या कायम आहे. याचा त्रास हजारो नागरिकांना सहन करावा लागत असल्याने पुलाची उंची वाढविण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)