शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

यंदाही तुटणार ४० गावांचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2015 01:59 IST

येथून एक किमी अंतरावर असलेल्या गडअहेरी नाल्यावरील ठेंगणा पूल कायम असल्याने ..

अहेरी : येथून एक किमी अंतरावर असलेल्या गडअहेरी नाल्यावरील ठेंगणा पूल कायम असल्याने यावर्षीही या परिसरातील ४० गावांचा संपर्क पावसाळ्यात तुटण्याची शक्यता आहे. याचा फटका हजारो नागरिकांना बसणार आहे.अहेरी-देवलमरी मार्गावर गडअहेरी नाला आहे. या नाल्यावर पूल आहे. मात्र या पुलाची उंची अत्यंत कमी आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होताच पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. परिणामी पावसाळ्यात अनेक वेळा या मार्गावरील वाहतूक खोळंबते. अनेक नागरिक जीव धोक्यात घालून नाल्यातून किंवा पुलावरून पाणी असताना प्रवास करतात. या परिसरात सुमारे ४० गावे असल्याने या पुलाची उंची वाढवावी, याबाबतची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र अजूनपर्यंत या पुलाच्या बांधकामास प्रशासनाने मंजुरी दिली नाही. मागील वर्षी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी देवलमरी भागाचा दौरा केला होता. त्यावेळी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी या पुलाची समस्या लक्षात आणून दिली होती. लवकरच पुलाच्या बांधकामाला मंजुरी दिले जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही. आ. दीपक आत्राम यांनीही दिलेला शब्द पूर्णत्वास नेला नाही. त्यामुळे आजतागायत ही समस्या कायम आहे. याचा त्रास हजारो नागरिकांना सहन करावा लागत असल्याने पुलाची उंची वाढविण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)