शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

यावर्षीही बसणार २२३ गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:51 IST

पावसाळा लागला की वाहतुकीसाठी रस्ते बंद होणारी अजूनही तब्बल २२३ गावे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्या गावांतील नागरिकांना पावसाळ्यात गरजेच्या ठरणाऱ्या आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नियोजन केले जात आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात रस्ते बंद : प्रशासनाचे मान्सूनपूर्व नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा लागला की वाहतुकीसाठी रस्ते बंद होणारी अजूनही तब्बल २२३ गावे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्या गावांतील नागरिकांना पावसाळ्यात गरजेच्या ठरणाऱ्या आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नियोजन केले जात आहे.दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आढावा बैठक घेऊन संभावित परिस्थितीची माहिती घेतली. त्यात अजूनही जिल्ह्यातील १४४८ गावांपैकी १२२५ गावे बारमाही रस्त्यांनी जोडलेली असून २२३ गावांचा रस्ता पावसाळ्यात बंद होणार असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या नद्या आणि नाल्यांवर नसणारे किंवा कमी उंचीचे असणारे पूल, कच्चा रस्ता या कारणांमुळे हे रस्ते पावसाळ्यात बंद होतात.पावसाळ्यात रस्ता बंद होणाºया गावांमध्ये सर्वाधिक ८२ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. त्यानंतर भामरागड तालुक्यातील ३७, अहेरी तालुक्यातील ३४, धानोरा तालुक्यातील ३० आणि सिरोंचा तालुक्यातील २५ गावांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये काही मोजक्या गावांचा संपर्क तुटतो. देसाईगंज आणि आरमोरी हे दोन तालुके मात्र यासाठी अपवाद असून दोन्ही तालुक्यात सर्व रस्ते बारमाही आहेत.२०१ गावांना पुराची भितीपावसाळा लागला की रस्ते बंद होणाºया २२३ गावांशिवाय केवळ नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते बंद होणारी २०१ गावे आहेत. नदीतील पाण्याची पातळी वाढल्यास किंवा पुलावरून पाणी वाहात असल्याने २०१ गावांचा रस्ता मार्गे असणारा संपर्क तुटतो.