शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही बसणार २२३ गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:51 IST

पावसाळा लागला की वाहतुकीसाठी रस्ते बंद होणारी अजूनही तब्बल २२३ गावे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्या गावांतील नागरिकांना पावसाळ्यात गरजेच्या ठरणाऱ्या आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नियोजन केले जात आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात रस्ते बंद : प्रशासनाचे मान्सूनपूर्व नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा लागला की वाहतुकीसाठी रस्ते बंद होणारी अजूनही तब्बल २२३ गावे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्या गावांतील नागरिकांना पावसाळ्यात गरजेच्या ठरणाऱ्या आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नियोजन केले जात आहे.दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आढावा बैठक घेऊन संभावित परिस्थितीची माहिती घेतली. त्यात अजूनही जिल्ह्यातील १४४८ गावांपैकी १२२५ गावे बारमाही रस्त्यांनी जोडलेली असून २२३ गावांचा रस्ता पावसाळ्यात बंद होणार असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या नद्या आणि नाल्यांवर नसणारे किंवा कमी उंचीचे असणारे पूल, कच्चा रस्ता या कारणांमुळे हे रस्ते पावसाळ्यात बंद होतात.पावसाळ्यात रस्ता बंद होणाºया गावांमध्ये सर्वाधिक ८२ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. त्यानंतर भामरागड तालुक्यातील ३७, अहेरी तालुक्यातील ३४, धानोरा तालुक्यातील ३० आणि सिरोंचा तालुक्यातील २५ गावांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये काही मोजक्या गावांचा संपर्क तुटतो. देसाईगंज आणि आरमोरी हे दोन तालुके मात्र यासाठी अपवाद असून दोन्ही तालुक्यात सर्व रस्ते बारमाही आहेत.२०१ गावांना पुराची भितीपावसाळा लागला की रस्ते बंद होणाºया २२३ गावांशिवाय केवळ नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते बंद होणारी २०१ गावे आहेत. नदीतील पाण्याची पातळी वाढल्यास किंवा पुलावरून पाणी वाहात असल्याने २०१ गावांचा रस्ता मार्गे असणारा संपर्क तुटतो.