शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

यावर्षीही बसणार २२३ गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:51 IST

पावसाळा लागला की वाहतुकीसाठी रस्ते बंद होणारी अजूनही तब्बल २२३ गावे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्या गावांतील नागरिकांना पावसाळ्यात गरजेच्या ठरणाऱ्या आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नियोजन केले जात आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात रस्ते बंद : प्रशासनाचे मान्सूनपूर्व नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा लागला की वाहतुकीसाठी रस्ते बंद होणारी अजूनही तब्बल २२३ गावे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्या गावांतील नागरिकांना पावसाळ्यात गरजेच्या ठरणाऱ्या आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नियोजन केले जात आहे.दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आढावा बैठक घेऊन संभावित परिस्थितीची माहिती घेतली. त्यात अजूनही जिल्ह्यातील १४४८ गावांपैकी १२२५ गावे बारमाही रस्त्यांनी जोडलेली असून २२३ गावांचा रस्ता पावसाळ्यात बंद होणार असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या नद्या आणि नाल्यांवर नसणारे किंवा कमी उंचीचे असणारे पूल, कच्चा रस्ता या कारणांमुळे हे रस्ते पावसाळ्यात बंद होतात.पावसाळ्यात रस्ता बंद होणाºया गावांमध्ये सर्वाधिक ८२ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. त्यानंतर भामरागड तालुक्यातील ३७, अहेरी तालुक्यातील ३४, धानोरा तालुक्यातील ३० आणि सिरोंचा तालुक्यातील २५ गावांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये काही मोजक्या गावांचा संपर्क तुटतो. देसाईगंज आणि आरमोरी हे दोन तालुके मात्र यासाठी अपवाद असून दोन्ही तालुक्यात सर्व रस्ते बारमाही आहेत.२०१ गावांना पुराची भितीपावसाळा लागला की रस्ते बंद होणाºया २२३ गावांशिवाय केवळ नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते बंद होणारी २०१ गावे आहेत. नदीतील पाण्याची पातळी वाढल्यास किंवा पुलावरून पाणी वाहात असल्याने २०१ गावांचा रस्ता मार्गे असणारा संपर्क तुटतो.