शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोतून होणार १२४५ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:23 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षाच्या वार्षिक नियोजन आराखड्यास नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली.

ठळक मुद्दे७३ हजार कामांचा समावेश : आगामी आर्थिक वर्षाचा नियोजन आराखडा मंजूर

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षाच्या वार्षिक नियोजन आराखड्यास नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली. या आराखड्यानुसार तब्बल १२४५ कोटी ५९ लाख ८० हजार रुपयांची जिल्हाभरात एकूण ७३ हजार ९२३ कामे होणार आहेत.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्याच्या कलम ४ व २८ अन्वये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार करण्यात आली आहे. मग्रारोहयो ही योजना महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात २ फेब्रुवारी २००६ पासून लागू करण्यात आली असून यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याची कायद्यान्वये हमी असलेल्या या योजनेंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कामे केली जातात. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागामार्फत आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या पूर्वी वार्षिक नियोजन आराखडा तयार केला जातो. त्यानुसार यंदाही असा आराखडा तयार करण्यात आला व या आराखड्यास जि.प.च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली. रोजगार हमी योजनेची कामे ५० टक्के ग्रामपंचायत व ५० टक्के यंत्रणास्तरावर दरवर्षी केली जातात. जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नरेगाची कामे प्राधान्याने घेतली जातात. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एकूण ४५७ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ७३ हजार ९२३ कामे घेण्यात येणार आहे. या कामांसाठी एकूण १२४५ कोटी ५९ लाख ८० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. जि.प.च्या वतीने तयार करण्यात आलेल्या पुढील आर्थिक वर्षाच्या नियोजन आराखड्यानुसार शासनाकडून प्रस्तावित कामांसाठी निधी प्राप्त होणार आहे. मग्रारोहयोतून सिंचन विहीर, वळण बंधारे, कालव्याची कामे, पिण्याच्या पाण्याची विहीर आदी जलसिंचनाची कामे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय सदर योजनेतून फळबाग, बोळी, मजगी, शेततळे, सिंचन विहीर, शाळा व गावासाठी क्रीडांगण, वैयक्तिक गोठा दुरूस्ती, अंगणवाडी शौचालय, शाळा शौचालय, गांढुळ खत, कंपोस्ट खत आदी कामे होणार आहेत.३४७ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचा प्रयत्नरोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर कामे करण्यात येणार असून पुढील वर्षाच्या नियोजन आराखड्यानुसार जिल्हाभरात विविध एकूण ७३ हजार ९२३ कामे होणार आहेत. जि.प.च्या नरेगा विभागाने पंचायत समिती व ग्रामपंचायतनिहाय नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार वर्षभरात एकूण ३४७ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होणार आहे.ग्रामसभेतून कामांची निवडकेंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या कामांची निवड ग्रामसभेमधून करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन पुढील आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून करावयाच्या विविध कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात नोंदणीकृत मजुराच्या मागणीनुसार त्या-त्या ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये रोहयोतून विविध कामे करण्यात येणार आहेत.