शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

रोहयोतून होणार १२४५ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:23 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षाच्या वार्षिक नियोजन आराखड्यास नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली.

ठळक मुद्दे७३ हजार कामांचा समावेश : आगामी आर्थिक वर्षाचा नियोजन आराखडा मंजूर

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षाच्या वार्षिक नियोजन आराखड्यास नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली. या आराखड्यानुसार तब्बल १२४५ कोटी ५९ लाख ८० हजार रुपयांची जिल्हाभरात एकूण ७३ हजार ९२३ कामे होणार आहेत.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्याच्या कलम ४ व २८ अन्वये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार करण्यात आली आहे. मग्रारोहयो ही योजना महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात २ फेब्रुवारी २००६ पासून लागू करण्यात आली असून यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याची कायद्यान्वये हमी असलेल्या या योजनेंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कामे केली जातात. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागामार्फत आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या पूर्वी वार्षिक नियोजन आराखडा तयार केला जातो. त्यानुसार यंदाही असा आराखडा तयार करण्यात आला व या आराखड्यास जि.प.च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली. रोजगार हमी योजनेची कामे ५० टक्के ग्रामपंचायत व ५० टक्के यंत्रणास्तरावर दरवर्षी केली जातात. जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नरेगाची कामे प्राधान्याने घेतली जातात. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एकूण ४५७ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ७३ हजार ९२३ कामे घेण्यात येणार आहे. या कामांसाठी एकूण १२४५ कोटी ५९ लाख ८० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. जि.प.च्या वतीने तयार करण्यात आलेल्या पुढील आर्थिक वर्षाच्या नियोजन आराखड्यानुसार शासनाकडून प्रस्तावित कामांसाठी निधी प्राप्त होणार आहे. मग्रारोहयोतून सिंचन विहीर, वळण बंधारे, कालव्याची कामे, पिण्याच्या पाण्याची विहीर आदी जलसिंचनाची कामे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय सदर योजनेतून फळबाग, बोळी, मजगी, शेततळे, सिंचन विहीर, शाळा व गावासाठी क्रीडांगण, वैयक्तिक गोठा दुरूस्ती, अंगणवाडी शौचालय, शाळा शौचालय, गांढुळ खत, कंपोस्ट खत आदी कामे होणार आहेत.३४७ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचा प्रयत्नरोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर कामे करण्यात येणार असून पुढील वर्षाच्या नियोजन आराखड्यानुसार जिल्हाभरात विविध एकूण ७३ हजार ९२३ कामे होणार आहेत. जि.प.च्या नरेगा विभागाने पंचायत समिती व ग्रामपंचायतनिहाय नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार वर्षभरात एकूण ३४७ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होणार आहे.ग्रामसभेतून कामांची निवडकेंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या कामांची निवड ग्रामसभेमधून करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन पुढील आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून करावयाच्या विविध कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात नोंदणीकृत मजुराच्या मागणीनुसार त्या-त्या ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये रोहयोतून विविध कामे करण्यात येणार आहेत.