शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

तेलंगणात अडकलेले मजूर भामरागडात परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST

भामरागड तालुक्यातील ११ महिला व पुरूष दोन महिन्यापूर्वी मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्याच्या भुपालपल्ली जयशंकर जिल्ह्यातील महादेवपूर गावात गेले होते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे सदर मजूर महादेवपूर गावातच अडकले. तेलंगणा सरकारने या मजुरांना रेशन व ५०० रूपयांची मदत दिली. मात्र असे किती दिवस जगायचे, असा विचार करून सदर मजूर महादेवपूरवरून पायदळ निघाले.

ठळक मुद्देगोदावरी नदीतून काढली वाट : स्वगावी पाठवून केले होम क्वॉरंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात भामरागड तालुक्यातील अनेक मजूर मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. दरम्यान त्यांनी गोदावरी नदीतून पायदळ वाट काढली. सिरोंचा तालुक्याच्या पेंटिपाका येथे पोहोचल्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासगी बसची व्यवस्था करून त्यांना भामरागडात आणले. येथे वैद्यकीय तपासणी करून त्यांना स्वगावी पाठवत त्यांच्या घरी विलगिकरणात (होम क्वॉरंटाईन) ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.भामरागड तालुक्यातील ११ महिला व पुरूष दोन महिन्यापूर्वी मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्याच्या भुपालपल्ली जयशंकर जिल्ह्यातील महादेवपूर गावात गेले होते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे सदर मजूर महादेवपूर गावातच अडकले. तेलंगणा सरकारने या मजुरांना रेशन व ५०० रूपयांची मदत दिली. मात्र असे किती दिवस जगायचे, असा विचार करून सदर मजूर महादेवपूरवरून पायदळ निघाले. गोदावरी नदी ओलांडून सिरोंचा तालुक्याच्या पेंटिपाका येथे पोहोचले. येथे पोलिसांनी त्यांना अडविल्यावर त्यांनी आपबिती कथन केली. आम्हाला घरी जाण्याची मुभा द्या, अशी विनंती केली.पोलिसांनी त्यांच्या कॅम्पमध्ये असलेल्या विलगीकरण कक्षात मजुरांना आणले. याची माहिती महसूल विभागाला दिली.२२ एप्रिलला सकाळी ८ वाजता पेंटिपाकावरून एक खासगी बसगाडीमध्ये बसवून या मजुरांना भामरागड येथे पाठविण्यात आले. भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार व न. पं. मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य चमुमार्फत या मजुरांची आरोग्य तपासणी करून घेतली. त्यानंतर त्यांना स्वगावी पाठविले. अडचणीत सापडलेल्या या मजुरांनी सिरोंचा पोलीस व महसूल प्रशासनाचे आभार मानले.होम क्वॉरंटाईनची जोखीम धोकादायकमिरची तोडाईसाठी तेलंगणा राज्यात गेलेले मजूर कोरोनाबाधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ एका वैद्यकीय तपासणीतून ते बाधित आहे किंवा नाही हे कळत नाही. तरीही या मजुरांना आपापल्या घरी पाठविण्यात आले. दोन खोल्यांच्या घरात संसार करणाºया या मजुरवर्गासाठी होम क्वॉरंटाईन होऊन राहताना इतर लोकांच्या संपर्कात येण्याचे टाळणे त्यांच्यासाठी शक्य नाही. तरीही होम क्वॉरंटाईन करण्याची जोखीम पत्करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेलंगणातून परतलेल्या मजुरांना संस्थांत्मक विलगीकरण कक्षात काही दिवस ठेवणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार