शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

रोजगाराच्या शोधात मजुरांची परराज्यांत धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

उमेश पेंड्याला लाेकमत न्यूज नेटवर्क गुड्डीगुडम : अहेरी उपविभागासह गडचिराेली जिल्ह्यात काेणतेही माेठे उद्याेगधंदे नाहीत. कसलेही कारखाने नाहीत. ...

उमेश पेंड्याला

लाेकमत न्यूज नेटवर्क

गुड्डीगुडम : अहेरी उपविभागासह गडचिराेली जिल्ह्यात काेणतेही माेठे उद्याेगधंदे नाहीत. कसलेही कारखाने नाहीत. शेती व्यवसाय व हंगामी राेजगार साेडल्यास इतर पाच ते सहा महिने येथील मजुरांना रिकाम्या हाताने राहावे लागते. रिकाम्या हाताने राहून पाेट कसे भरायचे, असा प्रश्न सतावत असलेल्या गुड्डीगुडम परिसरात अहेरी उपविभागातील शेकडाे मजूर सामानाचे गाठाेळे घेऊन मिळेल त्या वाहनाने परराज्यांत स्थलांतरित हाेत आहेत.

गेले नऊ महिने काेराेना महामारीने राेजगाराची पूर्णत: वाट लावली. शेतीमधून निघणाऱ्या अत्यल्प उत्पादनावर अहेरी उपविभागातील आदिवासी व बिगर आदिवासी मजुराने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालविला. आता पाेटाची खळगी भरण्यासाठी परराज्यांत जाऊन काम केल्याशिवाय पर्याय नाही, हे ओळखून या भागातील मजूर लगतच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश, आदी राज्यांत मिरची ताेडणीसह विविध कामे करण्यासाठी जात आहेत. आंध्रप्रदेश राज्यातील मधेपूर, चेन्नूर, गुंटूर, कबंम, श्रीरामपूर, आदी भागांत बरेच मजूर जात असल्याचे दिसून येते. प्रस्तुत प्रतिनिधीशी बाेलताना अनेक मजुरांनी मिरची ताेडणी व इतर कामांसाठी परराज्यांत जात असल्याचे सांगितले.

बाॅक्स...

हाेळीपर्यंत हंगाम चालणार

तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांत गेल्या दाेन ते तीन वर्षांपासून मिरची लागवडीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिणामी गडचिराेली जिल्ह्यासह विदर्भाच्या अनेक भागांतील मजुरांकडून त्या राज्यातील सधन शेतकरी मिरची ताेडणीचे काम करून घेतात. मिरची ताेडणीच्या हंगामास जाेरदार सुरुवात झाली असून, हा हंगाम हाेळी सणापर्यंत राहणार आहे. अहेरी उपविभागातील बरेच मजूर हाेळीचा सणही तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यांत साजरा करून कामाचा माेबदला अर्थात मजुरीची रक्कम घेऊन मार्च महिन्याच्या अखेरीस परतणार आहेत.