शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

मार्र्कं डा देवस्थानचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:34 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्र्कं डादेव येथील अतिशय पुरातन व ऐतिहासिक मार्र्कंडादेव देवस्थानच्या दुरूस्तीचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. सदर काम पूर्ण केव्हा होईल याची प्रतीक्षा असंख्य भाविकांना आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मंदिर दुरूस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

ठळक मुद्देदुरूस्तीला वेग नाही : पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्र्कं डादेव येथील अतिशय पुरातन व ऐतिहासिक मार्र्कंडादेव देवस्थानच्या दुरूस्तीचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. सदर काम पूर्ण केव्हा होईल याची प्रतीक्षा असंख्य भाविकांना आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मंदिर दुरूस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.चार वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने मंदिर दुरूस्तीचे काम हाती घेतले. काम सुरू झाल्यानंतर सहा महिन्यात मंदिर दुरूस्तीचे काम करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांच्या उदासीनतेमुळे मंदिर दुरूस्तीचे काम पूर्णता रेंगाळले आहे.वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्या होणे व त्यांच्या जागी नवीन अधिकारी रूजू होणे यातच वेळ जात असल्याने मंदिर दुरूस्तीकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकाºयांचे लक्ष नसल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. भाविकांना अडचणी जाणवत आहेत.भारतीय पुरातत्त्व विभाग चंद्रपूर यांची यंत्रणा व नियंत्रणाखाली काम अतिशय संथगतीने सुरू आहे. चार वर्षापासून केवळ दगड छिललेले दिसतात. मुख्य मंदिरासह १४ शिवालय असून त्यांची डागडुजी देखील करायची असल्याने शासनाचे कोट्यवधी रूपये कुठे खर्च होत आहेत, हे समजायला मार्ग नाही. एवढा खर्च करून कोणतेही काम दिसत नाही. वरिष्ठांच्या दिरंगाईमुळे सर्व भाविक व जनता हैैराण झाली आहे. त्यामुळे तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी उमाजी जुनघरे, मुखरू शेंडे, मनोज हेजीब, चंदू गेडाम, रामूजी गायकवाड व नागरिकांनी केली आहे.मजुरांअभावी काम लांबणीवरकाम करणारे कारागिर राजस्थानचे असून ते प्रत्येक सणाला गावी जातात व १५ ते २० दिवस येत नसल्याने काम लांबणीवर पडते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग नागपूर (उपविभाग चंद्रपूर) यांच्या आदेशानुसार कंत्राटदाराने केवळ सहा लोकांची टिम घेऊन व गावातील मजुरांना हाताशी धरून मंदिराचे काम सुरू केले. राजस्थानातून काम करण्यास आलेले मजूर कुशल कामगार आहेत. संबंधित विभागाने कंत्राटदारामार्फत त्यांच्याकडून काम करण्यास सुरूवात केल्यानंतर दरवर्षी येणाºया विविध सणानिमित्त ते गावाकडे जातात. याचा परिणामी कामावर होतो. त्यामुळे जिल्ह्यातील कुशल मजुरांना काम द्यावे, अशी मागणीही होत आहे.