शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मार्र्कं डा देवस्थानचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:34 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्र्कं डादेव येथील अतिशय पुरातन व ऐतिहासिक मार्र्कंडादेव देवस्थानच्या दुरूस्तीचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. सदर काम पूर्ण केव्हा होईल याची प्रतीक्षा असंख्य भाविकांना आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मंदिर दुरूस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

ठळक मुद्देदुरूस्तीला वेग नाही : पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्र्कं डादेव येथील अतिशय पुरातन व ऐतिहासिक मार्र्कंडादेव देवस्थानच्या दुरूस्तीचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. सदर काम पूर्ण केव्हा होईल याची प्रतीक्षा असंख्य भाविकांना आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मंदिर दुरूस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.चार वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने मंदिर दुरूस्तीचे काम हाती घेतले. काम सुरू झाल्यानंतर सहा महिन्यात मंदिर दुरूस्तीचे काम करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांच्या उदासीनतेमुळे मंदिर दुरूस्तीचे काम पूर्णता रेंगाळले आहे.वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्या होणे व त्यांच्या जागी नवीन अधिकारी रूजू होणे यातच वेळ जात असल्याने मंदिर दुरूस्तीकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकाºयांचे लक्ष नसल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. भाविकांना अडचणी जाणवत आहेत.भारतीय पुरातत्त्व विभाग चंद्रपूर यांची यंत्रणा व नियंत्रणाखाली काम अतिशय संथगतीने सुरू आहे. चार वर्षापासून केवळ दगड छिललेले दिसतात. मुख्य मंदिरासह १४ शिवालय असून त्यांची डागडुजी देखील करायची असल्याने शासनाचे कोट्यवधी रूपये कुठे खर्च होत आहेत, हे समजायला मार्ग नाही. एवढा खर्च करून कोणतेही काम दिसत नाही. वरिष्ठांच्या दिरंगाईमुळे सर्व भाविक व जनता हैैराण झाली आहे. त्यामुळे तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी उमाजी जुनघरे, मुखरू शेंडे, मनोज हेजीब, चंदू गेडाम, रामूजी गायकवाड व नागरिकांनी केली आहे.मजुरांअभावी काम लांबणीवरकाम करणारे कारागिर राजस्थानचे असून ते प्रत्येक सणाला गावी जातात व १५ ते २० दिवस येत नसल्याने काम लांबणीवर पडते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग नागपूर (उपविभाग चंद्रपूर) यांच्या आदेशानुसार कंत्राटदाराने केवळ सहा लोकांची टिम घेऊन व गावातील मजुरांना हाताशी धरून मंदिराचे काम सुरू केले. राजस्थानातून काम करण्यास आलेले मजूर कुशल कामगार आहेत. संबंधित विभागाने कंत्राटदारामार्फत त्यांच्याकडून काम करण्यास सुरूवात केल्यानंतर दरवर्षी येणाºया विविध सणानिमित्त ते गावाकडे जातात. याचा परिणामी कामावर होतो. त्यामुळे जिल्ह्यातील कुशल मजुरांना काम द्यावे, अशी मागणीही होत आहे.