शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

मार्र्कं डा देवस्थानचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:34 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्र्कं डादेव येथील अतिशय पुरातन व ऐतिहासिक मार्र्कंडादेव देवस्थानच्या दुरूस्तीचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. सदर काम पूर्ण केव्हा होईल याची प्रतीक्षा असंख्य भाविकांना आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मंदिर दुरूस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

ठळक मुद्देदुरूस्तीला वेग नाही : पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्र्कं डादेव येथील अतिशय पुरातन व ऐतिहासिक मार्र्कंडादेव देवस्थानच्या दुरूस्तीचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. सदर काम पूर्ण केव्हा होईल याची प्रतीक्षा असंख्य भाविकांना आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मंदिर दुरूस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.चार वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने मंदिर दुरूस्तीचे काम हाती घेतले. काम सुरू झाल्यानंतर सहा महिन्यात मंदिर दुरूस्तीचे काम करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांच्या उदासीनतेमुळे मंदिर दुरूस्तीचे काम पूर्णता रेंगाळले आहे.वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्या होणे व त्यांच्या जागी नवीन अधिकारी रूजू होणे यातच वेळ जात असल्याने मंदिर दुरूस्तीकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकाºयांचे लक्ष नसल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. भाविकांना अडचणी जाणवत आहेत.भारतीय पुरातत्त्व विभाग चंद्रपूर यांची यंत्रणा व नियंत्रणाखाली काम अतिशय संथगतीने सुरू आहे. चार वर्षापासून केवळ दगड छिललेले दिसतात. मुख्य मंदिरासह १४ शिवालय असून त्यांची डागडुजी देखील करायची असल्याने शासनाचे कोट्यवधी रूपये कुठे खर्च होत आहेत, हे समजायला मार्ग नाही. एवढा खर्च करून कोणतेही काम दिसत नाही. वरिष्ठांच्या दिरंगाईमुळे सर्व भाविक व जनता हैैराण झाली आहे. त्यामुळे तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी उमाजी जुनघरे, मुखरू शेंडे, मनोज हेजीब, चंदू गेडाम, रामूजी गायकवाड व नागरिकांनी केली आहे.मजुरांअभावी काम लांबणीवरकाम करणारे कारागिर राजस्थानचे असून ते प्रत्येक सणाला गावी जातात व १५ ते २० दिवस येत नसल्याने काम लांबणीवर पडते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग नागपूर (उपविभाग चंद्रपूर) यांच्या आदेशानुसार कंत्राटदाराने केवळ सहा लोकांची टिम घेऊन व गावातील मजुरांना हाताशी धरून मंदिराचे काम सुरू केले. राजस्थानातून काम करण्यास आलेले मजूर कुशल कामगार आहेत. संबंधित विभागाने कंत्राटदारामार्फत त्यांच्याकडून काम करण्यास सुरूवात केल्यानंतर दरवर्षी येणाºया विविध सणानिमित्त ते गावाकडे जातात. याचा परिणामी कामावर होतो. त्यामुळे जिल्ह्यातील कुशल मजुरांना काम द्यावे, अशी मागणीही होत आहे.