शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची कामे थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:01 IST

चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसच बाकी असताना या वर्षात प्रशासकीय मंजुरीसाठी अडलेली जलयुक्त शिवार अभियानातील कामे अधांतरी आहेत.

ठळक मुद्देकेवळ ३० टक्के कामांना मंजुरी : वर्ष संपत आले तरी ७० टक्के कामे बाकी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसच बाकी असताना या वर्षात प्रशासकीय मंजुरीसाठी अडलेली जलयुक्त शिवार अभियानातील कामे अधांतरी आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रस्तावित कामे पूर्ण होणे तर दूर, जेमतेम ३० टक्केच कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हे अभियान यावर्षी जिल्ह्यात थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येत आहे.या आर्थिक वर्षातील कामे संपवून नवीन आर्थिक वर्षाचे नियोजन करण्याचे वेध सर्व विभागांना लागले आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियानाचे नियोजन आणि समन्वय ठेवणाºया कृषी विभागाचे काम यावर्षी चांगलेच ढेपाळले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रस्तावित केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील ३५६७ कामांपैकी फेब्रुवारीपर्यंत केवळ १०८५ कामांनाच प्रशासकीय मंजुरी मिळाली.सिंचन प्रकल्पांची कमतरता असल्यामुळे या जिल्ह्यात शेतीला सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे सिंचन सुविधा वाढविण्यासाठी राज्य शासनाने २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्या वर्षी या अभियानात जिल्ह्यातील १५२ गावांची निवड केली होती. दुसºया वर्षी १६९ गावांचा समावेश करण्यात आला. वर्ष २०१७-१८ मध्ये १११ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या गावांमध्ये जलसंधारणाची ३५६७ कामे प्रस्तावित करण्यात आली. मात्र आर्थिक वर्ष संपत असताना केवळ १०८५ कामांनाच मंजुरी मिळाल्याने प्रशासनाकडूनच या अभियानाला खिळ लावली जात असल्याचे दिसते.ज्या १११ गावांमध्ये वेगवेगळ्या विभागांकडून जलसंधारणाची कामे नियोजित केली होती त्यात कृषि विभागामार्फत सर्वाधिक १९४६, मनरेगा मधून २०९, वनविभागामार्फत १२९६, जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत ४०, पाटबंधारे विभागामार्फत ४५ आणि चंद्रपूर पाटबंधारे विभागामार्फत २ कामे प्रस्तावित केली होती.सर्व विभागांनी त्यांच्या लक्ष्यानुसार कामांचे नियोजन केले होते. पण मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव गेल्यानंतर त्यातील त्रृटी दूर करून सुधारित प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आले. एवढेच नाही तर ही कामे नरेगा (म.गां.राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजना) मार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले. नरेगामार्फत कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कामांना मंजुरी दिली जाते. पण फेब्रुवारीपर्यंत ती मंजुरी अनेक कामांना मिळालीच नाही.पुढील वर्षीसाठी १०४ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीची अनेक कामे शिल्लक असली तरी पुढील वर्षीच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात २०१८-१९ मध्ये १०४ गावांची निवड करण्यात आली आहे. मात्र ती गावे कोणती आणि तिथे कोणकोणती कामे केली जाणार याचे याचे नियोजन अद्याप झालेले नाही. ते नियोजन झाल्यानंतरच एकूण कामांची संख्या आणि त्यावर खर्च केल्या जाणाºया निधीची माहिती स्पष्ट होणार आहे.