शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची कामे थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:01 IST

चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसच बाकी असताना या वर्षात प्रशासकीय मंजुरीसाठी अडलेली जलयुक्त शिवार अभियानातील कामे अधांतरी आहेत.

ठळक मुद्देकेवळ ३० टक्के कामांना मंजुरी : वर्ष संपत आले तरी ७० टक्के कामे बाकी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसच बाकी असताना या वर्षात प्रशासकीय मंजुरीसाठी अडलेली जलयुक्त शिवार अभियानातील कामे अधांतरी आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रस्तावित कामे पूर्ण होणे तर दूर, जेमतेम ३० टक्केच कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हे अभियान यावर्षी जिल्ह्यात थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येत आहे.या आर्थिक वर्षातील कामे संपवून नवीन आर्थिक वर्षाचे नियोजन करण्याचे वेध सर्व विभागांना लागले आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियानाचे नियोजन आणि समन्वय ठेवणाºया कृषी विभागाचे काम यावर्षी चांगलेच ढेपाळले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रस्तावित केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील ३५६७ कामांपैकी फेब्रुवारीपर्यंत केवळ १०८५ कामांनाच प्रशासकीय मंजुरी मिळाली.सिंचन प्रकल्पांची कमतरता असल्यामुळे या जिल्ह्यात शेतीला सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे सिंचन सुविधा वाढविण्यासाठी राज्य शासनाने २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्या वर्षी या अभियानात जिल्ह्यातील १५२ गावांची निवड केली होती. दुसºया वर्षी १६९ गावांचा समावेश करण्यात आला. वर्ष २०१७-१८ मध्ये १११ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या गावांमध्ये जलसंधारणाची ३५६७ कामे प्रस्तावित करण्यात आली. मात्र आर्थिक वर्ष संपत असताना केवळ १०८५ कामांनाच मंजुरी मिळाल्याने प्रशासनाकडूनच या अभियानाला खिळ लावली जात असल्याचे दिसते.ज्या १११ गावांमध्ये वेगवेगळ्या विभागांकडून जलसंधारणाची कामे नियोजित केली होती त्यात कृषि विभागामार्फत सर्वाधिक १९४६, मनरेगा मधून २०९, वनविभागामार्फत १२९६, जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत ४०, पाटबंधारे विभागामार्फत ४५ आणि चंद्रपूर पाटबंधारे विभागामार्फत २ कामे प्रस्तावित केली होती.सर्व विभागांनी त्यांच्या लक्ष्यानुसार कामांचे नियोजन केले होते. पण मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव गेल्यानंतर त्यातील त्रृटी दूर करून सुधारित प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आले. एवढेच नाही तर ही कामे नरेगा (म.गां.राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजना) मार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले. नरेगामार्फत कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कामांना मंजुरी दिली जाते. पण फेब्रुवारीपर्यंत ती मंजुरी अनेक कामांना मिळालीच नाही.पुढील वर्षीसाठी १०४ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीची अनेक कामे शिल्लक असली तरी पुढील वर्षीच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात २०१८-१९ मध्ये १०४ गावांची निवड करण्यात आली आहे. मात्र ती गावे कोणती आणि तिथे कोणकोणती कामे केली जाणार याचे याचे नियोजन अद्याप झालेले नाही. ते नियोजन झाल्यानंतरच एकूण कामांची संख्या आणि त्यावर खर्च केल्या जाणाºया निधीची माहिती स्पष्ट होणार आहे.