शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची कामे थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:01 IST

चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसच बाकी असताना या वर्षात प्रशासकीय मंजुरीसाठी अडलेली जलयुक्त शिवार अभियानातील कामे अधांतरी आहेत.

ठळक मुद्देकेवळ ३० टक्के कामांना मंजुरी : वर्ष संपत आले तरी ७० टक्के कामे बाकी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसच बाकी असताना या वर्षात प्रशासकीय मंजुरीसाठी अडलेली जलयुक्त शिवार अभियानातील कामे अधांतरी आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रस्तावित कामे पूर्ण होणे तर दूर, जेमतेम ३० टक्केच कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हे अभियान यावर्षी जिल्ह्यात थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येत आहे.या आर्थिक वर्षातील कामे संपवून नवीन आर्थिक वर्षाचे नियोजन करण्याचे वेध सर्व विभागांना लागले आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियानाचे नियोजन आणि समन्वय ठेवणाºया कृषी विभागाचे काम यावर्षी चांगलेच ढेपाळले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रस्तावित केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील ३५६७ कामांपैकी फेब्रुवारीपर्यंत केवळ १०८५ कामांनाच प्रशासकीय मंजुरी मिळाली.सिंचन प्रकल्पांची कमतरता असल्यामुळे या जिल्ह्यात शेतीला सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे सिंचन सुविधा वाढविण्यासाठी राज्य शासनाने २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्या वर्षी या अभियानात जिल्ह्यातील १५२ गावांची निवड केली होती. दुसºया वर्षी १६९ गावांचा समावेश करण्यात आला. वर्ष २०१७-१८ मध्ये १११ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या गावांमध्ये जलसंधारणाची ३५६७ कामे प्रस्तावित करण्यात आली. मात्र आर्थिक वर्ष संपत असताना केवळ १०८५ कामांनाच मंजुरी मिळाल्याने प्रशासनाकडूनच या अभियानाला खिळ लावली जात असल्याचे दिसते.ज्या १११ गावांमध्ये वेगवेगळ्या विभागांकडून जलसंधारणाची कामे नियोजित केली होती त्यात कृषि विभागामार्फत सर्वाधिक १९४६, मनरेगा मधून २०९, वनविभागामार्फत १२९६, जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत ४०, पाटबंधारे विभागामार्फत ४५ आणि चंद्रपूर पाटबंधारे विभागामार्फत २ कामे प्रस्तावित केली होती.सर्व विभागांनी त्यांच्या लक्ष्यानुसार कामांचे नियोजन केले होते. पण मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव गेल्यानंतर त्यातील त्रृटी दूर करून सुधारित प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आले. एवढेच नाही तर ही कामे नरेगा (म.गां.राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजना) मार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले. नरेगामार्फत कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कामांना मंजुरी दिली जाते. पण फेब्रुवारीपर्यंत ती मंजुरी अनेक कामांना मिळालीच नाही.पुढील वर्षीसाठी १०४ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीची अनेक कामे शिल्लक असली तरी पुढील वर्षीच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात २०१८-१९ मध्ये १०४ गावांची निवड करण्यात आली आहे. मात्र ती गावे कोणती आणि तिथे कोणकोणती कामे केली जाणार याचे याचे नियोजन अद्याप झालेले नाही. ते नियोजन झाल्यानंतरच एकूण कामांची संख्या आणि त्यावर खर्च केल्या जाणाºया निधीची माहिती स्पष्ट होणार आहे.