शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाच हजार घरकुलांचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:17 IST

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण अंतर्गत) सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० हजार १७५ घरकुलांना आॅनलाईन मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव अद्यापही झाले नसल्याने रेती मिळेनाशी झाली आहे.

ठळक मुद्देरेतीअभावी कामे प्रभावित : जिल्हाभरात १३५ घरकूल कामांना प्रारंभच नाही

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण अंतर्गत) सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० हजार १७५ घरकुलांना आॅनलाईन मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव अद्यापही झाले नसल्याने रेती मिळेनाशी झाली आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील घरकुलांचे काम प्रभावित झाले आहेत. तीन वर्षांतील मिळून अद्यापही पाच हजार ४९ घरकुलाचे काम अपूर्ण स्थितीत आहे.२०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांचे मिळून गडचिरोली जिल्ह्याला एकूण १० हजार १८७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी १० हजार १८७ घरकूल मंजूर करण्यात आले. त्यापैकी १० हजार १७५ घरकुलांच्या कामांना आॅनलाईन मंजुरी प्रदान करण्यात आली. यामध्ये आहेरी तालुक्यात १ हजार ९४२, आरमोरी तालुक्यात ७२५, भामरागड तालुक्यात २४६, चामोर्शी ८६३, देसाईगंज ४४६, धानोरा ७९७, एटापल्ली ५४९, गडचिरोली ६५७, कोरची ६५७, कुरखेडा ११२१, मुलचेरा २८५ व सिरोंचा तालुक्यात १ हजार ८८७ घरकुलांचा समावेश आहे. तीन वर्षांचे मिळून आतापर्यंत बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांची टक्केवारी केवळ ५०.३२ आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेल्या एकूण ३ हजार १३१ लाभार्थ्यांना चवथ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम आॅनलाईन स्वरूपात अदा करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १३५ घरकुलांच्या कामांना अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही. यामध्ये अहेरी तालुक्यातील सर्वाधिक ६८, एटापल्ली १७, सिरोंचा १२, भामरागड ९ व चामोर्शी तालुक्यातील १० घरकुलांचा समावेश आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात रेती मिळत नसल्याने घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. याशिवाय शासकीय इमारतीचे कामे प्रभावित झाले आहेत. रेतीसाठी घरकूल लाभार्थी ट्रॅक्टरधारकांकडे धावपळ करीत आहेत.कंत्राटदारांचा रस्ता खडीकरणावर भरलिलाव प्रक्रियेअभावी रेतीचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरासह जिल्हाभरातील कंत्राटदारांचा रस्ता खडीकरणाच्या कामावर भर असल्याचे दिसून येत आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे ठप्प आहेत.अहेरी उपविभागात कामाची गती मंदावलीप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अहेरी उपविभागाच्या मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड व अहेरी या पाच तालुक्यात २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालावधीत हजारो घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. मात्र या उपविभागात ४० टक्केच घरकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. रेतीघाटांअभावी रेती मिळणे कठीण झाले आहे. तसेच लाभार्थ्यांची अनास्था, प्रशासकीय उदासीनता व इतर कारणामुळे अहेरी उपविभागात घरकुला बांधकामात गती नसल्याचे दिसून येत आहे.