शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

विद्यापीठ पदभरतीत ‘आळीपाळी’ शब्दाने केला ओबीसींचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

गोंडवाना विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आदी संवर्गातील प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे. जवळपास प्राध्यापकांची ३६ पदे भरली जात असताना यामध्ये ओबीसी संवर्गासाठी एकही पद राखीव असल्याचे दिसून येत नाही.

ठळक मुद्देओबीसी महासंघाचा आरोप : ३६ पदांमध्ये ओबीसींना ठेंगा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे. या पदभरतीकरिता लावलेल्या बिंदुनामावलीत विशिष्ट प्रवर्गासाठी ‘आळीपाळी’ने एक पद असे निश्चित केले आहे. याच आळीपाळी शब्दाने ओबीसी संवर्गातील उमेदवारांचा घात केला असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे.गोंडवाना विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आदी संवर्गातील प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे. जवळपास प्राध्यापकांची ३६ पदे भरली जात असताना यामध्ये ओबीसी संवर्गासाठी एकही पद राखीव असल्याचे दिसून येत नाही. या संदर्भात कुलपती तथा महामहीम राज्यपाल यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण व संबंधित विभागाच्या मंत्र्यांना निवेदन देऊन ओबीसींवरील अन्याय दूर करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. मात्र अजूनपर्यंत शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने ओबीसींमध्ये शासनाप्रती रोष व्यक्त केला जात असल्याची माहिती प्रा.येलेकर यांनी दिली.मिळालेल्या माहितीनुसार, गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ३६ पदांकरिता राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रमाणित केलेल्या बिंदूनामावलीनुसार, विशिष्ट काही प्रवर्गांना एकत्रीत करून १ पद राखीव करून आळीपाळीने असा शब्द प्रयोग केला आहे. राज्य शासनाने प्रमाणित केलेल्या बिंदुनामावलीतील ‘आळीपाळी’ या शब्दाचा अर्थ काय? असा प्रश्नही प्रा. येलेकर यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच संबंधीत बिंदुनामावलीच्या खाली चार पदांसाठी आरक्षण निश्चित करून दिले आहे. त्यात राज्यात ओबीसींना १९ टक्के आरक्षण असतानाही एकही पद दर्शविण्यात आले नाही. त्यामुळे या आळीपाळी या शब्दाचा अर्थबोध होत नसल्याचा आरोपही ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर यांनी केला आहे.बिंदूनामावलीसाठी शासन निर्णयच नाहीविशेष बाब म्हणजे २२ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार पदभरतीसाठी निर्मगीत केलेल्या २१ ऑगस्ट २०१९ च्या निर्णयाला स्थगीती देण्यात आली आहे. याचाच अर्थ सध्या पदभरतीसंदर्भात बिंदुनामावली तयार करण्याकरिता कोणताही शासन निर्णय नाही. तरीही राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या शासन निर्णयाच्या आधारे विशिष्ट संवर्गासाठी एक पद आळीपाळीने राखीव घोषित करून पदाचे आरक्षणही निश्चित केले आहे? असा प्रश्न प्रा.येलेकर यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालय