शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांनी लावलेल्या आगीत लाकूड डेपो जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 13:34 IST

एप्रिल महिन्यात पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून जिल्ह्यात अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरू आहे.

मुलचेरा (गडचिरोली)- एप्रिल महिन्यात पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून जिल्ह्यात अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यात गुरुवारी नक्षलवाद्यांनी मुलचेरा येथील महाराष्ट्र वनविकास महामंडळाचा लाकूड डेपो जाळून मोठे नुकसान केले. रात्री लावलेली ही आग सकाळी 10 वाजताही विझलेली नव्हती.रात्री 1 वाजताच्या सुमारास आलेल्या सशस्त्र नक्षल्यांनी आधी वनविभागाच्या नाक्यावर जाऊन तेथील रेकॉर्ड रस्त्यावर टाकून जाळले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांच्या वसाहतीलगत असलेल्या लाकूड डेपोला आग लावली. विशेष म्हणजे रात्रभर ही आग धगधगत असल्याने वनविकास महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सकाळी 6.30 वाजतापासून आग विझविण्यास सुरुवात झाली. गडचिरोली नगर परिषद, अहेरी नगर पंचायतच्या तँकरने आग विझविने सुरूच होते. या आगीत सागवानासह अन्य प्रजातींची हजारो लाकडे जळून राख झाली. गेल्या 8 मे रोजी नक्षलवाद्यांनी याच परिसरात दोन ट्रक जाळले होते. तर 19 मे च्या मध्यरात्री आलापल्ली-भामरागड मार्गावरील तलवाडा येथील लाकूड डेपोला आग लावली होती. त्यानंतर पाचव्या दिवशीच मुलचेरा येथे पुन्हा अग्नितांडव घडवून आणले. नक्षल्यांनी घटनास्थळी काही पत्रके टाकली असून त्यात 22 एप्रिल रोजी कसनासूर जंगलात झालेल्या चकमकीचा निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ नक्षल्यांनी 19 ते 25 मेदरम्यान जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. काल नक्षल्यांनी रस्त्यावर झाडे आडवी टाकून भामरागड-कोठी रस्ता अडविला होता.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली