शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

नक्षलवाद्यांनी लावलेल्या आगीत लाकूड डेपो जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 13:34 IST

एप्रिल महिन्यात पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून जिल्ह्यात अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरू आहे.

मुलचेरा (गडचिरोली)- एप्रिल महिन्यात पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून जिल्ह्यात अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यात गुरुवारी नक्षलवाद्यांनी मुलचेरा येथील महाराष्ट्र वनविकास महामंडळाचा लाकूड डेपो जाळून मोठे नुकसान केले. रात्री लावलेली ही आग सकाळी 10 वाजताही विझलेली नव्हती.रात्री 1 वाजताच्या सुमारास आलेल्या सशस्त्र नक्षल्यांनी आधी वनविभागाच्या नाक्यावर जाऊन तेथील रेकॉर्ड रस्त्यावर टाकून जाळले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांच्या वसाहतीलगत असलेल्या लाकूड डेपोला आग लावली. विशेष म्हणजे रात्रभर ही आग धगधगत असल्याने वनविकास महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सकाळी 6.30 वाजतापासून आग विझविण्यास सुरुवात झाली. गडचिरोली नगर परिषद, अहेरी नगर पंचायतच्या तँकरने आग विझविने सुरूच होते. या आगीत सागवानासह अन्य प्रजातींची हजारो लाकडे जळून राख झाली. गेल्या 8 मे रोजी नक्षलवाद्यांनी याच परिसरात दोन ट्रक जाळले होते. तर 19 मे च्या मध्यरात्री आलापल्ली-भामरागड मार्गावरील तलवाडा येथील लाकूड डेपोला आग लावली होती. त्यानंतर पाचव्या दिवशीच मुलचेरा येथे पुन्हा अग्नितांडव घडवून आणले. नक्षल्यांनी घटनास्थळी काही पत्रके टाकली असून त्यात 22 एप्रिल रोजी कसनासूर जंगलात झालेल्या चकमकीचा निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ नक्षल्यांनी 19 ते 25 मेदरम्यान जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. काल नक्षल्यांनी रस्त्यावर झाडे आडवी टाकून भामरागड-कोठी रस्ता अडविला होता.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली