शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

स्वस्त धान्य दुकाने चालविण्यास महिला बचत गट सरसावले

By admin | Updated: October 5, 2014 23:05 IST

विविध व्यवसाय करणाऱ्या स्वयंसहायता बचत गटांनी आता आपले लक्ष स्वस्त धान्य दुकानांकडे वळविले असून जिल्हाभरात सुमारे २०७ स्वस्त धान्य दुकानांची मालकी बचत गटांकडे असून ही दुकाने

गडचिरोली : विविध व्यवसाय करणाऱ्या स्वयंसहायता बचत गटांनी आता आपले लक्ष स्वस्त धान्य दुकानांकडे वळविले असून जिल्हाभरात सुमारे २०७ स्वस्त धान्य दुकानांची मालकी बचत गटांकडे असून ही दुकाने अत्यंत यशस्वीपणे चालविली जात आहेत. बहुतांश बचत गटांचे व्यवहार पारदर्शक असल्याने नागरिक व प्रशासनही बचत गटांना पहीली पसंती दर्शवित आहेत. व्यवसाय सुरू करण्यासाठी फार मोठ्या भांडवलाची गरज भासते. एवढे भांडवल गोळा करणे सर्वसामान्य नागरिकाला शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने बचतगट ही संकल्पना पुढे आणली. या बचत गटांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना व्यवसाय करण्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणही दिले जात असल्याने मागील १० वर्षात महाराष्ट्र राज्यात लाखो व जिल्ह्यात हजारो बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. महिन्याचे ४० ते ५० रूपये गोळा केले जातात. १५ महिलांचे महिन्याचे ६०० ते १ हजार रूपये गोेळा होतात. याला जोड बँकेकडून कर्ज घेऊन शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, कुकूटपालन, शेती कसणे, खतखरेदी करून विकणे, यांच्यासह इतर अनेक व्यवसाय करण्यात येत होते. या व्यवसायातून जिल्ह्यातील हजारो महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. सदर व्यवसाय अत्यंत यशस्वीपणे राबवून स्वावलंबी बनल्या आहेत. गरीब नागरिकांना शासनाच्यावतीने सवलतीच्या दरातील धान्याचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानांच्यावतीने करण्यात येते. या दुकानात केरोसीनचाही पुरवठा केला जातो. मात्र स्वस्त दुकानदार सवलतीचे धान्य खुल्या बाजारात चढ्या दराने विकतात. त्याचबरोबर केरोसीनही वाहनधारकांना जास्त दराने विकल्या जात होते. यातून स्वस्त धान्य दुकानदार गब्बर बनला असला तरी गरीबांना मात्र हक्काचे धान्य मिळत नव्हते, या स्वस्त धान्य दुकानदारांना वठणीवर आणन्यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांचे परवाने बचत गटांना प्राधान्याने देण्याचे धोरण अवलंबिले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकुण १ हजार १८६ स्वस्त धान्य दुकाने असून त्यापैकी सुमारे २०७ म्हणजेच २५ टक्के दुकानांची मालकी बचत गटांकडे आहे. यामुळे दुकानदारांच्या हेकेखोरीला फार मोठा लगाम लागला आहे. दुकानदारापेक्षा बचत गटांचा व्यवहार अत्यंत पारदर्शक असल्याने नागरिकही बचत गटांच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या दुकानांच्या सेवेबाबत समाधानी असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)