शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

स्वस्त धान्य दुकाने चालविण्यास महिला बचत गट सरसावले

By admin | Updated: October 5, 2014 23:05 IST

विविध व्यवसाय करणाऱ्या स्वयंसहायता बचत गटांनी आता आपले लक्ष स्वस्त धान्य दुकानांकडे वळविले असून जिल्हाभरात सुमारे २०७ स्वस्त धान्य दुकानांची मालकी बचत गटांकडे असून ही दुकाने

गडचिरोली : विविध व्यवसाय करणाऱ्या स्वयंसहायता बचत गटांनी आता आपले लक्ष स्वस्त धान्य दुकानांकडे वळविले असून जिल्हाभरात सुमारे २०७ स्वस्त धान्य दुकानांची मालकी बचत गटांकडे असून ही दुकाने अत्यंत यशस्वीपणे चालविली जात आहेत. बहुतांश बचत गटांचे व्यवहार पारदर्शक असल्याने नागरिक व प्रशासनही बचत गटांना पहीली पसंती दर्शवित आहेत. व्यवसाय सुरू करण्यासाठी फार मोठ्या भांडवलाची गरज भासते. एवढे भांडवल गोळा करणे सर्वसामान्य नागरिकाला शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने बचतगट ही संकल्पना पुढे आणली. या बचत गटांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना व्यवसाय करण्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणही दिले जात असल्याने मागील १० वर्षात महाराष्ट्र राज्यात लाखो व जिल्ह्यात हजारो बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. महिन्याचे ४० ते ५० रूपये गोळा केले जातात. १५ महिलांचे महिन्याचे ६०० ते १ हजार रूपये गोेळा होतात. याला जोड बँकेकडून कर्ज घेऊन शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, कुकूटपालन, शेती कसणे, खतखरेदी करून विकणे, यांच्यासह इतर अनेक व्यवसाय करण्यात येत होते. या व्यवसायातून जिल्ह्यातील हजारो महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. सदर व्यवसाय अत्यंत यशस्वीपणे राबवून स्वावलंबी बनल्या आहेत. गरीब नागरिकांना शासनाच्यावतीने सवलतीच्या दरातील धान्याचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानांच्यावतीने करण्यात येते. या दुकानात केरोसीनचाही पुरवठा केला जातो. मात्र स्वस्त दुकानदार सवलतीचे धान्य खुल्या बाजारात चढ्या दराने विकतात. त्याचबरोबर केरोसीनही वाहनधारकांना जास्त दराने विकल्या जात होते. यातून स्वस्त धान्य दुकानदार गब्बर बनला असला तरी गरीबांना मात्र हक्काचे धान्य मिळत नव्हते, या स्वस्त धान्य दुकानदारांना वठणीवर आणन्यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांचे परवाने बचत गटांना प्राधान्याने देण्याचे धोरण अवलंबिले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकुण १ हजार १८६ स्वस्त धान्य दुकाने असून त्यापैकी सुमारे २०७ म्हणजेच २५ टक्के दुकानांची मालकी बचत गटांकडे आहे. यामुळे दुकानदारांच्या हेकेखोरीला फार मोठा लगाम लागला आहे. दुकानदारापेक्षा बचत गटांचा व्यवहार अत्यंत पारदर्शक असल्याने नागरिकही बचत गटांच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या दुकानांच्या सेवेबाबत समाधानी असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)