शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

महिलाशक्तीला कमी लेखून चालणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:05 IST

महिला आता सुशिक्षित झाल्या असून निर्णय घेण्यास सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे महिलांना कमी लेखू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.

ठळक मुद्देचित्रा वाघ यांचे प्रतिपादन : राष्ट्रवादी काँग्रेसचा आलापल्ली येथे महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : महिला आता सुशिक्षित झाल्या असून निर्णय घेण्यास सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे महिलांना कमी लेखू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.आलापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या. मेळाव्याला माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम, अहेरी विधानसभा प्रमुख राजेंद्र वैद्य, माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान जि.प.बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, बेबी उईके, जि.प.सदस्य ऋषी पोरतेट, जि.प.सदस्य ग्यानकुमारी कौशी, एटापल्लीच्या सभापती बेबी लेकामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला कार्यकर्ते शाहीन हकीम, पं.स.सदस्य प्रांजली शेंबळकर, माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, आलापल्लीचे माजी सरपंच रेणुका कुळमेथे, ग्रा.पं.सदस्य कैलास कोरेत आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना चित्रा वाघ म्हणाल्या, स्वयंपाक घरातील किराणा, गॅस सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुप्पट झाले आहे. त्यामुळे जगने कठीण झाले आहे. नोटबंदी पूर्णपणे फसली आहे. महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विद्यमान शासनाला धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे. महिलांबाबत बेताल व्यक्तव्य करण्याची हिंमत सरकारमधील मंत्री करीत आहेत. त्यांना त्यांची जागा दाखविणे आवश्यक आहे.नारीशक्तीमध्ये फारमोठी ताकद आहे, ही ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. महिलांनी स्वत:च्या अधिकार व हक्काबाबत जागरूक असले पाहिजे. स्वत:च्या संसाराचा गाडा हाकतानाच बाहेरच्याही जगाकडे लक्ष घालले पाहिजे. महिलांनी राजकारणात पुढे यावे, महिलांमध्ये फार मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन चित्रा वाघ यांनी केले.कार्यक्रमाला अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेकडो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या शाहिन हकीम यांची जिल्हा महिला कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस