शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

महिलांचा दारूविक्रेत्यांना सज्जड दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:18 IST

तब्बल आठ महिने दारूविक्री बंद असलेल्या सूर्यडोंगरी गावात विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती मिळताच किटाळी येथील गाव संघटनेच्या महिलांनी गावात दाखल होत विक्रेत्यांना सज्जड दम दिला. दारूविक्री पुन्हा सुरू केल्यास पोलीस तक्रार करणार असल्याचा इशारा महिलांनी दारूविक्रेत्यांना दिला.

ठळक मुद्देसूर्यडोंगरीतील अवैध दारूविक्री । बंद झालेली दारूविक्री आठ महिन्यानंतर पुन्हा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तब्बल आठ महिने दारूविक्री बंद असलेल्या सूर्यडोंगरी गावात विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती मिळताच किटाळी येथील गाव संघटनेच्या महिलांनी गावात दाखल होत विक्रेत्यांना सज्जड दम दिला. दारूविक्री पुन्हा सुरू केल्यास पोलीस तक्रार करणार असल्याचा इशारा महिलांनी दारूविक्रेत्यांना दिला.आठ महिन्यापूर्वी इंजेवारी, पेठतुकूम, देलोडा बु., देऊळगाव आणि किटाळी येथील गावकऱ्यांनी मिळून बंद केलेली सूर्यडोंगरीची दारूविक्री खूप गाजली होती. या पाचही गावांनी मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून आपल्या गावात दारूविक्री बंद करण्याचा ठराव घेत विक्री बंद केली. पण सूर्यडोंगरी गाव याला अपवाद होते. गावात मोठ्या प्रमाणात दारूचा महापूर होता. त्यामुळे हे गाव बाकी गावांसाठी डोकेदुखी ठरले होते. परिणामी या पाचही गावांतील लोकांनी सूर्यडोंगरी येथील दारूविक्री बंद करण्यासाठी मोठी बैठक घेत आरमोरी पोलीस स्टेशनवर धडक दिली.लोकांचा निर्धार पाहून उपविभागीय दंडाधिकारी विशाल मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी सूर्यडोंगरी गावात त्याच रात्री बैठक घेत विक्रेत्यांना दारूविक्री बंद करण्याविषयी अल्टिमेटम दिला होता. विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सूर्यडोंगरीची दारूविक्री थांबली. ही पाचही गावे दारूविक्रेत्यांवर नजर ठेवून होतीच. पण आठ महिन्यांनी येथील दारूविक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती किटाळीच्या महिलांना मिळाली. दारू गाळून त्याची बाहेर तस्करी केली जात असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे महिलांनी गुरुवारी सूर्यडोंगरी गाव गाठत विक्रेत्यांना दम देत विक्री बंद करण्यास सांगितले.आरमोरी पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली असून कारवाईची मागणी महिलांनी केली आहे. नव्याने पुन्हा दारूविक्री सुरू होऊ देणार नसल्याचा निर्धार किटाळी येथील महिलांनी व्यक्त केला. पोलीस कधी कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.परिसराच्या गावातील दारूडे सकाळ व सायंकाळच्या सुमारास सूर्यडोंगरी येथे दाखल व्हायचे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची गर्दी असायची.घनदाट जंगलाचा आधारसूर्यडोंगरी गावापासून देलोडापर्यंत घनदाट जंगल आहे. शिवाय हा जंगल सिर्सी गावापर्यंत पसरला आहे. लहान टेकड्या असल्याने घनदाट जंगलाचा आधार घेऊन अवैध दारूविक्रेते दारू गाळून त्याची विक्री करीत असत. काही दिवस या जंगलात बिबट्याचेही बस्तान होते. तरी सुद्धा दारूडे रात्री उशिरापर्यंत येथून फिरत असत.

टॅग्स :liquor banदारूबंदी