शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी उभी केली आर्थिक ताकद

By admin | Updated: October 20, 2015 01:40 IST

विधवा, गरीब, घटस्फोटित महिलांनी एकत्र येऊन एक आर्थिक शक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य निर्माण केला आहे, ते वैष्णोदेवी

विधवा, गरीब, घटस्फोटित महिलांनी एकत्र येऊन एक आर्थिक शक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य निर्माण केला आहे, ते वैष्णोदेवी महिला बचत गट आरमोरीने. २००४ मध्ये सुरू झालेल्या या बचत गटाचे काम रोपट्याच्या रूपाने सुरू होऊन वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. ज्या महिलांना कधीकाळी आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी येत होत्या. त्यावर मात करीत आता या बचतगटाने यशाची नवी दारे आपल्यासाठीच उघडली आहेत. यातून त्यांनी मोठी भरारी घेतली असून हा बचत गट आता इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. २ सप्टेंबर २००४ रोजी आशा विजय बोडणे यांच्या पुढाकाराने वैष्णोदेवी महिला बचत गटाची स्थापना झाली. बोडणे या घटस्फोटित महिला होत्या. आर्थिक अडचण त्यांना नेहमीच प्रगतीसाठी अडचणीची ठरत होती. यावर मात करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्या एका मुलीसोबत माहेरी राहायला आल्यावर वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्याकडेही त्या पैशासाठी हात पसरू शकत नव्हत्या. अशावेळी त्यांनी घराशेजारी राहणाऱ्या विधवा, गरीब महिलांना एकत्र आणून १५ महिलांची मोट बांधली व यांच्या माध्यमातून एका बचतगटाची निर्मिती केली. सुरूवातीला बँकेकडून बचत गटासाठी पाच हजार रूपयांचे कर्ज उचलले. तीन एकर शेती केली व बँकेच्या पैशाची परतफेड करून उरलेल्या रकमेत बस स्टँडच्या बाजूला झुणका-भाकर व भाजी-पुरीचा व्यवसाय सुरू केला. काही महिला जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकाचे काम करू लागल्या. याच काळात एका महिलेचा पती आजारी पडला. महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी एकत्र मिळून त्या महिलेसाठी आर्थिक सहाय्य उभे केले. बचत गटा व्यतिरिक्तही शोषित, पीडित, विधवा महिलांसाठी अर्थसहाय्य देण्याचे काम त्यांनी सुरू केले. एका महिलेला केळी विकण्याचा व्यवसाय टाकण्यासाठी आर्थिक पाठबळ या बचत गटाने दिले. आरमोरी शहरात स्थापन झालेला हा महिलांचा पहिला बचत गट होता. याचा आदर्श घेत कालांतराने अनेक बचत गट निर्माण होत गेले. परंतु महिलांसाठी आर्थिक प्रगतीचे पहिले पाऊल टाकण्याचे काम आशा बोडणे यांच्या नेतृत्वातील वैष्णोदेवी महिला बचत गटाने केले. या बचत गटाच्या यशाची भरारी सर्वदूर पसरल्यावर शासनाने त्यांच्याकडे रेशन दुकान व केरोसीनचा परवाना दिला. त्या माध्यमातून २०११ मध्ये रॉकेल व्यवसाय या बचत गटाने सुरू केला. १५ महिला आज यामध्ये काम करीत आहेत. यात अध्यक्ष म्हणून प्रतिभा नानाजी कोल्हे, सचिव आशा बोडणे, उषा तिजारे, मीरा खोब्रागडे, वेणू राजगिरे, कमल जवजांलकर, विमल मेश्राम, जिजा कोल्हे, प्रेमिला कोल्हे, प्रेमिला तिजारे, भारती चिलबुले, लता कोल्हे, सुशीला कोल्हे, ज्योती घाटुरकर, सिंधू सोरते यांचा समावेश आहे. यात एक घटस्फोटित महिला असून सात विधवा महिलांना घेऊन १५ महिलांची ही नारीशक्ती त्यांच्याच जीवनातला आर्थिक अंधार दूर करण्यासाठी पणतीच्या भूमिकेतून काम करीत आहेत.