शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

योग्य मोबदल्याशिवाय रेल्वेसाठी जमिनी देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:27 IST

वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी अधिग्रहित करण्यात येत असलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमिनी देणार नसल्याचा अल्टिमेटम स्थानिक शेतकºयांनी शासनाला दिला असल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचा पवित्रा : देसाईगंज येथे अधिकाºयांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी अधिग्रहित करण्यात येत असलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमिनी देणार नसल्याचा अल्टिमेटम स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाला दिला असल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी शासकीयस्तरावरून जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या यासंदर्भात शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी १२ जानेवारी रोजी देसाईगंज तहसील कार्यालयात शेतकरी, महसूल विभाग व रेल्वे प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी रेल्वे मार्गात जाणार आहेत. अशांना शासकीय शेतजमीन खरेदी विक्रीच्या आधारावर किंमत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेत ज्यांना शेती विकण्याची गरज होती अशांनी मिळेल त्या भावात आपल्या शेतजमिनी विकून आपली गरज भागवली. मात्र शेतकऱ्यांना आपली जमीन विकण्याची गरजच नाही, शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली शेती अधिग्रहित करण्यात येणार असल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या रोजीरोटीला कायमचे मुकावे लागणार आहे.देण्यात येत असलेली रक्कम देसाईगंज तालुक्याच्या तीन गावांसाठी स्थानिक खरेदी-विक्रीच्या आधारावर देय ठरविण्यात आले असून देसाईगंज, कुरुड, कोंढाळा या तीन गावांसाठी वेगवेगळ्या किंमती ठरवण्यात आल्या आहेत. जमिनीच्या दरात फार मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे. वास्तवात गरज असलेल्या शेतकऱ्यांनीच आपल्या शेतजमिनी विकल्या असल्याने खरेदी विक्रीच्या आधारावर शेतजमिनींची किंमत न लावता सरसकट एकाच दराने जमिनीची किंमत लावून जाहीर करण्यात आलेल्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देणे अपेक्षित आहे. मात्र असे न करता संबंधित प्रशासनाने स्थानिक जागेच्या खरेदी-विक्रीच्या नोंदीवरुन जमिनीची किंमत लावली असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होणारा आहे.रेल्वे विभागाने नांदेड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाचपटीने मोबदला देण्याचे ठरविण्यात आले आहे. तर शेगाव येथील वर्तमान बाजार भावाप्रमाणे ५० हजार रुपये प्रती एकर दर देण्यात आला असताना येथील शेतकऱ्यांवर असा अन्याय का?असाही प्रश्न उपस्थित केला आहे. प्रकल्पग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांना रेल्वे विभागात नोकरीची हमी द्यावी, शेतकऱ्यांना प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे अशी रास्त मागणी पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार उपेश अंबादे, रेल्वे विभागाचे अधिकारी, बाधित शेतकरी उपस्थित होते.