शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बस आगारातील रेस्ट रूम सुविधांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

खोलीच्या दोन्ही बाजूला पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढत रेस्टरूमपर्यंत पोहोचावे लागते. रेस्टरूमचा परिसर कधीच झाडला जात नाही. त्यामुळे या परिसरात चिखल निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्यासोबत वाहत आलेल्या पाण्याच्या बॉटलचा खच पडला आहे. मागील महिनाभरापासून साचून असलेल्या पाण्यात कचरा कुजल्याने दुर्गंधी येत आहे.

ठळक मुद्देसाचलेल्या पाण्यातून काढावी लागते वाट : चिखलासोबत दुर्गंधी, गडचिरोली आगारातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाहक व चालकांना काही काळ विश्रांती करता यावी, यासाठी गडचिरोली आगारात रेस्टरूम आहे. मात्र या रेस्टरूममध्ये कोणत्याही सुविधा नाही. विशेष म्हणजे पाणी व चिखल तुडवत रेस्टरूम गाठावी लागते.गडचिरोली आगारात शेकडो वाहक व चालक आहेत. पहिली बसफेरी नेऊन आणल्यानंतर दुसरी बसफेरीला अर्धा ते एक तास वेळ राहतो. कधीकधी दुसऱ्या मार्गावरील बसफेरी दिली जाते. याही बसफेरीला वेळ राहतो. मधल्या कालावधीत वाहक व चालकांना विश्रांती मिळावी, तसेच जेवण करता यावे, यासाठी एक स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी सदर खोली बसस्थानकाच्या अगदी समोर होती. बसस्थानकाचे काम सुरू झाल्यानंतर आता आगाराच्या आवारातील एक खोली उपलब्ध करून दिली आहे. मात्र या खोलीत सोयीसुविधांचा पूर्णपणे अभाव आहे.खोलीच्या दोन्ही बाजूला पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढत रेस्टरूमपर्यंत पोहोचावे लागते. रेस्टरूमचा परिसर कधीच झाडला जात नाही. त्यामुळे या परिसरात चिखल निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्यासोबत वाहत आलेल्या पाण्याच्या बॉटलचा खच पडला आहे. मागील महिनाभरापासून साचून असलेल्या पाण्यात कचरा कुजल्याने दुर्गंधी येत आहे. खिडक्या व मुख्य द्वाराच्या झडपा तुटल्या आहेत. टिनांच्या पत्र्यांमधून पावसाचे पाणी गळते. मागील अनेक वर्षांपासून रंगरंगोटी करण्यात आली नाही. त्यामुळे भिंतीवर चित्रविचित्र डाग पडले आहेत. या ठिकाणी दोन गाद्या आहेत. मात्र त्यांची अवस्था बघितल्यानंतर त्यांना गाद्या म्हणावे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. एक बेड आहे, मात्र तोही मोडका आहे, एक पाय तुटला असल्याने तुटलेला पाय पेटीवर ठेवून आहे. अशा बेडवर चालक व वाहक खरोखरच झोपून आराम करत असतील काय, असा प्रश्न उपस्थित होते.वीजेअभावी पंखे बंद; रात्री राहते अंधारवीजेचे महत्त्व ओळखून देशातील एकही कुटुंब विजेपासून वंचित राहू नये, यासाठी गरीब कुटुंबाला केंद्र शासन मोफत वीज पुरवठा उपलब्ध करून देते. मात्र एसटीच्या रेस्टरूममध्ये वीजसुद्धा उपलब्ध नाही. परिणामी रात्री या रेस्टरूममध्ये अंधार राहतो. पंखे सुद्धा बंद आहेत. दोन एकराच्या परिसरात असलेल्या एसटी आगारात शेकडो वीज दिवे आहेत. विभागीय कार्यालय, बसस्थानक, आगार व्यवस्थापक कार्यालय या ठिकाणचे महिन्याचे वीज बिल ५० हजार रुपयांपेक्षा अधिक येते. त्यात एसटीची धुरा सांभाळणाऱ्या वाहक व चालकांसाठी एक लाईट सुद्धा एसटी व्यवस्थापन उपलब्ध करून देत नसल्याने वाहक व चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.वाहक व चालकांना विश्रांती मिळावी, यासाठी रेस्टरूमची संकल्पना प्रत्येक आगारात आहे. मात्र गडचिरोली आगारातील रेस्टरूम बघितल्यानंतर या खोलीला रेस्टरूम म्हणावे काय, असा प्रश्न उपस्थित होते. सुविधा नसल्याने वाहक व चालक या ठिकाणी न थांबता. आगार परिसरातील झाडाखाली थांबतात.

टॅग्स :state transportएसटी