शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

२०० शाळा शिक्षकांविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:54 IST

आॅनलाईन बदल्यांदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास २०० शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नाही. या शाळा शिक्षकांविना पोरक्या पडल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे नुकसान : आॅनलाईन बदलीचा परिणाम, दुर्गम भागातील शाळांमध्ये पदे रिक्त

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅनलाईन बदल्यांदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास २०० शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नाही. या शाळा शिक्षकांविना पोरक्या पडल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांमधील बहुतांश गावे अतिशय दुर्गम आहेत. काही गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही. पावसाळ्यात या गावांचा जगाशी संपर्क तुटतो. अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेल्या या गावांमध्ये जाणारी पायवाट सुध्दा अतिशय बिकट आहे. जिल्हा मुख्यालयापासून या तालुक्यांमधील गावांचे अंतर १५० किमीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या गावांमध्ये सेवा देण्यास इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षक तयार होत नाही.आॅनलाईन बदली दरम्यान २० शाळांचे पसंतीक्रम शिक्षकांना द्यायचे होते. मात्र बहुतांश शिक्षकांनी सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांमधील शाळांची निवडच केली नाही. त्यामुळे या शाळांना शिक्षकच मिळाले नाही. शिक्षक बदलीनंतर ४०० शिक्षक विस्थापित झाले होते. मात्र याही शिक्षकांनी अतिशय दुर्गम भागातील शाळांची निवड केली नाही. परिणामी या शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही २०० शाळांना शिक्षकच उपलब्ध झाले नाही. ज्या शाळांमध्ये शिक्षक नाही, अशा शाळांमध्ये दोन शिक्षकी शाळांमधील एका शिक्षकाला प्रतिनियुक्ती दिली जात आहे. शिक्षक नसलेल्या शाळा दुर्गम भागातील असल्याने या शाळांमध्ये शिक्षक जाण्यास तयार नाही. मात्र कारवाईचा बडगा दाखवून त्यांना संबंधित शाळेवर नेमले जात आहे. यामुळे दोन शिक्षकी शाळेत आता एकच शिक्षक राहणार आहे. एक शिक्षक चार वर्ग सांभाळणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे सुध्दा शैक्षणिक नुकसान होणार आहे. बंद शाळांवर काही शिक्षकांची नियुक्ती झाली आहे, त्यांना विद्यार्थी असलेल्या शाळेत नियुक्ती द्यावी अशी मागणी आहे.भामरागडातील २५ शाळा पोरक्याभामरागड हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्गम व आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ९२ शाळा आहेत. या तालुक्यातील शाळांची शिक्षकांनी निवडच केली नाही. परिणामी बदली आटोपल्यानंतर या तालुक्यातील २५ शाळा शिक्षकाविना राहिल्या आहेत. तर ३७ शाळांमध्ये एकच शिक्षक आहे. २५ शाळांमध्ये प्रत्येकी एक शिक्षक देऊनही काही शाळांना शिक्षकच मिळणार नाही. परिणामी दुसऱ्या तालुक्यातील शिक्षकांना या शाळेत प्रतिनियुक्ती द्यावी लागणार आहे. मात्र सदर शिक्षक रूजू होण्यास सहजासहजी तयार होणार नाही. त्यासाठी त्यांना कारवाईचा धाक दाखवावा लागणार आहे.ज्या शाळांमध्ये दोन शिक्षक आहेत. अशा शाळांमधील एका शिक्षकाला एकही शिक्षक नसलेल्या शाळेत तात्पुरती नियुक्ती देण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार शिक्षकांचे समायोजन सुरू आहे. एकही शाळा शिक्षकाविना बंद राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल.- पी. एच. उरकुडे,प्राथमिक शिक्षणाधिकारीपेसा कायद्याचे उल्लंघनजी गावे पेसा अंतर्गत मोडतात, ती गावे आदिवासी बहुल आहेत. जिल्हा परिषद स्तरावर बदली करताना या गावांना प्रथम प्राधान्य देऊन तेथील शिक्षकांच्या जागा भरल्या जात होत्या. त्यानंतर उर्वरित शाळांना प्राधान्य दिले जात होते. मात्र आॅनलाईन बदली दरम्यान पेसा कायद्याचे उल्लंघन झाले आहे. शिक्षक नसलेल्या २०० शाळांपैकी बहुतांश शाळा पेसा अंतर्गत मोडणाऱ्या आहेत.आंतर जिल्हा बदलीमुळे गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास ३०० शिक्षक बदलून गेले. त्यांच्या ऐवजी केवळ २० ते ३० शिक्षक जिल्ह्यात आले. परिणामी रिक्त जागांची संख्या वाढली आहे.आॅनलाईन बदलीची प्रक्रिया आता पुढच्यावर्षी शिवाय राबविणे शक्य नाही. त्यामुळे संबंधित शाळांमधील अध्यापनाचे काम प्रतिनियुक्ती दिलेल्या शिक्षकांनाच सांभाळावे लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक