शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

सहा महिन्यांच्या आतच बंधाऱ्याला पडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:32 IST

धानोरा : नदीनाल्यांतील संपूर्ण पाणी वाहून जाऊ नये. अधिकाधिक पाणी साचून राहून जमिनीत मुरावे, यासाठी धानोरा तालुक्यातील करेमर्का येथील ...

धानोरा : नदीनाल्यांतील संपूर्ण पाणी वाहून जाऊ नये. अधिकाधिक पाणी साचून राहून जमिनीत मुरावे, यासाठी धानोरा तालुक्यातील करेमर्का येथील नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ब्रिज-कम-बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु, सहा महिन्यांच्या आतच बंधाऱ्याला भगदाड पडून सर्व पाणी वाहून गेले. त्यामुळे येथील नागरिकांनी बंधाऱ्याच्या बांधकामाबद्दल पश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या बंधाऱ्याची पक्की दुरुस्ती लवकर करावी, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.

धानाेरा तालुक्यातील सालेभट्टी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या करेमर्का गावालगत नदी आहे. पावसाळ्यात गावातील नागरिकांना नदी पोहून जावे लागत होते. त्याशिवाय, दुसरा रस्ताच नाही. येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांची माेठी अडचण हाेत हाेती. नागरिकांच्या सततच्या मागणीमुळे या नदीवर नाबार्ड योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ व सार्वजनिक बांधकाम उपविभाग धानोराअंतर्गत काेट्यवधी रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात आले. पूल बांधकामासोबतच पावसाचे पाणी वाहून जाऊ नये. पाणी साचून राहावे, यासाठी ब्रिज-कम-बंधारा बांधण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील हा पहिलाच ब्रिज-कम-बंधारा आहे. ४ सप्टेंबर २०२० रोजी पूल व बंधाऱ्याचे उद्घाटन पार पडले. पुलाला जोडूनच पाच मीटरचे १२ आर्चटाइप गाळे बांधण्यात आले. त्याची उंची दोन पॉइंट ४० मीटर ठेवण्यात आली. यामुळे येथे पावसाचे पाणी साचून त्याचा उपयोग ढवळी, करेमर्का, जपतलाई, वडगाव गावातील नदीकाठालगतच्या शेतीला व पशुपक्ष्यांना हाेणार, अशी याेजना हाेती. सुरुवातीला दोन ते तीन किमीपर्यंत पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीसह विहिरीतील पाण्याची पातळी वाढण्यास झाला. हा उद्देश समाेर ठेवून जिल्ह्यात अशा प्रकारचा पहिलाच बंधारा पुलाला जाेडून बांधण्यात आला. परंतु, उद्घाटन होऊन सहा महिने उलटले नाही तर बंधाऱ्याला भगदाड पडले. येथील संपूर्ण पाणी वाहून गेले आहे. ज्या उद्देशाने बंधारा बांधण्यात आला, तो हेतूच असफल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करेमर्का येथील बाबुराव तुलावी, गणपत नरोटे, मनकू तुलावी, गणपत कोरेटी, रवींद्र नरोटे, मन्साराम कोल्हे, नाजुकराव मडावी, महागू मडावी, मोहन उसेंडी, धनीराम तुलावी, शंकर तुलावी, मानकू कुमोटी, घिसू कुमोटी, विकास तुलावी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

उन्हाळ्यापूर्वीच बंधारा काेरडा

नदी-नाल्यातील संपूर्ण पाणी वाहून जाऊ नये, यासाठी ब्रिज-कम-बंधारा ही संकल्पना अस्तित्त्वात आली. यानुसार धानाेरा तालुक्यातील करेमर्का गावालगतच्या नदीवर पूल बांधकामासह अर्धवर्तुळाकार पद्धतीने १२ आर्चटाइप गाळे बांधण्यात आले. परंतु याेग्य प्रकारे बांधकाम न झाल्याने पहिल्याच पावसात बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यामुळे ज्या उद्देशाने बंधारा बांधण्यात आला, त्याच उद्देशाला हरताळ फासला गेला. तीव्र उन्हाळा सुरू हाेण्यापूर्वीच बंधाऱ्यातील नदीपात्र काेरडे पडले आहे.