शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांच्या आतच बंधाऱ्याला पडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:32 IST

धानोरा : नदीनाल्यांतील संपूर्ण पाणी वाहून जाऊ नये. अधिकाधिक पाणी साचून राहून जमिनीत मुरावे, यासाठी धानोरा तालुक्यातील करेमर्का येथील ...

धानोरा : नदीनाल्यांतील संपूर्ण पाणी वाहून जाऊ नये. अधिकाधिक पाणी साचून राहून जमिनीत मुरावे, यासाठी धानोरा तालुक्यातील करेमर्का येथील नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ब्रिज-कम-बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु, सहा महिन्यांच्या आतच बंधाऱ्याला भगदाड पडून सर्व पाणी वाहून गेले. त्यामुळे येथील नागरिकांनी बंधाऱ्याच्या बांधकामाबद्दल पश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या बंधाऱ्याची पक्की दुरुस्ती लवकर करावी, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.

धानाेरा तालुक्यातील सालेभट्टी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या करेमर्का गावालगत नदी आहे. पावसाळ्यात गावातील नागरिकांना नदी पोहून जावे लागत होते. त्याशिवाय, दुसरा रस्ताच नाही. येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांची माेठी अडचण हाेत हाेती. नागरिकांच्या सततच्या मागणीमुळे या नदीवर नाबार्ड योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ व सार्वजनिक बांधकाम उपविभाग धानोराअंतर्गत काेट्यवधी रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात आले. पूल बांधकामासोबतच पावसाचे पाणी वाहून जाऊ नये. पाणी साचून राहावे, यासाठी ब्रिज-कम-बंधारा बांधण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील हा पहिलाच ब्रिज-कम-बंधारा आहे. ४ सप्टेंबर २०२० रोजी पूल व बंधाऱ्याचे उद्घाटन पार पडले. पुलाला जोडूनच पाच मीटरचे १२ आर्चटाइप गाळे बांधण्यात आले. त्याची उंची दोन पॉइंट ४० मीटर ठेवण्यात आली. यामुळे येथे पावसाचे पाणी साचून त्याचा उपयोग ढवळी, करेमर्का, जपतलाई, वडगाव गावातील नदीकाठालगतच्या शेतीला व पशुपक्ष्यांना हाेणार, अशी याेजना हाेती. सुरुवातीला दोन ते तीन किमीपर्यंत पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीसह विहिरीतील पाण्याची पातळी वाढण्यास झाला. हा उद्देश समाेर ठेवून जिल्ह्यात अशा प्रकारचा पहिलाच बंधारा पुलाला जाेडून बांधण्यात आला. परंतु, उद्घाटन होऊन सहा महिने उलटले नाही तर बंधाऱ्याला भगदाड पडले. येथील संपूर्ण पाणी वाहून गेले आहे. ज्या उद्देशाने बंधारा बांधण्यात आला, तो हेतूच असफल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करेमर्का येथील बाबुराव तुलावी, गणपत नरोटे, मनकू तुलावी, गणपत कोरेटी, रवींद्र नरोटे, मन्साराम कोल्हे, नाजुकराव मडावी, महागू मडावी, मोहन उसेंडी, धनीराम तुलावी, शंकर तुलावी, मानकू कुमोटी, घिसू कुमोटी, विकास तुलावी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

उन्हाळ्यापूर्वीच बंधारा काेरडा

नदी-नाल्यातील संपूर्ण पाणी वाहून जाऊ नये, यासाठी ब्रिज-कम-बंधारा ही संकल्पना अस्तित्त्वात आली. यानुसार धानाेरा तालुक्यातील करेमर्का गावालगतच्या नदीवर पूल बांधकामासह अर्धवर्तुळाकार पद्धतीने १२ आर्चटाइप गाळे बांधण्यात आले. परंतु याेग्य प्रकारे बांधकाम न झाल्याने पहिल्याच पावसात बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यामुळे ज्या उद्देशाने बंधारा बांधण्यात आला, त्याच उद्देशाला हरताळ फासला गेला. तीव्र उन्हाळा सुरू हाेण्यापूर्वीच बंधाऱ्यातील नदीपात्र काेरडे पडले आहे.