शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

वादळी पावसाने घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:51 IST

चामोर्शी तालुक्यातील आष्टी, चपराळा परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. तर काही ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडले.

ठळक मुद्देआष्टी परिसर । अनेक ठिकाणी कवेलू, टिनपत्रे उडाली; वीज खांब तुटल्याने पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी, चपराळा परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. तर काही ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडले. परिणामी या भागातील वीज पुरवठा रात्रभर खंडित होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.आष्टी परिसरात शुक्रवारी ३ वाजतापासून अचानक वादळ आले. वादळवाऱ्यासह पावसालाही सुरूवात झाली. या परिसरात कुनघाडा, ठाकरी, चपराळा, चौडमपल्ली, मार्र्कं डा (कं.) आदी गावातील अनेक नागरिकांच्या घराच्या कवेलू उडाल्या. तसेच टिनपत्रे उडाले. कवेलू घर परिसरात पडल्याने ते फुटले. याशिवाय घराच्या छतावरील फाटेही अस्ताव्यस्त झाले. काही ठिकाणी विद्युत खांब रस्त्यावर कोसळल्याने रात्रभर वीज पुरवठा खंडित होता. दुसºया दिवशी विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उशिरापर्यंत वीज दुरूस्तीचे काम सुरूकेले. परंतु एका दिवसाचे हे काम नसल्याने नागरिकांना दुसºया दिवशीही रात्र अंधारातच काढावी लागली.चपराळा येथील काही नागरिकांच्या घरावरील कवेलू वादळवाºयाने उडाले. तसेच टिनपत्रे खाली कोसळले. सिमेंट पत्रे उडून खाली पडून फुटले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. वादळीवाºयासह पाऊस आल्याने अनेक नागरिकांच्या मातीच्या घराच्या भिंती कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना रात्रभर प्रचंड त्रास सहन करावा लागला. या भागात अनेक शेतकºयांच्या आंबा पिकाचे नुकसान झाले. सध्या आंब्यात कठीण कोई निर्माण होण्याचा कालावधी आहे. याच कालावधीत अनेक नागरिक आंब्याचे लोणचे टाकतात. परंतु वादळवाºयाने बहुतांश झाडावरील निम्म्यापेक्षा अधिक आंबे खाली गळून प्रचंड नुकसान झाले. चपराळा येथील मनोहर आदे, पत्रू निकोडे, कल्पना मेश्राम, ईश्वर आदे यांच्या घरावरील कवेलू तसेच टिन वादळाने उडाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाचा जोरदार फटका या परिसराला बसला.पंचनामे करण्याची मागणीआष्टी परिसरातील आठ ते दहा गावाला शुक्रवारच्या वादळी पावसाचा जोरदार फटका बसला. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू व टिनपत्रे उडाली. मातीच्या भिंतीही कोसळल्या. त्यामुळे महसूल विभागाने या परिसरातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे झोपडीवजा घरे असलेल्या नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. गवताच्या झोपड्यांवरील गवत वादळाने उडाले. नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाई के व्हा मिळेल, याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊस