शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

३६ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ महापुराची पुनरावृत्ती हाेणार? सिराेंचा तालुक्यातील नागरिकांची ससेहाेलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2022 12:47 IST

सिराेंचा शहर प्राणहिता नदीच्या काठावर वसले आहे. प्राणहिता नदीचे पाणी गाेदावरी नदीत येते. गाेदावरी नदीचे वाढलेले पाणी सिराेंचा शहरात शिरते. यात मेडिगड्डा प्रकल्पाची भर पडली आहे.

कौसर खान

सिराेंचा (गडचिरोली) : सिराेंचा शहरासह तालुक्यात ३६ वर्षांपूर्वी म्हणजे सन १९८६ च्या ऑगस्ट महिन्यात प्राणहिता व गाेदावरी नदीला पूर आल्याने नागरिकांचे जनजीवन त्यावेळी विस्कळीत झाले हाेते. आता मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाचे पाणी सिराेंचा शहरासह तालुक्यात शिरत असल्याने यंदा जुलै महिन्यात दाेनदा पूरपरिस्थिती निर्माण झाली. मेडिगड्डा धरणामुळे ३६ वर्षांपूर्वीच्या त्या ‘महापुराची’ आता वारंवार पुनरावृत्ती हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या गाेदावरी नदीवर तेलंगणा सरकारने मेडिगड्डा प्रकल्प उभारला. मात्र यंदा निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे हा प्रकल्प तेलंगणातील नागरिकांसाठी तारक, तर महाराष्ट्राच्या हद्दीतील अर्थात सिराेंचा शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी मारक ठरत आहे. मेडिगड्डा प्रकल्प पूर्णत्वास आल्यापासून दरवर्षीच सिराेंचा तालुक्यातील शेतीला माेठा फटका बसत आहे. परिणामी या भागातील शेतकरी पूरपरिस्थितीने उद्ध्वस्त हाेण्याच्या मार्गावर आहे.

या वर्षी जुलै महिन्यात पावसाने कहरच केला. अहेरी उपविभागाच्या पाचही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. सिराेंचा तालुक्यात तब्बल आठवडाभर पुराने थैमान घातले हाेते. एकीकडे वरून पडणारा पाऊस, तर दुसरीकडे गाेदावरी व प्राणहिता नद्यांच्या पुराच्या पाण्याने वेढा घातल्यामुळे सिराेंचा शहर व तालुक्यात जलमय स्थिती निर्माण झाली. तालुक्याच्या सीमेकडील २० गावांतील नागरिकांवर संकट ओढवले. घरामध्ये कंबरभर पाणी शिरले. या पुराची पूर्वकल्पना आल्याने प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवून पूर ओसरेपर्यंत त्यांची सर्व व्यवस्था केली.

सिराेंचा शहर प्राणहिता नदीच्या काठावर वसले आहे. प्राणहिता नदीचे पाणी गाेदावरी नदीत येते. गाेदावरी नदीचे वाढलेले पाणी सिराेंचा शहरात शिरते. यात मेडिगड्डा प्रकल्पाची भर पडली आहे. प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे पाण्याचा लाेंढा सिराेंचा शहरासह तालुक्यात शिरला. घरातील साहित्य भिजून मोठे नुकसान झाले.

३० गावांमध्ये शिरले पुराचे पाणी

तेलंगणा सरकारने गाेदावरी नदीवर उभारलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाचे पाणी साेडल्याने सिराेंचा शहर व तालुक्यात पूरपरिस्थिती अधिकच बिकट झाली. प्राणहिता व गाेदावरी नदीच्या पुराचे पाणी सिराेंचा शहरासह तालुक्यातील ३० गावांमध्ये शिरले. नगरम, धर्मपुरी, आरडा, अंकिसा व असरअल्ली या भागांतील नागरिकांचे पुरामुळे माेठे नुकसान झाले. पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे या भागातील कापूस व मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले.

शहरातील रस्त्यांची पुरामुळे वाट लागली. सिराेंचा शहराच्या बाजारपेठेतही पाणी शिरल्याने व्यावसायिक व नागरिकांचे नुकसान झाले. एकूणच पूरपरिस्थितीने नागरिकांचे कंबरडे माेडले.

पूनर्वसन हाच पर्याय

मेडिगड्डा प्रकल्पामुळे सिरोंचा शहर व तालुक्याला दरवर्षी अशापद्धतीने पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील पूरबाधित नागरिकांना दुसरीकडे जागा उपलब्ध करून त्यांचे पूनर्वसन करणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी शासनाने निर्णय घेऊन सर्वसोयीसुविधा देऊन पूनर्वसन करण्याची गरज आहे.

टॅग्स :floodपूरGadchiroliगडचिरोली