शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

मानव-वन्यजीव संघर्षात व्यापणार का संपूर्ण जिल्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 23:24 IST

गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेती जंगलाला लागून आहे. तसेच अनेक गावांनासुद्धा जंगलांनी वेढले आहे. वनांवर आधारित येथील लाेकांचे जीवनमान अवलंबून आहे. यापूर्वीही जिल्ह्यात वाघांचा वावर हाेता; परंतु गत चार वर्षांत जेवढी जीवितहानी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात झाली तेवढी कधीच झाली नाही.

गोपाल लाजुरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात जानेवारी २०१९ पासून मानव-वन्यजीव संघर्षाला जोरदार सुरुवात झाली. याच महिन्यात जिल्ह्यातील पहिला बळी वाघाने घेतला. त्यानंतर गेल्या ४ वर्षांत आतापर्यंत म्हणजेच १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाघांनी ४३ तर, बिबट्यांची ५ लोकांचा बळी घेतला. यात गडचिरोली तालुक्यातील सर्वाधिक २५ लोकांचा समावेश आहे. हे हल्ले केवळ गडचिराेली व वडसा वनविभागातच झाले नाही तर बिबट्यांनी आलापल्ली, सिराेंचा वनविभागातही लाेकांचा बळी घेतला. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षात संपूर्ण जिल्हा व्यापणार काय, असा प्रश्न आहे.गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेती जंगलाला लागून आहे. तसेच अनेक गावांनासुद्धा जंगलांनी वेढले आहे. वनांवर आधारित येथील लाेकांचे जीवनमान अवलंबून आहे. यापूर्वीही जिल्ह्यात वाघांचा वावर हाेता; परंतु गत चार वर्षांत जेवढी जीवितहानी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात झाली तेवढी कधीच झाली नाही. अशा प्रकारच्या घटना क्वचितच घडल्या असाव्यात. गत चार वर्षांपासून सुरू झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षानंतर वाघांचा वावर असलेल्या गावांमध्ये रोजंदारीवर देखरेख व कृती पथक गठित करण्यात आले. वन विभागातर्फे सदर पथक लोकांमध्ये जागृती करीत आहे; परंतु वाघांचे हल्ले व बळी जाण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. काही घटना जंगलात तर काही घटना अगदी शेतात व शेतशिवारात घडल्या. यातच देसाईगंज व भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील १३ लोकांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाला वन विभागाने १३ ऑक्टोबर २०२२ रोजी जेरबंद केले.

ती वाघिण केव्हा हाेणार जेरबंद?गडचिरोली तालुक्यातील ७ लोकांचा बळी घेणारी टी-६ वाघीण अद्याप जेरबंद झाली नाही. ३० नोव्हेंबरपर्यंत सदर वाघिणीला जेरबंद करण्याचे वन विभागापुढे आव्हान आहे. हल्लेखोर वाघ वेळीच जेरबंद न झाल्यास मानव-वन्यजीव संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अस्वलांनीही घेतले अनेक बळीगडचिराेली जिल्ह्यात वाघ-बिबट्यांची जेवढी दहशत आहे, तेवढीच दहशत अस्वलांचीही आहे. जिल्ह्यातील सर्वच वन विभागात अस्वलांचा वावर आहे; परंतु जीवितहानीच्या घटना भामरागड, आलापल्ली व सिराेंचा वनविभागात अधिक घडल्या आहे. दरवर्षी तेंदूपत्ता हंगामात हे हल्ले हाेतात. २२ जून २०२२ राेजी एटापल्ली तालुक्यातील बटेर येथील एका नागरिकाला अस्वलाने ठार केले हाेते. विशेषत: चामाेर्शी, मुलचेरा, काेरची, आरमाेरी तालुक्यात अस्वलांचे हल्ले झाले असून त्यात अनेकजण जखमी झाले.

आलापल्ली वन विभागात शिकारीचा धाेकागडचिराेली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या सर्वाधिक शिकारी आलापल्ली वन विभागात झाल्या आहेत. वन विभागाच्या कारवाईवरून हे प्रकार उघडकीसही आले आहेत. विद्युत प्रवाह तसेच फासे लावून ही शिकार केली जाते. यापासून वाघ, बिबट तसेच चितळ, सांबर व रानटी डुकरेसुद्धा सुटली नाहीत.

 

टॅग्स :Tigerवाघ