शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

मानव-वन्यजीव संघर्षात व्यापणार का संपूर्ण जिल्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 23:24 IST

गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेती जंगलाला लागून आहे. तसेच अनेक गावांनासुद्धा जंगलांनी वेढले आहे. वनांवर आधारित येथील लाेकांचे जीवनमान अवलंबून आहे. यापूर्वीही जिल्ह्यात वाघांचा वावर हाेता; परंतु गत चार वर्षांत जेवढी जीवितहानी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात झाली तेवढी कधीच झाली नाही.

गोपाल लाजुरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात जानेवारी २०१९ पासून मानव-वन्यजीव संघर्षाला जोरदार सुरुवात झाली. याच महिन्यात जिल्ह्यातील पहिला बळी वाघाने घेतला. त्यानंतर गेल्या ४ वर्षांत आतापर्यंत म्हणजेच १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाघांनी ४३ तर, बिबट्यांची ५ लोकांचा बळी घेतला. यात गडचिरोली तालुक्यातील सर्वाधिक २५ लोकांचा समावेश आहे. हे हल्ले केवळ गडचिराेली व वडसा वनविभागातच झाले नाही तर बिबट्यांनी आलापल्ली, सिराेंचा वनविभागातही लाेकांचा बळी घेतला. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षात संपूर्ण जिल्हा व्यापणार काय, असा प्रश्न आहे.गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेती जंगलाला लागून आहे. तसेच अनेक गावांनासुद्धा जंगलांनी वेढले आहे. वनांवर आधारित येथील लाेकांचे जीवनमान अवलंबून आहे. यापूर्वीही जिल्ह्यात वाघांचा वावर हाेता; परंतु गत चार वर्षांत जेवढी जीवितहानी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात झाली तेवढी कधीच झाली नाही. अशा प्रकारच्या घटना क्वचितच घडल्या असाव्यात. गत चार वर्षांपासून सुरू झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षानंतर वाघांचा वावर असलेल्या गावांमध्ये रोजंदारीवर देखरेख व कृती पथक गठित करण्यात आले. वन विभागातर्फे सदर पथक लोकांमध्ये जागृती करीत आहे; परंतु वाघांचे हल्ले व बळी जाण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. काही घटना जंगलात तर काही घटना अगदी शेतात व शेतशिवारात घडल्या. यातच देसाईगंज व भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील १३ लोकांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाला वन विभागाने १३ ऑक्टोबर २०२२ रोजी जेरबंद केले.

ती वाघिण केव्हा हाेणार जेरबंद?गडचिरोली तालुक्यातील ७ लोकांचा बळी घेणारी टी-६ वाघीण अद्याप जेरबंद झाली नाही. ३० नोव्हेंबरपर्यंत सदर वाघिणीला जेरबंद करण्याचे वन विभागापुढे आव्हान आहे. हल्लेखोर वाघ वेळीच जेरबंद न झाल्यास मानव-वन्यजीव संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अस्वलांनीही घेतले अनेक बळीगडचिराेली जिल्ह्यात वाघ-बिबट्यांची जेवढी दहशत आहे, तेवढीच दहशत अस्वलांचीही आहे. जिल्ह्यातील सर्वच वन विभागात अस्वलांचा वावर आहे; परंतु जीवितहानीच्या घटना भामरागड, आलापल्ली व सिराेंचा वनविभागात अधिक घडल्या आहे. दरवर्षी तेंदूपत्ता हंगामात हे हल्ले हाेतात. २२ जून २०२२ राेजी एटापल्ली तालुक्यातील बटेर येथील एका नागरिकाला अस्वलाने ठार केले हाेते. विशेषत: चामाेर्शी, मुलचेरा, काेरची, आरमाेरी तालुक्यात अस्वलांचे हल्ले झाले असून त्यात अनेकजण जखमी झाले.

आलापल्ली वन विभागात शिकारीचा धाेकागडचिराेली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या सर्वाधिक शिकारी आलापल्ली वन विभागात झाल्या आहेत. वन विभागाच्या कारवाईवरून हे प्रकार उघडकीसही आले आहेत. विद्युत प्रवाह तसेच फासे लावून ही शिकार केली जाते. यापासून वाघ, बिबट तसेच चितळ, सांबर व रानटी डुकरेसुद्धा सुटली नाहीत.

 

टॅग्स :Tigerवाघ