शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मानव-वन्यजीव संघर्षात व्यापणार का संपूर्ण जिल्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 23:24 IST

गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेती जंगलाला लागून आहे. तसेच अनेक गावांनासुद्धा जंगलांनी वेढले आहे. वनांवर आधारित येथील लाेकांचे जीवनमान अवलंबून आहे. यापूर्वीही जिल्ह्यात वाघांचा वावर हाेता; परंतु गत चार वर्षांत जेवढी जीवितहानी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात झाली तेवढी कधीच झाली नाही.

गोपाल लाजुरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात जानेवारी २०१९ पासून मानव-वन्यजीव संघर्षाला जोरदार सुरुवात झाली. याच महिन्यात जिल्ह्यातील पहिला बळी वाघाने घेतला. त्यानंतर गेल्या ४ वर्षांत आतापर्यंत म्हणजेच १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाघांनी ४३ तर, बिबट्यांची ५ लोकांचा बळी घेतला. यात गडचिरोली तालुक्यातील सर्वाधिक २५ लोकांचा समावेश आहे. हे हल्ले केवळ गडचिराेली व वडसा वनविभागातच झाले नाही तर बिबट्यांनी आलापल्ली, सिराेंचा वनविभागातही लाेकांचा बळी घेतला. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षात संपूर्ण जिल्हा व्यापणार काय, असा प्रश्न आहे.गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेती जंगलाला लागून आहे. तसेच अनेक गावांनासुद्धा जंगलांनी वेढले आहे. वनांवर आधारित येथील लाेकांचे जीवनमान अवलंबून आहे. यापूर्वीही जिल्ह्यात वाघांचा वावर हाेता; परंतु गत चार वर्षांत जेवढी जीवितहानी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात झाली तेवढी कधीच झाली नाही. अशा प्रकारच्या घटना क्वचितच घडल्या असाव्यात. गत चार वर्षांपासून सुरू झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षानंतर वाघांचा वावर असलेल्या गावांमध्ये रोजंदारीवर देखरेख व कृती पथक गठित करण्यात आले. वन विभागातर्फे सदर पथक लोकांमध्ये जागृती करीत आहे; परंतु वाघांचे हल्ले व बळी जाण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. काही घटना जंगलात तर काही घटना अगदी शेतात व शेतशिवारात घडल्या. यातच देसाईगंज व भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील १३ लोकांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाला वन विभागाने १३ ऑक्टोबर २०२२ रोजी जेरबंद केले.

ती वाघिण केव्हा हाेणार जेरबंद?गडचिरोली तालुक्यातील ७ लोकांचा बळी घेणारी टी-६ वाघीण अद्याप जेरबंद झाली नाही. ३० नोव्हेंबरपर्यंत सदर वाघिणीला जेरबंद करण्याचे वन विभागापुढे आव्हान आहे. हल्लेखोर वाघ वेळीच जेरबंद न झाल्यास मानव-वन्यजीव संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अस्वलांनीही घेतले अनेक बळीगडचिराेली जिल्ह्यात वाघ-बिबट्यांची जेवढी दहशत आहे, तेवढीच दहशत अस्वलांचीही आहे. जिल्ह्यातील सर्वच वन विभागात अस्वलांचा वावर आहे; परंतु जीवितहानीच्या घटना भामरागड, आलापल्ली व सिराेंचा वनविभागात अधिक घडल्या आहे. दरवर्षी तेंदूपत्ता हंगामात हे हल्ले हाेतात. २२ जून २०२२ राेजी एटापल्ली तालुक्यातील बटेर येथील एका नागरिकाला अस्वलाने ठार केले हाेते. विशेषत: चामाेर्शी, मुलचेरा, काेरची, आरमाेरी तालुक्यात अस्वलांचे हल्ले झाले असून त्यात अनेकजण जखमी झाले.

आलापल्ली वन विभागात शिकारीचा धाेकागडचिराेली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या सर्वाधिक शिकारी आलापल्ली वन विभागात झाल्या आहेत. वन विभागाच्या कारवाईवरून हे प्रकार उघडकीसही आले आहेत. विद्युत प्रवाह तसेच फासे लावून ही शिकार केली जाते. यापासून वाघ, बिबट तसेच चितळ, सांबर व रानटी डुकरेसुद्धा सुटली नाहीत.

 

टॅग्स :Tigerवाघ