शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

तीन महिन्यांत सव्वा दोन हजारांवर शौचालयांचे बांधकाम होईल का पूर्ण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:25 IST

रेती मिळेना, साहित्यही महागले : ३१ मार्चची डेडलाईन; लाभार्थ्यांची होतेय दमछाक

दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली: स्वच्छ भारत मिशन योजनेतंर्गत सन २०२४- २५ या आर्थिक वर्षातबाराही तालुक्यात मिळून एकूण ४ हजार वैयक्तीक शैचालयाचे काम मंजूर करण्यात आले. मात्र, आतापर्यंत निम्यापेक्षा कमी शौचालयाचे काम पूर्ण झाले असून अजूनही सव्वा दोन शौचालयांचे काम अपूर्ण आहे. येत्या तीन महिन्यांत या सर्व शौचालयांचे काम पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.

काही ठिकाणी अनुदानाचा पहिला हप्ता दिल्यानंतरही लाभार्थ्यांनी बांधकामास सुरुवात केलेली नाही. याला रेती व इतर बांधकाम साहित्याची अडचण कारणीभूत असल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी येत्या ३० मार्चपर्यंत शौचालयांचे काम पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. विहीत वेळेत शहरी व ग्रामीण भागातील शौचालये पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना केल्या आहे. संबंधित ग्रामसेवकांनी आपल्या गावातील वैयक्तिक शौचालयाचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना बिडीओंनी दिल्या आहेत. महिन्यातून दोनदा सभा बोलावून शौचालय बांधकामाचा आढावा अधिकारी घेत असल्याचे दिसून येत आहे.

असा आहे शौचालय बांधकामाचा तपशीलतालुका                 मंजूर शौचालये               पूर्ण कामे             अपूर्ण कामे अहेरी                          ५६८                              २३८                      ३३०आरमोरी                      ३५४                               १३३                      २२१भामरागड                    ५२९                               १२२                      ४०७चामोर्शी                       ३९८                               २८७                      १११देसाईगंज                     २०४                                १०२                      १०२धानोरा                         १६२                                ६५                        ९७एटापल्ली                      २०१                                ८१                        १२०गडचिरोली                    333                               २१०                       १२३कोरची                          २१४                               ७२                        १४२कुरखेडा                        १९६                               ९१                         १०५मुलचेरा                         ३४२                              १८०                        १६२सिरोंचा                         ६६३                               २४९                       ४१४

सार्वजनिक स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष हागणदारी मुक्त शहर व गाव हा दर्जा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. हा दर्जा टिकवण्यासाठी सार्वजनिक शौचालयांची देखभाल करणे अनिवार्य आहे. या शौचालयांत वीज व पाणीपुरवठा करणे, दरवाजे, शौचकुपे व्यवस्थित असणे आवश्यक आहे. त्यानुसार या शौचालयांची देखभाल दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. गडचिरोली शहरातही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे प्रशासनाकडून आता काय कार्यवाही केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अहेरी, भामरागड तालुका माघारला स्वच्छ भारत मिशन योजनेतंर्गत अहेरी उपविभागातही शौचालयांची कामे बरीच मंजूर करण्यात आली. मात्र, या भागातील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे या उपविभागात शौंचालयांच्या कामांना वेग नाही. अहेरी व भामरागड हे दोन तालुके शौचालय बांधकामात माघारले आहेत. भामरागड तालुक्यात सर्वाधिक ४०७ आणि अहेरी तालुक्यात ३३० शौचालयांचे काम अपूर्ण आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGadchiroliगडचिरोली