शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आयोगाला विनंती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 05:00 IST

देसाईगंज - गडचिरोली रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने आपला वाटा दिला नसल्याबद्दल विचारले असता, या कामासाठी केंद्राने तरी आपला वाटा दिला आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. आधीच काेरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यात केंद्राने राज्याच्या हक्काचे जीएसटीचे पैसे दिले नाहीत. या मार्गासाठी राज्य सरकार आपला वाटा देईलच, पण केंद्राने आधी आपला वाटा देऊन जमीन अधिग्रहणाचे काम सुरू करावे, अशी सूचना त्यांनी केली.

 लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर आक्षेप घेणारे याचिकाकर्ते हे भाजपचे धुळे येथील पदाधिकारी आहेत. ओबीसींना आरक्षण मिळू नये, यासाठी भाजपनेच रचलेले हे षड्यंत्र आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय दुर्दैवी असून, केवळ ओबीसींच्या हक्कावर गदा आणण्याऐवजी कायदेशीर मार्गाने हे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नये, अशी विनंती सरकारच्या वतीने निवडणूक आयोगाकडे केली जाईल, अशी माहिती ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रपरिषदेत दिली. यावेळी ना. वडेट्टीवार म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, पंकजा मुंडे यांनी ६ पत्र पाठवूनही त्यांना केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा दिला नाही. त्यावेळी त्यांनी आयोग का नेमला नाही आणि डेटा का बनविला नाही? आता केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीत जातनिहाय जनगणना करण्यास तयार नाही. यावरून सरकारची ओबीसींबद्दलची भूमिका काय आहे ते कळते. आम्ही दिलेले आरक्षण जिल्हानिहाय ५० टक्क्यांच्या आतच बसविले आहे. असे असताना ते रद्द करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. नगर पंचायत निवडणुकीत महाआघाडीतील पक्ष कुठे एकत्रीत तर कुठे स्वतंत्र लढणार आहेत. स्थानिक पातळीवरील समिकरणे पाहून आणि प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितले.पत्र परिषदेला युवक काॅंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सरचिटणीस डाॅ. नामदेव उसेंडी, सचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष सतीश विधाते, जि.प. सदस्य ॲड. राम मेश्राम, कुणाल पेंदाेरकर आदी उपस्थित हाेते. 

लोकसभेवरील काॅंग्रेसचा दावा कायमगेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गडचिरोली दौऱ्यात गडचिरोली लोकसभा क्षेत्रातून आता राष्ट्रवादी काँग्रेस लढेल, असे सांगितले होते. त्यावर बोलताना ना. वडेट्टीवार यांनी आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे आणि त्यावरील पक्षाचा दावा यापुढेही कायम राहील, असे सांगितले. 

रेल्वेसाठी केंद्र केव्हा पैसे देणार?देसाईगंज - गडचिरोली रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने आपला वाटा दिला नसल्याबद्दल विचारले असता, या कामासाठी केंद्राने तरी आपला वाटा दिला आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. आधीच काेरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यात केंद्राने राज्याच्या हक्काचे जीएसटीचे पैसे दिले नाहीत. या मार्गासाठी राज्य सरकार आपला वाटा देईलच, पण केंद्राने आधी आपला वाटा देऊन जमीन अधिग्रहणाचे काम सुरू करावे, अशी सूचना त्यांनी केली.

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार