शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- अम्ब्रीशराव

By admin | Updated: October 13, 2016 02:39 IST

अहेरी इस्टेटचे दिवंगत राजे विश्वश्वरराव महाराज, राजे सत्यवानराव महाराज यांच्यावर अहेरी इस्टेटच्या नागरिकांनी

अहेरीतील दसरा महोत्सव : १५ हजारांवर नागरिकांची उपस्थितीअहेरी : अहेरी इस्टेटचे दिवंगत राजे विश्वश्वरराव महाराज, राजे सत्यवानराव महाराज यांच्यावर अहेरी इस्टेटच्या नागरिकांनी जे प्रेम केले आणि जो विश्वास टाकला, तसाच विश्वास माझ्यावरही नागरिकांनी टाकला आहे. नागरिकांच्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली.मंगळवारी अहेरी येथील राजमहल परिसरात आयोजित दसरा महोत्सवात जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी राजमाता रूखमिनीदेवी, कुमार अवधेशरावबाबा, प्रवीणरावबाबा व राजघराण्यातील इतर सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव म्हणाले, नागरिकांमुळेच मी मंत्री पदावर पोहोचलो आणि विकासाची कामे सुरू आहेत. मागील दोन वर्षांच्या अनुभवातून मी बरेच काही शिकलो आहे. पुढील तीन वर्षात जनतेसाठी विकासकामे करायची आहेत. सूरजागड लोह प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात व्हावा, यासाठी मी कटीबद्ध असून सदर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. मेडिगट्टा सिंचन प्रकल्पाबाबत विरोधक जनतेमध्ये चुकीची माहिती पसरवित आहे. युवकांनी फक्त वॉटस्अ‍ॅप, फेजबुकपर्यंत सिमित न राहता, समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची गरज आहे. चांगले शिक्षण घेऊन मोठे प्रशासकीय अधिकारी होऊन गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची सेवा करावी, असेही ना. आत्राम यावेळी म्हणाले. अहेरीच्या आत्राम परिवाराचा दसरा देशात प्रसिद्ध असून आपल्या या संस्कृतीचे जतन आपल्या सर्वांना मिळून करायचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जनता भोेळी आहे, मात्र विरोधक त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना भूलथापा देतात. मात्र मी असे होऊ देणार नाही, मी सदैव जनतेच्या पाठीशी राहणार, असे आश्वासन अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.सदर दसरा महोत्सवाला १५ हजारांवर नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. दरम्यान पारंपरिक आदिवासी रेला नृत्य सादर करण्यात आले. दसरा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नाविसं, भाजप कार्यकर्ते, शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अनिल कत्रोेजवार यांनी केले. (प्रतिनिधी)