जिल्ह्याला १ हजार ३४० शेततळ्यांचे उद्दिष्ट : प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्यगडचिरोली : भूजल पातळीत वाढ होण्याबरोबरच शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला १ हजार ३४० शेततळ्यांचे उद्दिष्ट २०१६-१७ मध्ये देण्यात आले आहे. राज्याच्या सर्वच भागात कमीअधिक प्रमाणात पावसामुळे शेतीवर व उत्पादनावर परिणाम झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात याच प्रकारची स्थिती दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ३४० शेततळे बांधून दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांना अधिकाधिक ५० हजार रूपयांचा निधी अनुदान स्वरूपात त्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. पाच वर्षा पैकी कोणत्याही एका वर्षात पिकाची आणेवारी ५० पैसेपेक्षा कमी असेल तर अशा गावातील ०.६० हेक्टर पेक्षा अधिक जमीन असणारे शेतकरी यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्याने यापूर्वी शेततळे, सामूदायिक शेततळे, भात खाचर, बोडी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, इनलेट, आऊटलेटसह ४४१ घनमीटरपासून (१५ बाय १५ बाय ३), २ हजार १९६ घनमीटर (३० बाय ३० बाय ३) या आकाराचे शेततळे शेतकऱ्याला घेता येईल, तसेच इनलेट-आऊटलेट विहिरीत शेततळ्यासाठी किमान ६२१ घनमीटर (२० बाय १५ बाय ३) अशी कमाल मर्यादा आहे. यासाठी पाच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मागणी केल्यास त्यांनाही शेततळे देण्यात येतील. प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे. आॅनलाईन नोंदणीला झाली सुरुवातशेततळ्यांसाठी आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. सदर अर्ज स्वीकारण्यास २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. ही नोंदणी २९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या कालावधीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक मुख्याधिकारी अनंत पोटे यांनी केले आहे.
मागेल त्याला मिळणार शेततळे
By admin | Updated: February 24, 2016 01:21 IST