शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

मागेल त्याला मिळणार शेततळे

By admin | Updated: February 24, 2016 01:21 IST

भूजल पातळीत वाढ होण्याबरोबरच शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

जिल्ह्याला १ हजार ३४० शेततळ्यांचे उद्दिष्ट : प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्यगडचिरोली : भूजल पातळीत वाढ होण्याबरोबरच शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला १ हजार ३४० शेततळ्यांचे उद्दिष्ट २०१६-१७ मध्ये देण्यात आले आहे. राज्याच्या सर्वच भागात कमीअधिक प्रमाणात पावसामुळे शेतीवर व उत्पादनावर परिणाम झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात याच प्रकारची स्थिती दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ३४० शेततळे बांधून दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांना अधिकाधिक ५० हजार रूपयांचा निधी अनुदान स्वरूपात त्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. पाच वर्षा पैकी कोणत्याही एका वर्षात पिकाची आणेवारी ५० पैसेपेक्षा कमी असेल तर अशा गावातील ०.६० हेक्टर पेक्षा अधिक जमीन असणारे शेतकरी यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्याने यापूर्वी शेततळे, सामूदायिक शेततळे, भात खाचर, बोडी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, इनलेट, आऊटलेटसह ४४१ घनमीटरपासून (१५ बाय १५ बाय ३), २ हजार १९६ घनमीटर (३० बाय ३० बाय ३) या आकाराचे शेततळे शेतकऱ्याला घेता येईल, तसेच इनलेट-आऊटलेट विहिरीत शेततळ्यासाठी किमान ६२१ घनमीटर (२० बाय १५ बाय ३) अशी कमाल मर्यादा आहे. यासाठी पाच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मागणी केल्यास त्यांनाही शेततळे देण्यात येतील. प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे. आॅनलाईन नोंदणीला झाली सुरुवातशेततळ्यांसाठी आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. सदर अर्ज स्वीकारण्यास २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. ही नोंदणी २९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या कालावधीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक मुख्याधिकारी अनंत पोटे यांनी केले आहे.