शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा हल्ला : चार वर्षात १०७ नागरिक जखमी- १३ जणांचा बळी

By admin | Updated: November 22, 2014 01:14 IST

७८ टक्के जंगल असलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

गडचिरोली : ७८ टक्के जंगल असलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावांकडे धाव घेत असल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सन २०१०-११ ते २०१३-१४ या चार वर्षात वन्यप्राणी हल्ल्यांच्या एकूण १३ घटना घडल्या असून यात १३ नागरिकांचा बळी गेला आहे. तर १०७ नागरिक जखमी झाले आहेत. गडचिरोली वनवृत्तांतर्गत गडचिरोली, वडसा, आलापल्ली, सिरोंचा व भामरागड हे पाच वनविभाग आहेत. गडचिरोली या वनव्याप्त जिल्ह्यात एकूण २९ प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये बिबट, अस्वल, रानम्हैस, चितळ, भेडकी, सांबर, हरिण, काळविट, निलघोडा, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा, तळस, ससा, निलगाय, रोही, माकड, चौसिंगा, बेलमांजर, रानकुत्रा, सारस, रानगवा, मुंगूस, गिधाड, मोर, शेकरू व रानकोंबडी आदींचा समावेश आहे. गडचिरोली वनविभागाच्या तुलनेत आलापल्ली, भामरागड व सिरोंचा वनविभागाच्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचे संख्या अधिक आहे. गडचिरोली वनवृत्त कार्यालयाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सन २०१०-११ या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे एक प्रकरण घडले. यात एका व्यक्तीचा बळी गेला असून २४ व्यक्ती जखमी झाले. २०११-१२ या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे तीन नागरिकांचा बळी गेला असून २२ ननागरिक जखमी झाले. सन २०१२-१३ या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे ९ प्रकरण झाले असून यात ९ जणांचा बळी गेला असून सर्वाधिक ५० नागरिक जखमी झाले होते. सन २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १० नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. वन्यप्राण्यांचा हल्ला झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फतीने पंचनामा करण्यात येतो. त्यानंतर आर्थिक मदतीसाठी सदर प्रस्ताव वनवृत्त कार्यालयाला पाठविल्या जातो. सन २०१०-११ या वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतक व्यक्तीच्या कुटुंबीयांना वन विभागामार्फत २ लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर याच वर्षातील २५ जखमी व्यक्तींना ६ लाख २ हजार ७८ रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. सन २०११-१२ या वर्षातील ३ मृतक व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख याप्रमाणे ६ लाख रूपयाची मदत देण्यात आली आहे. तर याच वर्षातील २२ जखमींना ५ लाख ४० हजार ७०१ रूपयाची मदत देण्यात आली आहे. २०१२-१३ या वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या ९ मृतकांच्या कुटुंबियांना १३ लाख ५० हजार रूपयाची मदत देण्यात आली आहे. याच वर्षात जखमी झालेल्या ५० नागरिकांना १३ लाख ५० हजार रूपयाची मदत देण्यात आली आहे. २०१३-१४ या चालू वर्षात सप्टेंबर महिन्याच्या अखरेपर्यंत झालेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील १० नागरिकांना ६ लाख रूपयाची आर्थिक मदत वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)