शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

वन्यप्राण्यांचा हल्ला : चार वर्षात १०७ नागरिक जखमी- १३ जणांचा बळी

By admin | Updated: November 22, 2014 01:14 IST

७८ टक्के जंगल असलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

गडचिरोली : ७८ टक्के जंगल असलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावांकडे धाव घेत असल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सन २०१०-११ ते २०१३-१४ या चार वर्षात वन्यप्राणी हल्ल्यांच्या एकूण १३ घटना घडल्या असून यात १३ नागरिकांचा बळी गेला आहे. तर १०७ नागरिक जखमी झाले आहेत. गडचिरोली वनवृत्तांतर्गत गडचिरोली, वडसा, आलापल्ली, सिरोंचा व भामरागड हे पाच वनविभाग आहेत. गडचिरोली या वनव्याप्त जिल्ह्यात एकूण २९ प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये बिबट, अस्वल, रानम्हैस, चितळ, भेडकी, सांबर, हरिण, काळविट, निलघोडा, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा, तळस, ससा, निलगाय, रोही, माकड, चौसिंगा, बेलमांजर, रानकुत्रा, सारस, रानगवा, मुंगूस, गिधाड, मोर, शेकरू व रानकोंबडी आदींचा समावेश आहे. गडचिरोली वनविभागाच्या तुलनेत आलापल्ली, भामरागड व सिरोंचा वनविभागाच्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचे संख्या अधिक आहे. गडचिरोली वनवृत्त कार्यालयाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सन २०१०-११ या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे एक प्रकरण घडले. यात एका व्यक्तीचा बळी गेला असून २४ व्यक्ती जखमी झाले. २०११-१२ या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे तीन नागरिकांचा बळी गेला असून २२ ननागरिक जखमी झाले. सन २०१२-१३ या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे ९ प्रकरण झाले असून यात ९ जणांचा बळी गेला असून सर्वाधिक ५० नागरिक जखमी झाले होते. सन २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १० नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. वन्यप्राण्यांचा हल्ला झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फतीने पंचनामा करण्यात येतो. त्यानंतर आर्थिक मदतीसाठी सदर प्रस्ताव वनवृत्त कार्यालयाला पाठविल्या जातो. सन २०१०-११ या वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतक व्यक्तीच्या कुटुंबीयांना वन विभागामार्फत २ लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर याच वर्षातील २५ जखमी व्यक्तींना ६ लाख २ हजार ७८ रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. सन २०११-१२ या वर्षातील ३ मृतक व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख याप्रमाणे ६ लाख रूपयाची मदत देण्यात आली आहे. तर याच वर्षातील २२ जखमींना ५ लाख ४० हजार ७०१ रूपयाची मदत देण्यात आली आहे. २०१२-१३ या वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या ९ मृतकांच्या कुटुंबियांना १३ लाख ५० हजार रूपयाची मदत देण्यात आली आहे. याच वर्षात जखमी झालेल्या ५० नागरिकांना १३ लाख ५० हजार रूपयाची मदत देण्यात आली आहे. २०१३-१४ या चालू वर्षात सप्टेंबर महिन्याच्या अखरेपर्यंत झालेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील १० नागरिकांना ६ लाख रूपयाची आर्थिक मदत वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)