शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
6
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
7
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
8
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
9
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
10
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
11
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
12
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
13
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
14
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
16
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
17
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
18
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
19
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
20
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)

सौर कृषीपंप घेण्यासाठी अनुदान मिळूनही शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:59 IST

अनुदान मिळूनही उदासीनता : वीज पंप वापरण्याकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्कवडधा : आरमोरी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड करीत असतात. दरम्यान, शेतकऱ्यांना शेती सिंचन सोयीसाठी कृषीपंपाची आवश्यकता असते; मात्र शासनाकडून ५ ते १० टक्के सबसिडी मिळत असली तरी अनेकजण आपल्या शेतामध्ये सौर कृषीपंप घेण्यासाठी नकार देत असल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी नदी, नाले, विहीर किंवा बोअरच्या साह्याने पाण्याची सोय शेतीला करीत असतात अशावेळी शेतकऱ्यांना विजेची आवश्यकता भासत असते; पण वीज वितरण कंपनी मात्र वीज कनेक्शन देण्याऐवजी सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना देत आहे; परंतु शेतकरी सौर ऊर्जा पंप घेण्यास पूर्णपणे नकार देत आहेत. सौर कृषिपंप नको, वीज कनेक्शन द्या, अशी मागणी या भागातील अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

कृषी पंपासाठी वीज कनेक्शनची मागणी

  • इलेक्ट्रिक पंपाव्दारे पाणी शेतीला मुबलकपणे पाणी देऊ शकतो, तसे सौर ऊर्जा पंपाचे पाणी मुबलकपणे देऊ शकत नाही, त्यामुळे ही एक समस्या शेतकऱ्यांसमोर उद्भवत असते.
  • शेतकऱ्यांचा सौर ऊर्जा पंपाला नकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

का नको सौर कृषी पंप ?

  • जिल्ह्याला लागूनच मोठी नदी वैनगंगा आहे व तिला जोडूनच अनेक उपनद्या आहेत, वैनगंगा नदीला गोसीखुर्द सारखे एक मोठे धरण आहे.
  • तर उपनद्यांना इंडियाडोह सारखे प्रकल्प आहेत त्यामुळे पावसात अतिवृष्टीने धरणाचे पाणी सोडत असतात अशावेळी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन हजारो हेक्टर धानाची शेती पाण्याखाली जात असते तेव्हा सौर ऊर्जा पंप सुद्धा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडत असतात.
  • एखादा सौर पंप पाण्याखाली बुडला की तो पाण्यामुळे निकामी होतो तो पंप दुरुस्ती होईल याची शाश्वती नसते त्यामुळे अनेक शेतकरी सौर पंप घेण्यास धजावत नाहीत.
  • इलेक्ट्रिक पंप असला तर पूर परिस्थितीत पंप पाण्याखाली गेला तरी ऑटोमॅटिक लाईन ट्रिप होऊन फ्यूज जात असते, त्यामुळे इलेक्ट्रिक पंप शेतकऱ्यांना सोयीस्कर व सुरक्षित वाटतो.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली