शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पांढरसडातील विहिरी पडल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:16 IST

तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईचे संकट : लोकसंख्येच्या तुलनेत जलस्त्रोत कमी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पांढरसडा येथे दोन विहिरी, दोन हातपंप आहेत. गावातील लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठ्याची ही साधने कमी आहेत. त्यामुळे हातपंप खोदून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत असली तरी जिल्हा परिषद प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात या गावात दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे गावातील महिला व नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावातील दोन्ही विहिरी एप्रिल महिन्याच्या मध्यंतरीच आटल्या. परिणामी गावातील महिलांची हातपंपावर गर्दी दिसून येते. हातपंपांना सुध्दा कमी प्रमाणात पाणी येत असल्याने हातपंपावर भांडे व महिलांची मोठी रांग लागली असल्याचे दिसून येते. पाणी भरण्यासाठी अर्धा तासानंतर नंबर लागत असल्याने कित्येक वेळ हातपंपावरच प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्याने पहाटेपासूनच गावातील विहिरींवर महिलांची गर्दी होते. सकाळीच विहिरीतील पाणी पूर्णपणे संपते. या गावात प्रत्येक कुटुंबांकडे जनावरे आहेत. बाहेरचे पाण्याचे स्त्रोत आटल्याने जनावरांच्याही पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे.पाणी टंचाईबाबात खुटगाव ग्रामपंचायतीचे सचिव यांच्याशी संपर्क साधला असता, विहिरीला दगड लागला आहे. त्यामुळे पुन्हा विहिरीचे खोलीकरण करणे शक्य नाही, अशी माहिती दिली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई