शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

पांढरसडातील विहिरी पडल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:16 IST

तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईचे संकट : लोकसंख्येच्या तुलनेत जलस्त्रोत कमी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पांढरसडा येथे दोन विहिरी, दोन हातपंप आहेत. गावातील लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठ्याची ही साधने कमी आहेत. त्यामुळे हातपंप खोदून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत असली तरी जिल्हा परिषद प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात या गावात दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे गावातील महिला व नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावातील दोन्ही विहिरी एप्रिल महिन्याच्या मध्यंतरीच आटल्या. परिणामी गावातील महिलांची हातपंपावर गर्दी दिसून येते. हातपंपांना सुध्दा कमी प्रमाणात पाणी येत असल्याने हातपंपावर भांडे व महिलांची मोठी रांग लागली असल्याचे दिसून येते. पाणी भरण्यासाठी अर्धा तासानंतर नंबर लागत असल्याने कित्येक वेळ हातपंपावरच प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्याने पहाटेपासूनच गावातील विहिरींवर महिलांची गर्दी होते. सकाळीच विहिरीतील पाणी पूर्णपणे संपते. या गावात प्रत्येक कुटुंबांकडे जनावरे आहेत. बाहेरचे पाण्याचे स्त्रोत आटल्याने जनावरांच्याही पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे.पाणी टंचाईबाबात खुटगाव ग्रामपंचायतीचे सचिव यांच्याशी संपर्क साधला असता, विहिरीला दगड लागला आहे. त्यामुळे पुन्हा विहिरीचे खोलीकरण करणे शक्य नाही, अशी माहिती दिली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई