शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

अतिक्रमण काढताना गरिबांचे ठेले ताेडले, श्रीमंतांना सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 14:18 IST

नगर पंचायत दुजाभाव करीत असल्याचा आरोप

अहेरी (गडचिरोली) : मागील काही दिवसांपासून अहेरी नगरपंचायत प्रशासनातर्फे अहेरी शहरातील रस्त्याच्या नालीवरील व रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढणे सुरू आहे. मात्र, या मोहिमेत श्रीमंत आणि गरिबांबाबत दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

बसस्थानक रस्त्यावर कोणतीच नाली नसतानाही गॅरेज, चायनीज, फळवाले आपल्या टपरीसमोर शेड टाकून आपले दुकान चालवत होते. काही दुकानदार शुक्रवार असल्याने दुकान बंद करून बाहेर गावी गेले होते. नगरपंचायत प्रशासनाने जेसीबी लावून नालीवर असलेली दुकाने हटविली. त्यामुळे गरीब दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मोठ्या दुकानदारांना झुकते माप देत त्यांना सोमवारपर्यंतचा वेळ दिल्याने त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.

नगरपंचायतने अतिक्रमित दुकानदारांना नोटीस पाठवून तीन दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्यास सांगितले होते. मात्र, काहीं व्यापाऱ्यांना तीन दिवस मुदतवाढ करून दिल्या गेली. मात्र, टपरी व शेड टाकून उपजीविका निभावत असलेल्या लहान दुकानदार यांना अतिक्रमण काढण्यास वेळ दिला नाही. जेसीबी लावून शेड काढले. शेड पूर्णपणे तुटले आहे. श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आम्ही आधीच अतिक्रमणधारकांना नोटीस पाठविली होती. अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण काढले तर काही व्यापारी वर्गाने भेट घेऊन मुदतवाढ करण्याची विनंती केली. त्यामुळे रविवारपर्यंत वेळ दिली होती. काहींना आम्ही संपर्क केला मात्र संपर्क झाला नव्हता. त्यामुळे नाईलाजास्तव जेसीबीने टिनाचे शेड काढले. त्यात त्यांचे नुकसान झाले.

- एन.सी. दाते, प्रभारी मुख्याधिकारी, अहेरी नगरपंचायत.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणGadchiroliगडचिरोलीaheri-acअहेरी