शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईची समस्या सुटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:50 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेकडून जलस्वराज्य व भारत निर्माण योजनेंतर्गत २००७-०८ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठ्यासाठी योजना मंजूर करण्यात आल्या. याकरिता २ कोटी २९ लाख ९७ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला होता.

ठळक मुद्देझिंगानूर परिसर : १३ ग्राम पंचायतींतर्गत करण्यात आलेली उपाययोजना कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेकडून जलस्वराज्य व भारत निर्माण योजनेंतर्गत २००७-०८ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठ्यासाठी योजना मंजूर करण्यात आल्या. याकरिता २ कोटी २९ लाख ९७ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु १० ते १२ वर्षांचा कालावधी उलटूनही तालुक्यातील झिंगानूर परिसरातील पाणी टंचाईची समस्या सुटली नाही. ही समस्या सुटणार कधी? याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींपैैकी १३ ग्राम पंचायतींना संलग्न असलेल्या १७ ठिकाणी पाणी टंचाई निवारणासाठी कुपनलिका हातपंपासह जोडण्यात आल्या. झिंगानूर ग्रा. पं. ला समाविष्ट झिंगानूर माल, चक नं. १, चक नं. २ व पुल्लीगुंडम या चार ठिकाणी सदर कामासाठी एकूण ५७ लाख ४४ हजार रूपये निधी मंजूर होता. त्यापैैकी २००७-०८ मध्ये पहिल्या टप्प्यात ३७ लाख ९४ हजारांची मागणी होती. तथापि १२ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही त्या भागातील आदिवासींना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पुल्लीगुंडम येथे आनंदराव लच्चा मडावी यांच्या घरामागील कुपनलिकेला पाणी नाही. समय्या रामा मडावी यांच्या घरासमोरील कुपनलिकेची स्थितीही समाधानकारक नाही. गावाच्या नाल्याजवळील वीरय्या सूरय्या मडावी यांच्या घरामागे तसेच जि. प. शाळेलगत मदनय्या बकय्या तोरेमच्या घरापुढे अशा स्वतंत्र दोन कुपनलिका आहेत. मात्र पाणी नियमित येत नाही. राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी ५ एप्रिल २०१३ रोजी झिंगानूरला भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी येथून ४ किमी अंतरावरील मंगिगुडम येथील हातपंपाचे व विद्युत जनित्राची कळ दाबून वीज व पाण्याची समस्या निकाली काढली. याच कार्यक्रमात पुल्लीगुंडमच्या नागरिकांनी भेट देऊन पाणी समस्या मांडली. तालुक्यातील मेडारम चकसाठी १६ लाख ५० हजार , गुमलकोंडा रयतवारी ५० लाख, पोचमपल्ली कोटासाठी १८ लाख मद्दीकुंटा २२ लाख, सिरकोंडा माल. २१ लाख, सिरकोंडा टोला १.५० लाख आदीमुत्तापूर १६ लाख ५० हजार, गर्कापेटा ग्रा. पं. च्या कोटामालसाठी १९ लाख ५० हजार, जानमपल्ली अंतर्गतच्या वेस्टलँडसाठी २४ लाख व चकसाठी १.५० लाख असे २५ लाख ५० हजार रूपये निधी पाणी टंचाई निवारणासाठी मंजूर झाले. चिंतरेवलुलासाठी ४ लाख ३ हजार खर्ची पडले तर उर्वरित मुत्तापूरचक, आयपेठा रयत या गावांसाठी प्रत्येकी १.५० प्रमाणे ३ लाख रूपये खर्च करण्यात आले. सदर १३ ग्राम पंचायतीसह इतर २८ ग्राम पंचायतींना समाविष्ट असलेल्या गावातील पाणी समस्या पूर्णत: सुटलेली नाही. बहुसंख्य नागरिक खासगी बोरिंगच्या माध्यमातून पाण्याची अडचण दूर करीत असल्याचे वास्तव आहे.कोप्पेला येथील ‘लोह निवारक सयंत्र’ निकामीमोठा गाजावाजा करून ९ वर्र्षांपूर्वी कोप्पेला येथे बसविलेले आयर्न रिमुव्हल कंटेनर १ वर्षाच्या आतच उद्ध्वस्त झाले. जिल्ह्यातील एकमेव सुविधा असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. जिल्हा परिषद गडचिरोली व विभागीय आयुक्त कार्यालयाचा भारत निर्माण कक्ष यांच्या संयुक्त समन्वयातून ही योजना अंमलात आली होती. मात्र आजही कोप्पेलाचे नागरिक अशुद्ध पाणीच वापरत आहेत. गावालगतच्या नाल्यात झरे खोदून तहान भागवत आहेत. ही स्थिती आजही कायम आहे. योग्य हेतूने कार्यान्वित केलेली यंत्रणा कुचकामी ठरत आहे. या सयंत्रावर झालेला खर्चही पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई