शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईची समस्या सुटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:50 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेकडून जलस्वराज्य व भारत निर्माण योजनेंतर्गत २००७-०८ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठ्यासाठी योजना मंजूर करण्यात आल्या. याकरिता २ कोटी २९ लाख ९७ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला होता.

ठळक मुद्देझिंगानूर परिसर : १३ ग्राम पंचायतींतर्गत करण्यात आलेली उपाययोजना कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेकडून जलस्वराज्य व भारत निर्माण योजनेंतर्गत २००७-०८ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठ्यासाठी योजना मंजूर करण्यात आल्या. याकरिता २ कोटी २९ लाख ९७ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु १० ते १२ वर्षांचा कालावधी उलटूनही तालुक्यातील झिंगानूर परिसरातील पाणी टंचाईची समस्या सुटली नाही. ही समस्या सुटणार कधी? याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींपैैकी १३ ग्राम पंचायतींना संलग्न असलेल्या १७ ठिकाणी पाणी टंचाई निवारणासाठी कुपनलिका हातपंपासह जोडण्यात आल्या. झिंगानूर ग्रा. पं. ला समाविष्ट झिंगानूर माल, चक नं. १, चक नं. २ व पुल्लीगुंडम या चार ठिकाणी सदर कामासाठी एकूण ५७ लाख ४४ हजार रूपये निधी मंजूर होता. त्यापैैकी २००७-०८ मध्ये पहिल्या टप्प्यात ३७ लाख ९४ हजारांची मागणी होती. तथापि १२ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही त्या भागातील आदिवासींना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पुल्लीगुंडम येथे आनंदराव लच्चा मडावी यांच्या घरामागील कुपनलिकेला पाणी नाही. समय्या रामा मडावी यांच्या घरासमोरील कुपनलिकेची स्थितीही समाधानकारक नाही. गावाच्या नाल्याजवळील वीरय्या सूरय्या मडावी यांच्या घरामागे तसेच जि. प. शाळेलगत मदनय्या बकय्या तोरेमच्या घरापुढे अशा स्वतंत्र दोन कुपनलिका आहेत. मात्र पाणी नियमित येत नाही. राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी ५ एप्रिल २०१३ रोजी झिंगानूरला भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी येथून ४ किमी अंतरावरील मंगिगुडम येथील हातपंपाचे व विद्युत जनित्राची कळ दाबून वीज व पाण्याची समस्या निकाली काढली. याच कार्यक्रमात पुल्लीगुंडमच्या नागरिकांनी भेट देऊन पाणी समस्या मांडली. तालुक्यातील मेडारम चकसाठी १६ लाख ५० हजार , गुमलकोंडा रयतवारी ५० लाख, पोचमपल्ली कोटासाठी १८ लाख मद्दीकुंटा २२ लाख, सिरकोंडा माल. २१ लाख, सिरकोंडा टोला १.५० लाख आदीमुत्तापूर १६ लाख ५० हजार, गर्कापेटा ग्रा. पं. च्या कोटामालसाठी १९ लाख ५० हजार, जानमपल्ली अंतर्गतच्या वेस्टलँडसाठी २४ लाख व चकसाठी १.५० लाख असे २५ लाख ५० हजार रूपये निधी पाणी टंचाई निवारणासाठी मंजूर झाले. चिंतरेवलुलासाठी ४ लाख ३ हजार खर्ची पडले तर उर्वरित मुत्तापूरचक, आयपेठा रयत या गावांसाठी प्रत्येकी १.५० प्रमाणे ३ लाख रूपये खर्च करण्यात आले. सदर १३ ग्राम पंचायतीसह इतर २८ ग्राम पंचायतींना समाविष्ट असलेल्या गावातील पाणी समस्या पूर्णत: सुटलेली नाही. बहुसंख्य नागरिक खासगी बोरिंगच्या माध्यमातून पाण्याची अडचण दूर करीत असल्याचे वास्तव आहे.कोप्पेला येथील ‘लोह निवारक सयंत्र’ निकामीमोठा गाजावाजा करून ९ वर्र्षांपूर्वी कोप्पेला येथे बसविलेले आयर्न रिमुव्हल कंटेनर १ वर्षाच्या आतच उद्ध्वस्त झाले. जिल्ह्यातील एकमेव सुविधा असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. जिल्हा परिषद गडचिरोली व विभागीय आयुक्त कार्यालयाचा भारत निर्माण कक्ष यांच्या संयुक्त समन्वयातून ही योजना अंमलात आली होती. मात्र आजही कोप्पेलाचे नागरिक अशुद्ध पाणीच वापरत आहेत. गावालगतच्या नाल्यात झरे खोदून तहान भागवत आहेत. ही स्थिती आजही कायम आहे. योग्य हेतूने कार्यान्वित केलेली यंत्रणा कुचकामी ठरत आहे. या सयंत्रावर झालेला खर्चही पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई