शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गहू, ज्वारी, तांदूळही महाग; आत्ताच घ्या, आणखी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 20:25 IST

Gadchiroli News पाऊस लांबल्याचा परिणाम गहू, ज्वारी व तांदळाच्या दरावर झाला असून २०० ते ३०० रुपयांची दरवाढ झाली आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसेल.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा रब्बीवर परिणाममहागाईत पडू शकते भर

गडचिराेली : यावर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला उशिरा पाऊस आला. त्यानंतर ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बरसला. त्यामुळे रब्बी हंगाम लांबला. गडचिराेली जिल्ह्यातील हलके धानपीक व साेयाबीनचे नुकसान झाले. पाऊस लांबल्याचा परिणाम गहू, ज्वारी व तांदळाच्या दरावर झाला असून २०० ते ३०० रुपयांची दरवाढ झाली आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसेल.

गडचिराेली जिल्ह्यात खरिपातील सर्वाधिक क्षेत्र धानपिकाचे आहे. रब्बी हंगामात शेतकरी गहू, ज्वारी तसेच द्विदल कडधान्य पिकाची लागवड करतात. यामध्ये उडीद, मूग, हरभरा, मसूर, लाखाेळी आदींचा समावेश आहे. जिल्ह्यात ज्वारी पिकाचे अल्प उत्पादन घेतले जाते. अहेरी उपविभागातील सिराेंचा तालुक्यात काही शेतकरी ज्वारीचे पीक घेतात. त्यामुळे ज्वारीला जिल्ह्यात मागणीही अल्प आहे. मात्र, गहू, तांदळाचे उत्पादन माेठ्या प्रमाणावर हाेत असले तरी बाजारपेठेत त्यांनाच मागणी आहे.

गहू २,७०० रुपयांवर

गव्हाच्या प्रकारानुसार त्याचे दर ठरविले जातात. सर्वसाधारण गहू २० ते २५ रुपये, मध्यम दर्जाचा गहू २५ ते ३० ते उच्च दर्जाचा गहू ३५ रुपये दर आहे; परंतु, सध्या दाेन हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल मिळणारा गहू दाेन हजार ७०० रुपयांवर पाेहाेचला.

ज्वारी ४,००० रुपयांवर

गडचिराेली जिल्ह्यात ज्वारीचे अल्प उत्पादन व मागणी कमी आहे. तरीसुद्धा ज्वारी तीन हजार ५०० ते तीन हजार ७०० रुपयांपर्यंत मिळत हाेती. आता ती चार हजार ते चार हजार २०० रुपये प्रतिक्विंटलवर पाेहाेचली आहे.

जुन्या धान्याचे भाव वाढले

- जिल्ह्यात ‘अ’ दर्जाचा जयप्रकाश धान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल.

- सुगंधित माेहरा धान दाेन हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल.

- जय श्रीराम धान दाेन हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. हे सर्व दर जुन्या धानाचे आहेत.

परतीच्या पावसाचा रब्बीलाही फटका

- परतीच्या पावसाने रब्बी हंगाम लांबला.

- भुईमूग पिकाची पेरणी शेतकऱ्यांना करता आली नाही.

 

रब्बी हंगाम लांबल्याने या पिकाचे उत्पादनसुद्धा उशिरा हाेईल. त्यामुळे काही प्रमाणात मागणी व पुरवठ्यावर परिणाम हाेईल. हीच बाब गहू, ज्वारी व तांदळाच्या दरवाढीसाठी कारणीभूत आहे.

- बंटी भाेगावार, व्यावसायिक

महागाई वाढली नाही, असा एकही महिना गेल्या दाेन वर्षांत गेला नाही. महागाईच्या ओझ्याखाली सर्वसामान्य नागरिक दबत आहेत. आणखी किती दबणार?

- पूजा कुळमेथे, गृहिणी

आम्ही भूमिहीन असल्याने तांदूळ खरेदी करताे. आता तांदूळही महागणार असतील तर काय खावे व आर्थिक बजेट कसे सांभाळावे, हा प्रश्न आहे.

- वंदना पाल, गृहिणी

टॅग्स :foodअन्नagricultureशेती