रांगीत महिला आक्रमक : रमेशचंद्र दहीवडे यांचा सवालधानोरा : महागाईच्या नावाखाली आमदाराची मानधन वाढ ७५ हजार रूपयावरून दीड लाख रूपये करण्यात आली. यासाठी कमिटी गठीत करण्याची आवश्यकता शासनाला वाटली नाही. मात्र अंगणाडी महिलांच्या मानधन वाढीसाठी शासनाला कमिटी गठीत करण्याची गरज का भासली, असा सवाल अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केली आहे. धानोरा तालुक्यातील रांगी येथे अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांचा मेळावा चंद्रकला कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दहीवडे बोलत होते. यावेळी सिंधू मडावी, आशा कुळमेथे, रेखा लेनगुरे, सुनिता भुरसे, प्रमिला पदा यांच्यासह रांगी परिसरातील बहुसंख्य अंगणवाडी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. रमेशचंद्र दहीवडे म्हणाले, अंगणवाडी महिलांच्या मानधनवाढीसाठी कमिटी गठीत करण्याचा निर्णय पाच महिन्यापूर्वी घेण्यात आला होता. आता सदर कमिटी गठीत करण्यात आली आहे. मात्र या कमिटीची एकही बैठक झाली नाही, असे ते म्हणाले. यावेळी मेळाव्याचे प्रास्ताविक ललिता केदार यांनी केले तर आभार सिंधू मडावी यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
अंगणवाडी महिलांच्या मानधन वाढीसाठी कमिटीची गरज का?
By admin | Updated: September 2, 2016 01:23 IST