शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

चिखलातच आठवडी बाजार

By admin | Updated: July 27, 2014 23:45 IST

‘नेमेची येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे गडचिरोली शहरासह परिसरातील हजारो नागरिकांना दरवर्षी पावसाळयात येथील आठवडी बाजारात चिखलाचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. पालिका प्रशासनाच्या

गडचिरोली : ‘नेमेची येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे गडचिरोली शहरासह परिसरातील हजारो नागरिकांना दरवर्षी पावसाळयात येथील आठवडी बाजारात चिखलाचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात चिखल तुडवूनच बाजार करावा लागत आहे. सद्यस्थितीत आठवडी बाजारात पावसाचे पाणी जमा झाल्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथील ग्राहक व विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी गडचिरोली येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात गडचिरोली शहरासह तालुक्यातील हजारो ग्राहक येतात. तसेच शेकडो विक्रेते भाजीपाला विक्रीसाठी येतात. या बाजारात विक्रेत्यांना बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही. यामुळे रस्त्यावरच दुकान लावून विक्रेत्यांना बसावे लागत आहे. मिरची विक्रेत्यांचे दुकान तर चिखलाच्या बाजुलाच लावले जातात. भाजीपाला दुकानाच्या अगदी कडेला चिखल साचलेला दिसून येतो. या चिखलात डासांची उत्पत्ती होत असते. हे डास लगतच्या भाजीपाल्यावर बसत असतात. मात्र पर्याय नसल्याने येथील ग्राहक त्याच स्थितीतला भाजीपाला खरेदी करतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिखलमय आठवडी बाजाराचे दर्शन गेल्या अनेक वर्षापासून येथील ग्राहक व विक्रेत्यांना होत आहे. मात्र पालिका प्रशासनाने या आठवडी बाजारात सिमेंट काँक्रीट रस्ते तसेच ओटे बांधून कायमस्वरूपी सुविधा अद्यापही केली नाही. यामुळे ग्राहक व विक्रेत्यांमध्ये पालिका प्रशासनाप्रती तीव्र नाराजी असल्याचे दिसून येते. आठवडी बाजारात नाल्यांची व्यवस्था नसल्यामुळे डांबरी मार्गावरील तसेच लगतच्या मार्गावरील पावसाचे पाणी आठवडी बाजार परिसरात साचून राहते. या बाजारात मोकाट जनावरे व डुकरांचाही हैदोस नेहमीचाच आहे. याचा येथील ग्राहक व विक्रेत्यांना प्रचंड त्रास होतो. आठवडी बाजाराच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला दरवर्षी लिलावादवारे लाखो रूपये उत्पन्न मिळते. मात्र या आठवडी बाजारात कायमस्वरूपी सोयीसुविधा करण्याकडे न.प.चे दुर्लक्ष होत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक ग्राहक व विक्रेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. आठवडी बाजारात जागा अपुरी पडत असल्याने चंद्रपूर या डांबरीकरण मार्गावर तसेच त्रिमूर्ती चौकातून बाजाराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर दुकाने लावली जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. बोरमाळा मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. जोरदार पावसामुळे बाजार करणे अशक्य होते. (स्थानिक प्रतिनिधी)