शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

626 हेक्टरमधील गर्भावस्थेत असलेल्या धानपिकाचे झाले तणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 05:00 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बहुतांश शेती इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भेगा पडलेल्या आहेत. काही ठिकाणी पाळ फुटलेली आहे. मात्र त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी शेवटच्या टोकापर्यंत कालव्याचे पाणी पोहोचत नाही. धरणापासून शेवटच्या टोकाला (टेल) आधी पाणी दिले गेले पाहिजे, असा नियम आहे. मात्र त्याला बगल देत  योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे वघाळापर्यंत पाणी पोहोचतच नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : पावसाने दडी मारल्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या धान पिकाला पाण्याची नितांत गरज होती. मात्र तालुक्यातील वघाळा येथील शेतकऱ्यांना इटियाडोह  धरणाचे पाणी लागू असताना त्यांच्या पिकाला पाणी मिळाले नाही. वारंवार पाण्याची मागणी करूनही इटियाडोह प्रकल्प कार्यालयाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गर्भार असलेल्या धानपिकाला वेळेवर पाणी न मिळाल्याने या गावातील तब्बल ६२६ हेक्टर धनपिक करपून ते तणसात रुपांतरीत होत आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आरमोरी येथील प्रकल्प कार्यालय गाठून आपला संताप व्यक्त केला.यावर्षीच्या खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बहुतांश शेतीइटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भेगा पडलेल्या आहेत. काही ठिकाणी पाळ फुटलेली आहे. मात्र त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी शेवटच्या टोकापर्यंत कालव्याचे पाणी पोहोचत नाही. धरणापासून शेवटच्या टोकाला (टेल) आधी पाणी दिले गेले पाहिजे, असा नियम आहे. मात्र त्याला बगल देत  योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे वघाळापर्यंत पाणी पोहोचतच नाही.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील उपकार्यकारी अभियंता हे शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी भेदभाव करतात, असा आरोप करत वघाळावासीयांनी पाण्याअभावी  मेलेल्या धानाचे तणीस घेऊन आरमोरी येथील इटियाडोहचे कार्यालय गाठले. कासवी येथील उपसरपंच प्रवीण राहाटे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठाण मांडले. धान पिकाची स्थिती जाणून घेण्यासाठी देसाईगंज येथील उपकार्यकारी अभियंता मेंढे यांना राहाटे यांनी दुचाकीवर बसवून शेतकऱ्यांच्या बांधावर नेले. यावेळी मेलेल्या  धान पिकाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली.यावेळी वघाळाचे सरपंच मिथुन प्रधान, विभागीय प्रकल्प अध्यक्ष नामदेव सोरते, सुरेश दोनाडकर, धनराज दोनाडकर, सुधाकर अलोने, रामकृष्ण धोटे, रमेश आठवले, विजय मुर्वतकार, जगन माकडे, शालू सपाटे, सतीश दोनाडकर, संतोष प्रधान, रुपेश राहाटे, अविनाश दोनाडकर यांच्यासह  माेठ्या संख्येने शेतकरी हजर हाेते.

आता पाणी नको, नुकसानभरपाईच द्या-    शेतकऱ्यांनी इटियाडोह प्रकल्पाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आमच्या उभ्या धानपिकाचे तणीस झाले, त्यामुळे आता पाणी नको, नुकसानभरपाईच द्या, अशी मागणी त्यांनी रेटून धरली. शेतकऱ्यांच्या या मागणीची पाटबंधारे विभागाकडून कितपत दखल घेतली जाते आणि काेणता तोडगा काढला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२० ते २५ टक्केच पाणी मिळालेइटियाडोह धरणाचे ४० टक्के पाणी गडचिरोली जिल्ह्याला देण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. यावर्षी प्रत्यक्षात २० ते २५ टक्केच पाणी जिल्ह्याला देण्यात आले. त्यामुळे वघाळा येथील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धानाचा घास इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेने हिरावून घेतल्या गेला. शेतकऱ्यांनी वारंवार पाण्याची मागणी करूनही वघाळा गावाला एकदाही पाणी मिळाले नाही. त्यामुळे वघाळा गावातील शेतकऱ्यांचे धान पिके नष्ट होऊन तणीस झाले आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीItiadoh Projectइटियाडोह प्रकल्प