शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

626 हेक्टरमधील गर्भावस्थेत असलेल्या धानपिकाचे झाले तणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 05:00 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बहुतांश शेती इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भेगा पडलेल्या आहेत. काही ठिकाणी पाळ फुटलेली आहे. मात्र त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी शेवटच्या टोकापर्यंत कालव्याचे पाणी पोहोचत नाही. धरणापासून शेवटच्या टोकाला (टेल) आधी पाणी दिले गेले पाहिजे, असा नियम आहे. मात्र त्याला बगल देत  योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे वघाळापर्यंत पाणी पोहोचतच नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : पावसाने दडी मारल्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या धान पिकाला पाण्याची नितांत गरज होती. मात्र तालुक्यातील वघाळा येथील शेतकऱ्यांना इटियाडोह  धरणाचे पाणी लागू असताना त्यांच्या पिकाला पाणी मिळाले नाही. वारंवार पाण्याची मागणी करूनही इटियाडोह प्रकल्प कार्यालयाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गर्भार असलेल्या धानपिकाला वेळेवर पाणी न मिळाल्याने या गावातील तब्बल ६२६ हेक्टर धनपिक करपून ते तणसात रुपांतरीत होत आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आरमोरी येथील प्रकल्प कार्यालय गाठून आपला संताप व्यक्त केला.यावर्षीच्या खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बहुतांश शेतीइटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भेगा पडलेल्या आहेत. काही ठिकाणी पाळ फुटलेली आहे. मात्र त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी शेवटच्या टोकापर्यंत कालव्याचे पाणी पोहोचत नाही. धरणापासून शेवटच्या टोकाला (टेल) आधी पाणी दिले गेले पाहिजे, असा नियम आहे. मात्र त्याला बगल देत  योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे वघाळापर्यंत पाणी पोहोचतच नाही.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील उपकार्यकारी अभियंता हे शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी भेदभाव करतात, असा आरोप करत वघाळावासीयांनी पाण्याअभावी  मेलेल्या धानाचे तणीस घेऊन आरमोरी येथील इटियाडोहचे कार्यालय गाठले. कासवी येथील उपसरपंच प्रवीण राहाटे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठाण मांडले. धान पिकाची स्थिती जाणून घेण्यासाठी देसाईगंज येथील उपकार्यकारी अभियंता मेंढे यांना राहाटे यांनी दुचाकीवर बसवून शेतकऱ्यांच्या बांधावर नेले. यावेळी मेलेल्या  धान पिकाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली.यावेळी वघाळाचे सरपंच मिथुन प्रधान, विभागीय प्रकल्प अध्यक्ष नामदेव सोरते, सुरेश दोनाडकर, धनराज दोनाडकर, सुधाकर अलोने, रामकृष्ण धोटे, रमेश आठवले, विजय मुर्वतकार, जगन माकडे, शालू सपाटे, सतीश दोनाडकर, संतोष प्रधान, रुपेश राहाटे, अविनाश दोनाडकर यांच्यासह  माेठ्या संख्येने शेतकरी हजर हाेते.

आता पाणी नको, नुकसानभरपाईच द्या-    शेतकऱ्यांनी इटियाडोह प्रकल्पाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आमच्या उभ्या धानपिकाचे तणीस झाले, त्यामुळे आता पाणी नको, नुकसानभरपाईच द्या, अशी मागणी त्यांनी रेटून धरली. शेतकऱ्यांच्या या मागणीची पाटबंधारे विभागाकडून कितपत दखल घेतली जाते आणि काेणता तोडगा काढला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२० ते २५ टक्केच पाणी मिळालेइटियाडोह धरणाचे ४० टक्के पाणी गडचिरोली जिल्ह्याला देण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. यावर्षी प्रत्यक्षात २० ते २५ टक्केच पाणी जिल्ह्याला देण्यात आले. त्यामुळे वघाळा येथील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धानाचा घास इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेने हिरावून घेतल्या गेला. शेतकऱ्यांनी वारंवार पाण्याची मागणी करूनही वघाळा गावाला एकदाही पाणी मिळाले नाही. त्यामुळे वघाळा गावातील शेतकऱ्यांचे धान पिके नष्ट होऊन तणीस झाले आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीItiadoh Projectइटियाडोह प्रकल्प