शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

चारही जागा स्वबळावर ताकदीने लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:11 IST

२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र चार वर्षाच्या सत्ताकाळात ही सारी आश्वासने फोल ठरली आहेत.

ठळक मुद्देगजानन किर्तीकर यांचा निर्धार : शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र चार वर्षाच्या सत्ताकाळात ही सारी आश्वासने फोल ठरली आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लोकांचा भ्रमनिराश झाला आहे. भाजपप्रती लोकांमध्ये रोष आहे. जिल्ह्यात शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभेच्या मिळून चारही जागा स्वबळावर पूर्ण ताकदनिशी लढविणार, असा निर्धार विदर्भ संपर्क प्रमुख तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केला.शिवसेना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक आरमोरी मार्गावरील संस्कृती सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, नागपूर जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, अहेरी जिल्हा प्रमुख विजय श्रुंगारपवार, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख छाया कुंभारे, संघटक अशोक धापोडकर, माजी जिल्हाध्यक्ष हरीष मने, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख डॉ. अश्विनी यादव, युवासेना जिल्हा प्रमुख चंदू बेहरे, शिवसेना शहर प्रमुख रामकिरीत यादव, उपजिल्हा प्रमुख राजू कावळे, भरत जोशी, वासुदेव शेडमाके, विलास ठोंबरे, राकेश बेलसरे, राजगोपाल सुल्वावार, सुवर्णसिंग डांगी, सत्यनारायण बुर्रावार, निलकमल मंडल, अनंत बेझलवार, डॉ. श्रीकांत बन्सोड आदी उपस्थित होते.पुढे बोलताना किर्तीकुमार म्हणाले, नोटाबंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी, आत्महत्या आदी समस्याने उग्ररूप धारण केला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे लोकांमध्येही भाजपप्रती रोष दिसून येत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गावागावात पक्ष संघटन मजबूत करून आगामी निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन केले.याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, डॉ. अश्विनी यादव, यांच्यासह इतर मान्यवरांनी शिवसैनिकांना संबोधित केले. मेळाव्याला तालुका प्रमुख नंदू चावला, कवडू सहारे, माणिक भोयर, गुणवंत जंबेवार, गुणवंत जंबेवार, अशोक गावतुरे, आशिष काळे, रोशन नंदनवार, संदीप दुधबळे, संजय आकरे, प्रशांत किलनाके, सुनंदा आतला, नवनाथ उके, नगरसेविका अनिता बोरकर, चित्रा गजभिये यांच्यासह बाराही तालुक्यातून तीन हजार शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होणार१९९५ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना हा सर्वात प्रबळ पक्ष होता. या पक्षाचे आमदार सुध्दा निवडून आले. याच कालावधीत आपण गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळले आहे. मध्यंतरीच्या काळात दुर्लक्ष झाल्याने पक्षाला थोडीफार मरगळ प्राप्त झाली. आता मात्र पुन्हा बुथ स्तरावरून बांधणी केली जाणार आहे. पूर्व विदर्भातील सहा लोकसभा व ३६ विधानसभा स्वतंत्र लढण्याची तयारी पक्षाने केली आहे. पक्षाच्या अंदाजानुसार यापैकी चार लोकसभा व २० विधानसभेच्या जागांवर मध्ये यश मिळेल. २०१४ मध्ये भाजपाचे वादळ होते. आता मात्र हे वादळ शमले आहे. त्यामुळे शिवसेनेला चांगली संधी आहे, असा विश्वास गजानन किर्तीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरShiv Senaशिवसेना