शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

चारही जागा स्वबळावर ताकदीने लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:11 IST

२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र चार वर्षाच्या सत्ताकाळात ही सारी आश्वासने फोल ठरली आहेत.

ठळक मुद्देगजानन किर्तीकर यांचा निर्धार : शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र चार वर्षाच्या सत्ताकाळात ही सारी आश्वासने फोल ठरली आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लोकांचा भ्रमनिराश झाला आहे. भाजपप्रती लोकांमध्ये रोष आहे. जिल्ह्यात शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभेच्या मिळून चारही जागा स्वबळावर पूर्ण ताकदनिशी लढविणार, असा निर्धार विदर्भ संपर्क प्रमुख तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केला.शिवसेना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक आरमोरी मार्गावरील संस्कृती सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, नागपूर जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, अहेरी जिल्हा प्रमुख विजय श्रुंगारपवार, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख छाया कुंभारे, संघटक अशोक धापोडकर, माजी जिल्हाध्यक्ष हरीष मने, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख डॉ. अश्विनी यादव, युवासेना जिल्हा प्रमुख चंदू बेहरे, शिवसेना शहर प्रमुख रामकिरीत यादव, उपजिल्हा प्रमुख राजू कावळे, भरत जोशी, वासुदेव शेडमाके, विलास ठोंबरे, राकेश बेलसरे, राजगोपाल सुल्वावार, सुवर्णसिंग डांगी, सत्यनारायण बुर्रावार, निलकमल मंडल, अनंत बेझलवार, डॉ. श्रीकांत बन्सोड आदी उपस्थित होते.पुढे बोलताना किर्तीकुमार म्हणाले, नोटाबंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी, आत्महत्या आदी समस्याने उग्ररूप धारण केला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे लोकांमध्येही भाजपप्रती रोष दिसून येत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गावागावात पक्ष संघटन मजबूत करून आगामी निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन केले.याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, डॉ. अश्विनी यादव, यांच्यासह इतर मान्यवरांनी शिवसैनिकांना संबोधित केले. मेळाव्याला तालुका प्रमुख नंदू चावला, कवडू सहारे, माणिक भोयर, गुणवंत जंबेवार, गुणवंत जंबेवार, अशोक गावतुरे, आशिष काळे, रोशन नंदनवार, संदीप दुधबळे, संजय आकरे, प्रशांत किलनाके, सुनंदा आतला, नवनाथ उके, नगरसेविका अनिता बोरकर, चित्रा गजभिये यांच्यासह बाराही तालुक्यातून तीन हजार शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होणार१९९५ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना हा सर्वात प्रबळ पक्ष होता. या पक्षाचे आमदार सुध्दा निवडून आले. याच कालावधीत आपण गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळले आहे. मध्यंतरीच्या काळात दुर्लक्ष झाल्याने पक्षाला थोडीफार मरगळ प्राप्त झाली. आता मात्र पुन्हा बुथ स्तरावरून बांधणी केली जाणार आहे. पूर्व विदर्भातील सहा लोकसभा व ३६ विधानसभा स्वतंत्र लढण्याची तयारी पक्षाने केली आहे. पक्षाच्या अंदाजानुसार यापैकी चार लोकसभा व २० विधानसभेच्या जागांवर मध्ये यश मिळेल. २०१४ मध्ये भाजपाचे वादळ होते. आता मात्र हे वादळ शमले आहे. त्यामुळे शिवसेनेला चांगली संधी आहे, असा विश्वास गजानन किर्तीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरShiv Senaशिवसेना