शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पऱ्हे करपण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 8, 2015 01:55 IST

मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली असल्याने धान पिकाचे पऱ्हे तसेच सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके करपायला लागली आहेत.

पावसाची २० दिवसांपासून दडी : बळीराजा हवालदिल; दुबार पेरणीची येणार पाळीगडचिरोली : मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली असल्याने धान पिकाचे पऱ्हे तसेच सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके करपायला लागली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पावसाळ्याला सुरूवात होताच चार दिवस पावसाने थैमान घातले होते. पाऊस निघून गेल्यानंतर पेरणीला जोर आला. १ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १० हजार हेक्टरवर पेरणी झाली असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र जवळपास पेरण्या आटोपल्या आहेत. ७ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ४४२.९१ एवढा पाऊस पडला आहे.मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. दिवसभर कडाक्याची ऊन पडत असल्याने जमिनीतील ओलावा नष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. परिणामी जमीन कडक होऊन धानाचे पऱ्हे करपायला सुरूवात झाली आहे. दुरून पऱ्हे हिरवेगार दिसत असले तरी कडक उन्हामुळे पाने गुंडाळण्यास सुरूवात झाली आहे. पुन्हा पाच ते सहा दिवस पाऊस न पडल्यास संपूर्ण पऱ्हे नष्ट होण्यास धोका निर्माण झाला आहे. हजारो रूपये किमतीचे बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. मात्र पावसाअभावी सदर पऱ्हे करपण्याचा धोका निर्माण झाला असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. (नगर प्रतिनिधी)अनुदानावर बियाणे उपलब्ध करादुबार पेरणीचे संकट कोसळल्यास शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. बँकांकडून कर्ज काढून बियाणे खरेदी केले आहे व शेतीची मशागतही केली आहे. जवळचे पैसे आता खर्च झाले आहेत. त्यामुळे पुन्हा बियाणे खरेदी करण्यासाठी कुठून पैसे आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे. रोवणी लांबणीवर जाणारसध्या टाकलेले पऱ्हे करपल्यास शेतकऱ्यांना दुबार पऱ्हे टाकावे लागणार आहेत. सदर नवीन पऱ्हे तयार होण्यासाठी आणखी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. परिणामी धानाची रोवणी लांबून धानाच्या उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. सिरोंचा तालुक्यात कापसाचे तर चामोर्शी तालुक्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी करतानाच रासायनिक खत टाकले जात असल्याने या दोन पिकाला पावसाची नितांत गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी पाणी देत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसमोर पीक करपताना बघितल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाही.विसापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर डोमाजी देशमुख यांनी नागपूर येथील एका खासगी कंपनीच्या धान वाणाच्या तीन बॅगची खरेदी गडचिरोली शहरातील एका कृषी केंद्रातून केली. परंतु खरेदी केलेल्या धानाच्या बिजाईमध्ये २५ ते ३० टक्के लांबोर व खडधान असल्याचे आढळून आलले आहे. यावरून कृषी केंद्रातून धानाच्या बिजाई बॅगमध्ये सर्रास भेसळ करून विक्री होत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर भेसळयुक्त बियाणे निघाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. कंपनीने या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणी ज्ञानेश्वर देशमुख या शेतकऱ्याने केली आहे.