शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

पऱ्हे करपण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 8, 2015 01:55 IST

मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली असल्याने धान पिकाचे पऱ्हे तसेच सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके करपायला लागली आहेत.

पावसाची २० दिवसांपासून दडी : बळीराजा हवालदिल; दुबार पेरणीची येणार पाळीगडचिरोली : मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली असल्याने धान पिकाचे पऱ्हे तसेच सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके करपायला लागली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पावसाळ्याला सुरूवात होताच चार दिवस पावसाने थैमान घातले होते. पाऊस निघून गेल्यानंतर पेरणीला जोर आला. १ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १० हजार हेक्टरवर पेरणी झाली असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र जवळपास पेरण्या आटोपल्या आहेत. ७ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ४४२.९१ एवढा पाऊस पडला आहे.मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. दिवसभर कडाक्याची ऊन पडत असल्याने जमिनीतील ओलावा नष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. परिणामी जमीन कडक होऊन धानाचे पऱ्हे करपायला सुरूवात झाली आहे. दुरून पऱ्हे हिरवेगार दिसत असले तरी कडक उन्हामुळे पाने गुंडाळण्यास सुरूवात झाली आहे. पुन्हा पाच ते सहा दिवस पाऊस न पडल्यास संपूर्ण पऱ्हे नष्ट होण्यास धोका निर्माण झाला आहे. हजारो रूपये किमतीचे बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. मात्र पावसाअभावी सदर पऱ्हे करपण्याचा धोका निर्माण झाला असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. (नगर प्रतिनिधी)अनुदानावर बियाणे उपलब्ध करादुबार पेरणीचे संकट कोसळल्यास शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. बँकांकडून कर्ज काढून बियाणे खरेदी केले आहे व शेतीची मशागतही केली आहे. जवळचे पैसे आता खर्च झाले आहेत. त्यामुळे पुन्हा बियाणे खरेदी करण्यासाठी कुठून पैसे आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे. रोवणी लांबणीवर जाणारसध्या टाकलेले पऱ्हे करपल्यास शेतकऱ्यांना दुबार पऱ्हे टाकावे लागणार आहेत. सदर नवीन पऱ्हे तयार होण्यासाठी आणखी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. परिणामी धानाची रोवणी लांबून धानाच्या उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. सिरोंचा तालुक्यात कापसाचे तर चामोर्शी तालुक्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी करतानाच रासायनिक खत टाकले जात असल्याने या दोन पिकाला पावसाची नितांत गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी पाणी देत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसमोर पीक करपताना बघितल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाही.विसापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर डोमाजी देशमुख यांनी नागपूर येथील एका खासगी कंपनीच्या धान वाणाच्या तीन बॅगची खरेदी गडचिरोली शहरातील एका कृषी केंद्रातून केली. परंतु खरेदी केलेल्या धानाच्या बिजाईमध्ये २५ ते ३० टक्के लांबोर व खडधान असल्याचे आढळून आलले आहे. यावरून कृषी केंद्रातून धानाच्या बिजाई बॅगमध्ये सर्रास भेसळ करून विक्री होत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर भेसळयुक्त बियाणे निघाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. कंपनीने या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणी ज्ञानेश्वर देशमुख या शेतकऱ्याने केली आहे.