शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

पऱ्हे करपण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 8, 2015 01:55 IST

मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली असल्याने धान पिकाचे पऱ्हे तसेच सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके करपायला लागली आहेत.

पावसाची २० दिवसांपासून दडी : बळीराजा हवालदिल; दुबार पेरणीची येणार पाळीगडचिरोली : मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली असल्याने धान पिकाचे पऱ्हे तसेच सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके करपायला लागली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पावसाळ्याला सुरूवात होताच चार दिवस पावसाने थैमान घातले होते. पाऊस निघून गेल्यानंतर पेरणीला जोर आला. १ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १० हजार हेक्टरवर पेरणी झाली असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र जवळपास पेरण्या आटोपल्या आहेत. ७ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ४४२.९१ एवढा पाऊस पडला आहे.मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. दिवसभर कडाक्याची ऊन पडत असल्याने जमिनीतील ओलावा नष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. परिणामी जमीन कडक होऊन धानाचे पऱ्हे करपायला सुरूवात झाली आहे. दुरून पऱ्हे हिरवेगार दिसत असले तरी कडक उन्हामुळे पाने गुंडाळण्यास सुरूवात झाली आहे. पुन्हा पाच ते सहा दिवस पाऊस न पडल्यास संपूर्ण पऱ्हे नष्ट होण्यास धोका निर्माण झाला आहे. हजारो रूपये किमतीचे बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. मात्र पावसाअभावी सदर पऱ्हे करपण्याचा धोका निर्माण झाला असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. (नगर प्रतिनिधी)अनुदानावर बियाणे उपलब्ध करादुबार पेरणीचे संकट कोसळल्यास शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. बँकांकडून कर्ज काढून बियाणे खरेदी केले आहे व शेतीची मशागतही केली आहे. जवळचे पैसे आता खर्च झाले आहेत. त्यामुळे पुन्हा बियाणे खरेदी करण्यासाठी कुठून पैसे आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे. रोवणी लांबणीवर जाणारसध्या टाकलेले पऱ्हे करपल्यास शेतकऱ्यांना दुबार पऱ्हे टाकावे लागणार आहेत. सदर नवीन पऱ्हे तयार होण्यासाठी आणखी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. परिणामी धानाची रोवणी लांबून धानाच्या उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. सिरोंचा तालुक्यात कापसाचे तर चामोर्शी तालुक्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी करतानाच रासायनिक खत टाकले जात असल्याने या दोन पिकाला पावसाची नितांत गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी पाणी देत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसमोर पीक करपताना बघितल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाही.विसापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर डोमाजी देशमुख यांनी नागपूर येथील एका खासगी कंपनीच्या धान वाणाच्या तीन बॅगची खरेदी गडचिरोली शहरातील एका कृषी केंद्रातून केली. परंतु खरेदी केलेल्या धानाच्या बिजाईमध्ये २५ ते ३० टक्के लांबोर व खडधान असल्याचे आढळून आलले आहे. यावरून कृषी केंद्रातून धानाच्या बिजाई बॅगमध्ये सर्रास भेसळ करून विक्री होत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर भेसळयुक्त बियाणे निघाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. कंपनीने या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणी ज्ञानेश्वर देशमुख या शेतकऱ्याने केली आहे.