शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

चामोर्शीत जलसंकटाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:13 IST

वाढत्या तापमानामुळे चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील जलसाठे कोरडे पडत आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या व विहिरींनी तळ गाठला असून तलावाच्या पाण्याला डबक्याचे स्वरूपात प्राप्त झाले आहे. परिणामी चामोर्शी तालुक्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाण्याची गंभीर समस्या । जलाशयात १० टक्के साठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : वाढत्या तापमानामुळे चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील जलसाठे कोरडे पडत आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या व विहिरींनी तळ गाठला असून तलावाच्या पाण्याला डबक्याचे स्वरूपात प्राप्त झाले आहे. परिणामी चामोर्शी तालुक्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.चामोर्शी तालुक्यात एकूण १ लाख ६३ हजार ४१४ इतकी लोकसंख्या असून ७५ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायती अंतर्गत १८० गावे व ४२ टोल्यांचा समावेश आहे. जलस्त्रोताचा विचार केला असता, शासकीय विहिरींची संख्या ७९३ व खासगी विहिरींची संख्या २ हजार ३२० आहे. हातपंपाची संख्या १ हजार ७३७ इतकी आहे. यापैकी पंचायत समितीच्या वतीने १ हजार १६७ हातपंपाची दुरूस्ती करण्यात आली आहे. तर ग्रामपंचायत मार्फत ५७० हातपंपाची दुरूस्ती झाली आहे. विद्युतपंप दोन असून सौरऊर्जेवरील दुहेरी नळ पाणी पुरवठा योजना जवळपास ४४ आहे. सिंचन उपविभागांतर्गत असलेल्या दिना जलाशयात सध्या जलसाठा निरंक असून कुनघाडा येथील लघु पाटबंधारे विभागाच्या तलावात १९.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर अनखोडा, घोट, तळोधी येथील मामा तलाव कोरडे पडले आहेत. मे अखेरपासून तापमानात आणखी वाढ होणार असल्याने पाणी पातळी खालावणार आहे. परिणामी चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागात पाणी समस्या तीव्र होणार आहे.जनावरांसाठीही पाण्याचा दुष्काळचामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा, विठ्ठलपूर येथील तलावातही पाणीसाठा शिल्लक नाही. नागरिकांसाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे. तसेच पाळीव जनावरांसाठीही पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाळीव जनावरांसाठी तहाण कशी भागवावी, असा प्रश्न चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे. पाणी समस्या तीव्र होत असल्याने अनेक पशुपालक आपले जनावरे विकण्यासाठी तयारही झाले आहेत. जनावरांपेक्षा ट्रॅक्टरचा वापर करण्यावर शेतकरी भर देत आहेत. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई