शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
4
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
5
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
6
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
7
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
8
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
9
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
10
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
11
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
12
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
13
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
14
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
15
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
16
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
17
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
18
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
19
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
20
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी

चामोर्शीत जलसंकटाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:13 IST

वाढत्या तापमानामुळे चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील जलसाठे कोरडे पडत आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या व विहिरींनी तळ गाठला असून तलावाच्या पाण्याला डबक्याचे स्वरूपात प्राप्त झाले आहे. परिणामी चामोर्शी तालुक्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाण्याची गंभीर समस्या । जलाशयात १० टक्के साठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : वाढत्या तापमानामुळे चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील जलसाठे कोरडे पडत आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या व विहिरींनी तळ गाठला असून तलावाच्या पाण्याला डबक्याचे स्वरूपात प्राप्त झाले आहे. परिणामी चामोर्शी तालुक्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.चामोर्शी तालुक्यात एकूण १ लाख ६३ हजार ४१४ इतकी लोकसंख्या असून ७५ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायती अंतर्गत १८० गावे व ४२ टोल्यांचा समावेश आहे. जलस्त्रोताचा विचार केला असता, शासकीय विहिरींची संख्या ७९३ व खासगी विहिरींची संख्या २ हजार ३२० आहे. हातपंपाची संख्या १ हजार ७३७ इतकी आहे. यापैकी पंचायत समितीच्या वतीने १ हजार १६७ हातपंपाची दुरूस्ती करण्यात आली आहे. तर ग्रामपंचायत मार्फत ५७० हातपंपाची दुरूस्ती झाली आहे. विद्युतपंप दोन असून सौरऊर्जेवरील दुहेरी नळ पाणी पुरवठा योजना जवळपास ४४ आहे. सिंचन उपविभागांतर्गत असलेल्या दिना जलाशयात सध्या जलसाठा निरंक असून कुनघाडा येथील लघु पाटबंधारे विभागाच्या तलावात १९.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर अनखोडा, घोट, तळोधी येथील मामा तलाव कोरडे पडले आहेत. मे अखेरपासून तापमानात आणखी वाढ होणार असल्याने पाणी पातळी खालावणार आहे. परिणामी चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागात पाणी समस्या तीव्र होणार आहे.जनावरांसाठीही पाण्याचा दुष्काळचामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा, विठ्ठलपूर येथील तलावातही पाणीसाठा शिल्लक नाही. नागरिकांसाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे. तसेच पाळीव जनावरांसाठीही पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाळीव जनावरांसाठी तहाण कशी भागवावी, असा प्रश्न चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे. पाणी समस्या तीव्र होत असल्याने अनेक पशुपालक आपले जनावरे विकण्यासाठी तयारही झाले आहेत. जनावरांपेक्षा ट्रॅक्टरचा वापर करण्यावर शेतकरी भर देत आहेत. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई