शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

अतिदुर्गम गुरेकसातील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कटेझरी येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावाबाहेर असणाऱ्या विहिरीवर सबमर्सिबल पंप बसवून विहिरीचे पाणी पाईपलाईनद्वारे गावात आणण्यासाठी उंच ठिकाणी पाण्याच्या दोन टाक्या बसविण्याचा निर्णय घेतला. त्यातून पाईपद्वारे ग्रामस्थांच्या घरासमोर पाणी पुरवठा करण्याची सोय केली.

ठळक मुद्देपोलिसांकडून थेट पाईपलाईन : कटेझरीच्या उपक्रमाची पुनरावृत्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उपविभाग धानोराअंतर्गत पोलीस मदत केंद्र कटेझरीच्या हद्दीतील अतिदुर्गम, अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या मौजा गुरेकसा येथील महिलांना पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत होती. जीवघेण्या पायपीटीबरोबरच गावाच्या बाहेर असलेल्या ५० फूट खोल विहिरीतून पाणी काढताना महिलांची दमछाक होत असे. गडचिरोली पोलीस दलाच्या कटेझरी येथील प्रभारी अधिकारी व जवानांना सदर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी महिलांची ही पायपीट थांबवण्यासाठी गावाबाहेर असणाºया विहिरीवर सबमर्सिबल पंप बसवून तेथून पाणी पाईपलाईनद्वारे थेट गावात आणले.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कटेझरी येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावाबाहेर असणाऱ्या विहिरीवर सबमर्सिबल पंप बसवून विहिरीचे पाणी पाईपलाईनद्वारे गावात आणण्यासाठी उंच ठिकाणी पाण्याच्या दोन टाक्या बसविण्याचा निर्णय घेतला. त्यातून पाईपद्वारे ग्रामस्थांच्या घरासमोर पाणी पुरवठा करण्याची सोय केली. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा, मौजा गरेकसा येथील बोअरवेल नादुरुस्त असल्याने शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. सदर नादुरुस्त बोअरवेल गडचिरोली पोलीस दलाने दुरुस्त केल्याने बोअरवेलच्या माध्यमातून या शाळेत पाणी पुरवठा सुरळीत सुरु झाला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कटेझरी येथील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबवत मौजा कटेझरी येथील घरापर्यत पाणी पोहचविण्याची व्यवस्था केली होती. आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गुरेकसा येथील महिलांची पायपीट थांबविल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे.ग्रामस्थांनी मानले पोलीस दलाचे आभारमौजा गुरेकसा येथील महिला दारात नळाद्वारे आलेले स्वच्छ पाणी पाहून हरखून गेल्या. आपल्याला स्वप्नातही अशा पद्धतीने घरापर्यंत पाणी येईल असे वाटले नव्हते. पण पोलीस दलामुळे हे शक्य झाल्याचे सांगून त्यांचे आभार व्यक्त केले.या उपक्रमासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोमके कटेझरी येथील प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :Waterपाणी