शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:08 IST

आष्टी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. मात्र या योजनेतून आष्टी शहरवासीयांना पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा योजनेतून दोन नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही काम अपूर्ण आहे.

ठळक मुद्देआष्टी येथील योजना : चार वर्ष उलटले; १ कोटी ९८ लाखांचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. मात्र या योजनेतून आष्टी शहरवासीयांना पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा योजनेतून दोन नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही काम अपूर्ण आहे.आष्टी येथे वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ९८ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला. या योजनेतून पाणीपुरवठा योजनेच्या बांधकामाचे काम सुरू करण्यात आले. चार वर्ष उलटूनही सदर काम अपूर्ण आहे. परिणामी आष्टी शहरात काही ठिकाणी अद्यापही पाणी पोहोचले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना इतरत्र भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत २०१४-१५ मध्ये १ कोटी ९८ लाख रूपयांचा प्रस्ताव वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाला पाठविण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. त्यानंतर कंत्राटदाराने काम सुरू केले. पाण्याची टाकी बांधून पूर्ण झाली. अर्ध्या गावात पाईपलाईनचेही काम पूर्ण झाले. त्यानंतर मात्र कंत्राटदाराने सहा महिन्यांपासून काम बंद ठेवले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कंत्राटदाराला आतापर्यंत १ कोटी २५ लाख रूपये देण्यात आले आहे. मात्र उर्वरित काम बंद असल्याने भर उन्हाळ्यात पाण्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून कंत्राटदारास काम पूर्ण करण्याबाबत निर्देशित करावे व पाणीपुरवठा लवकर सुरू करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.पाणीटंचाईची समस्या तीव्र होणारआष्टी शहरात पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन चार वर्षांपूर्वी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. परंतु केवळ टाक्यांचे बांधकाम व पाईपलाईन टाकण्याचे काम करून अर्धवटस्थितीत काम कंत्राटदाराने सोडले. पूर्वीच गावातील अनेक भागात नळ योजना पोहोचली नव्हती. आता नळ योजनेची पाईपलाईन पोहोचली आहे. परंतु काम अर्धवट असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होणार आहे.