शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:08 IST

आष्टी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. मात्र या योजनेतून आष्टी शहरवासीयांना पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा योजनेतून दोन नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही काम अपूर्ण आहे.

ठळक मुद्देआष्टी येथील योजना : चार वर्ष उलटले; १ कोटी ९८ लाखांचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. मात्र या योजनेतून आष्टी शहरवासीयांना पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा योजनेतून दोन नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही काम अपूर्ण आहे.आष्टी येथे वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ९८ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला. या योजनेतून पाणीपुरवठा योजनेच्या बांधकामाचे काम सुरू करण्यात आले. चार वर्ष उलटूनही सदर काम अपूर्ण आहे. परिणामी आष्टी शहरात काही ठिकाणी अद्यापही पाणी पोहोचले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना इतरत्र भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत २०१४-१५ मध्ये १ कोटी ९८ लाख रूपयांचा प्रस्ताव वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाला पाठविण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. त्यानंतर कंत्राटदाराने काम सुरू केले. पाण्याची टाकी बांधून पूर्ण झाली. अर्ध्या गावात पाईपलाईनचेही काम पूर्ण झाले. त्यानंतर मात्र कंत्राटदाराने सहा महिन्यांपासून काम बंद ठेवले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कंत्राटदाराला आतापर्यंत १ कोटी २५ लाख रूपये देण्यात आले आहे. मात्र उर्वरित काम बंद असल्याने भर उन्हाळ्यात पाण्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून कंत्राटदारास काम पूर्ण करण्याबाबत निर्देशित करावे व पाणीपुरवठा लवकर सुरू करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.पाणीटंचाईची समस्या तीव्र होणारआष्टी शहरात पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन चार वर्षांपूर्वी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. परंतु केवळ टाक्यांचे बांधकाम व पाईपलाईन टाकण्याचे काम करून अर्धवटस्थितीत काम कंत्राटदाराने सोडले. पूर्वीच गावातील अनेक भागात नळ योजना पोहोचली नव्हती. आता नळ योजनेची पाईपलाईन पोहोचली आहे. परंतु काम अर्धवट असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होणार आहे.