शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बैलबंडीद्वारे ड्रमातून होत आहे पाणी पुरवठा

By admin | Updated: April 20, 2016 01:41 IST

देसाईगंज तालुक्यातील मोहटोला-किन्हाळा भागातील गाढवी नदीसह तलाव, बोड्या कोरड्या पडल्याने या भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील मोहटोला-किन्हाळा भागातील गाढवी नदीसह तलाव, बोड्या कोरड्या पडल्याने या भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी मोहटोला व किन्हाळा या गावातील नागरिकांना बैलबंडीद्वारे ड्रमातून मोटारपंपवरून गावात पाणी आणावे लागत आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनासह साऱ्याच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. देसाईगंज तालुका हा प्रगत समजला जातो. तालुक्याच्या गाढवी नदीच्या अलिकडील भागात इटिया डोह धरणाचे पाणी येत असते. मात्र यंदा सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्याने देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे. यापूर्वी इटिया डोह धरणाच्या पाण्यामुळे संपूर्ण देसाईगंज तालुक्यात पाण्याची मुबलक व्यवस्था होत असून या भागातील विहीर व हातपंपाची पाण्याची पातळी चांगली राहत होती.मात्र यंदा एप्रिल महिन्यात तालुक्यातील सर्व जलस्त्रोतांनी तळ गाठल्यामुळे मे महिन्यात पाणी संकट तीव्र होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. गाढवी नदीच्या पलिकडील भागातील शिवराजपूर, फरी, मोहटोला, विहीरगाव, डोंगरगाव (हलबी), पोटगाव या गावालगतचे तलाव पूर्णत: कोरडे पडले आहे. डिसेंबर महिन्यातच या भागातील तलावातील पाणीसाठा अत्यल्प शिल्लक होता. याचा परिणाम गावातील विहीर व हातपंप स्त्रोतावर झाला. भिषण पाणी टंचाईचा सर्वात जास्त त्रास या भागातील महिलांना होत आहे. अनेक नागरिक बैलबंडीवर पाण्याचे ड्रम मांडून आपल्या पाळीव जनावरांसाठी तसेच आंघोळीसाठी शेतकऱ्यांच्या पंपावरून पाणी आणत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. बहुतांश महिला कपडे धुण्यासाठी कृषी पंपाच्या पाण्याचा आधार घेत आहे. मोहटोला-किन्हाळा भागातील काही ग्रामपंचायतींनी कुपनलिकेवर पंप बसवून त्यातील पाणी विहिरीत सोडून गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा केली आहे. एप्रिल महिन्यात इतकी भिषण परिस्थिती असताना मे महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे कुपनलिकेतील पाण्याची पातळी प्रचंड खालावण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)