शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चार गावांतील पाणीपुरवठा योजना प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:35 IST

भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील पाणीपुरवठा याेजना विविध कारणांमुळे बंद असल्याने परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना ...

भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील पाणीपुरवठा याेजना विविध कारणांमुळे बंद असल्याने परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भेंडाळा परिसरातील लखमापूर बोरी, सगणापूर, नवेगाव माल, कान्होली गावातील पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्याने या गावातील नागरिक पाण्यासाठी धावपळ करीत आहेत. लखमापूर बोरी येथील पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल न भरल्याने गावातील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिक भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. ग्रामपंचायतकडून पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत बिलाचा भरणा करण्याकरिता १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ७२ हजार रुपयांचा धनादेश महावितरण कंपनीस देण्यात आला होता. परंतु, ग्रामपंचायतच्या बँकेतील खात्यामध्ये रक्कम नसल्याने महावितरण कंपनीला धनादेश परत करण्यात आला. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लखमापूर बोरी येथील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. नवेगाव माल येथील हनुमान मंदिराजवळ असलेला हातपंप गेल्या चार- पाच दिवसांपासून बंद आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने तसे पंचायत समितीस्तरावर कळविले. परंतु, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या भागात राहणारे नागरिक पाण्यासाठी धावपळ करीत आहेत. सगणापूर गावातील पाणीपुरवठा योजना विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गेल्या चार दिवसांपासून प्रभावित झाली आहे. गावातील नळ कनेक्शन धारकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाप्रति तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. या गावातील दुकानाशेजारी असलेल्या हातपंपावर पाण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. येथील पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

बाॅक्स

कान्हाेलीतील नळयाेजना १० वर्षांपासून बंद

कान्होली गावात दहा वर्षांपूर्वी जलकुंभ व पाणीपुरवठा विहीर बांधकाम करण्यात आले. त्यामुळे गावातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या. मात्र, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अल्पावधीतच ही पाणीपुरवठा योजना बंद झाली. मात्र, बंद झालेल्या पाणीपुरवठा योजनेकडे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने योजना गेल्या दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. येथील जलकुंभ पांढरा हत्ती ठरत आहे.

गावागावांतील पाणीपुरवठा योजना प्रभावित व नादुरुस्त हातपंप यामुळे महिलांना पाण्यासाठी अडचण येत आहे. भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्याने पाण्याचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.