शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

चार गावांतील पाणीपुरवठा योजना प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:35 IST

भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील पाणीपुरवठा याेजना विविध कारणांमुळे बंद असल्याने परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना ...

भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील पाणीपुरवठा याेजना विविध कारणांमुळे बंद असल्याने परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भेंडाळा परिसरातील लखमापूर बोरी, सगणापूर, नवेगाव माल, कान्होली गावातील पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्याने या गावातील नागरिक पाण्यासाठी धावपळ करीत आहेत. लखमापूर बोरी येथील पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल न भरल्याने गावातील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिक भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. ग्रामपंचायतकडून पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत बिलाचा भरणा करण्याकरिता १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ७२ हजार रुपयांचा धनादेश महावितरण कंपनीस देण्यात आला होता. परंतु, ग्रामपंचायतच्या बँकेतील खात्यामध्ये रक्कम नसल्याने महावितरण कंपनीला धनादेश परत करण्यात आला. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लखमापूर बोरी येथील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. नवेगाव माल येथील हनुमान मंदिराजवळ असलेला हातपंप गेल्या चार- पाच दिवसांपासून बंद आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने तसे पंचायत समितीस्तरावर कळविले. परंतु, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या भागात राहणारे नागरिक पाण्यासाठी धावपळ करीत आहेत. सगणापूर गावातील पाणीपुरवठा योजना विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गेल्या चार दिवसांपासून प्रभावित झाली आहे. गावातील नळ कनेक्शन धारकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाप्रति तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. या गावातील दुकानाशेजारी असलेल्या हातपंपावर पाण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. येथील पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

बाॅक्स

कान्हाेलीतील नळयाेजना १० वर्षांपासून बंद

कान्होली गावात दहा वर्षांपूर्वी जलकुंभ व पाणीपुरवठा विहीर बांधकाम करण्यात आले. त्यामुळे गावातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या. मात्र, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अल्पावधीतच ही पाणीपुरवठा योजना बंद झाली. मात्र, बंद झालेल्या पाणीपुरवठा योजनेकडे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने योजना गेल्या दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. येथील जलकुंभ पांढरा हत्ती ठरत आहे.

गावागावांतील पाणीपुरवठा योजना प्रभावित व नादुरुस्त हातपंप यामुळे महिलांना पाण्यासाठी अडचण येत आहे. भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्याने पाण्याचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.