शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

चार गावांतील पाणीपुरवठा योजना प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:35 IST

भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील पाणीपुरवठा याेजना विविध कारणांमुळे बंद असल्याने परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना ...

भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील पाणीपुरवठा याेजना विविध कारणांमुळे बंद असल्याने परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भेंडाळा परिसरातील लखमापूर बोरी, सगणापूर, नवेगाव माल, कान्होली गावातील पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्याने या गावातील नागरिक पाण्यासाठी धावपळ करीत आहेत. लखमापूर बोरी येथील पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल न भरल्याने गावातील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिक भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. ग्रामपंचायतकडून पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत बिलाचा भरणा करण्याकरिता १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ७२ हजार रुपयांचा धनादेश महावितरण कंपनीस देण्यात आला होता. परंतु, ग्रामपंचायतच्या बँकेतील खात्यामध्ये रक्कम नसल्याने महावितरण कंपनीला धनादेश परत करण्यात आला. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लखमापूर बोरी येथील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. नवेगाव माल येथील हनुमान मंदिराजवळ असलेला हातपंप गेल्या चार- पाच दिवसांपासून बंद आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने तसे पंचायत समितीस्तरावर कळविले. परंतु, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या भागात राहणारे नागरिक पाण्यासाठी धावपळ करीत आहेत. सगणापूर गावातील पाणीपुरवठा योजना विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गेल्या चार दिवसांपासून प्रभावित झाली आहे. गावातील नळ कनेक्शन धारकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाप्रति तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. या गावातील दुकानाशेजारी असलेल्या हातपंपावर पाण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. येथील पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

बाॅक्स

कान्हाेलीतील नळयाेजना १० वर्षांपासून बंद

कान्होली गावात दहा वर्षांपूर्वी जलकुंभ व पाणीपुरवठा विहीर बांधकाम करण्यात आले. त्यामुळे गावातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या. मात्र, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अल्पावधीतच ही पाणीपुरवठा योजना बंद झाली. मात्र, बंद झालेल्या पाणीपुरवठा योजनेकडे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने योजना गेल्या दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. येथील जलकुंभ पांढरा हत्ती ठरत आहे.

गावागावांतील पाणीपुरवठा योजना प्रभावित व नादुरुस्त हातपंप यामुळे महिलांना पाण्यासाठी अडचण येत आहे. भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्याने पाण्याचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.