शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

दहा दिवसांपासून भेंडाळातील पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:37 IST

भेंडाळा : चामाेर्शी पंचायत समितीअंतर्गत भेंडाळा येथील नळ पाणीपुरवठा याेजनेच्या माेटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने गेल्या १० दिवसांपासून गावात नळ ...

भेंडाळा : चामाेर्शी पंचायत समितीअंतर्गत भेंडाळा येथील नळ पाणीपुरवठा याेजनेच्या माेटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने गेल्या १० दिवसांपासून गावात नळ पाणीपुरवठा पूर्णत: ठप्प आहे. परिणामी गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ याेजनेची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयावर घागर माेर्चा काढणार, असा इशारा महिलांनी दिला आहे.

वाघोली येथील नदी घाटावरील इन्वेल टाकीवर बसवलेली मोटार वर आली आणि पाणी तळाशी गेले. त्यामुळे भेंडाळा गावाला पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीवर महिलांचा घागर मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा या गावाची लोकसंख्या जवळपास तीन हजार आहे. भेंडाळा गावापासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ३५ ते ४० वर्षांपूर्वी गावालगत एका शेतात विहीर खोदून ५० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा नळयोजना कार्यान्वित करण्यात आली होती. कालांतराने गावातील वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन साधारणतः सहा ते सात वर्षांपूर्वी वाघोली येथील वैनगंगा नदीवर दुसरी वाढीव पाणीपुरवठा योजना ४० हजार लीटर क्षमतेची सुरू करण्यात आली. त्यामुळे एकंदरीत ९० हजार लीटर क्षमतेच्या दोन नळयोजनांच्या टाक्या अस्तित्वात असूनदेखील गावांतील लोक ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर तहानलेलेच असल्याचे चित्र दिसत आहे. वाघोली येथील नदी घाटावर भेंडाळा पाणीपुरवठा योजनेची इन्वेल टाकी तयार केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून टाकीवर असलेली मोटार वर आली व टाकीतील पाणी तळाशी गेल्यामुळे पाइपद्वारे पुरेशा प्रमाणात पाणी बाहेर निघू शकत नाही. त्यामुळे भेंडाळा येथील पाणीपुरवठा मागील काही महिन्यांपासून दहा दिवसांआड पाणी गावकऱ्यांना मिळत आहे. कधी-कधी दहा दिवसांनंतरही पाणी मिळत नाही. अशी स्थिती भेंडाळा गावाची झाली आहे. या गावामध्ये घरोघरी नळ योजना असूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावाला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ठोस अशा उपाययोजनेची आवश्यकता आहे. परंतु ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आराेप ग्रामस्थांकडून हाेत आहे. गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यास ग्रामपंचायत प्रशासन उदासीन दिसत आहे. या गावात पाण्याची समस्या गेल्या ५० वर्षांपासून सुटलेली नाही. तरी या परिसरातल्या लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. येत्या आठवडाभरात गावातील नळ पाणीपुरवठ्याची समस्या मार्गी न लागल्यास ग्रामपंचायत भेंडाळा व पंचायत समिती चामाेर्शी पं.स. कार्यालयावर महिलांचा घागर माेर्चा काढूू, असा इशारा पं.स. सदस्य धर्मशीला सहारे यांनी दिला आहे.