शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
4
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
5
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
6
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
7
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
8
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
9
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
10
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
11
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
12
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
13
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
14
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
15
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
16
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
17
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
18
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
19
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
20
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

गडचिराेलीमध्ये पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 05:00 IST

नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास सात जलकुंभ उभारण्यात आले आहेत. दाेन ठिकाणी नवीन जलकुंभ झाले आहेत. वाॅर्डावाॅर्डांत पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. वैनगंगा नदीवरील बाेरमाळा घाटावर पालिका प्रशासनाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. नदीच्या विहिरीतून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून शहरभरातील जलकुंभांमध्ये पाणीपुरवठा केला जाताे. येथून पाईपलाईनद्वारे नळधारकांना सकाळी व सायंकाळच्या सुमारास पाणी दिले जाते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळ पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून गडचिराेली शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. मात्र एप्रिल महिन्यापासूनच पालिकेची पाणी याेजना प्रभावित झाली आहे. वैनगंगा नदीची पाणीपातळी खालावल्याने आत्तापासूनच गडचिराेली शहरात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले  आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास सात जलकुंभ उभारण्यात आले आहेत. दाेन ठिकाणी नवीन जलकुंभ झाले आहेत. वाॅर्डावाॅर्डांत पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. वैनगंगा नदीवरील बाेरमाळा घाटावर पालिका प्रशासनाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. नदीच्या विहिरीतून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून शहरभरातील जलकुंभांमध्ये पाणीपुरवठा केला जाताे. येथून पाईपलाईनद्वारे नळधारकांना सकाळी व सायंकाळच्या सुमारास पाणी दिले जाते. दरवर्षी शहरात एप्रिल महिना लागला की, वाढत्या उष्णतामानामुळे पाण्याचे प्रमाण कमी हाेते. दरम्यान केवळ २० ते २५ मिनिटे नळाद्वारे पाणीपुरवठा हाेते. केवळ काही सखल भाग साेडला तर बऱ्याच वाॅर्डांत एप्रिल, मे व जून महिन्यांत अल्प पाणीपुरवठा हाेताे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान अनेकदा चामाेर्शी मार्गावरील पाईपलाईन फुटून नळ पाणीपुरवठा प्रभावित झाला हाेता. त्या वेळी नळधारकांनी विहीर व बाेअरचा आधार घेतला. 

चार दिवस गाेकुलनगरातील पाणीपुरवठा बंदचामाेर्शी मार्गावरील ४५० एमएस रायझिंग मेन पाईपलाईन शिफ्टिंगचे काम ४ व ५ मे राेजी करण्यात आले. त्या वेळी शहरातील पाणीपुरवठा दाेन दिवस बंद राहणार असल्याचे न. प. प्रशासनाने जाहीर केले हाेते. मात्र गाेकुलनगर व माता मंदिर परिसरातील नळ पाणीपुरवठा तब्बल चार ते पाच दिवस बंद हाेता. माता मंदिर परिसरात १० मे राेजी मंगळवारला सायंकाळच्या सुमारास नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. परिणामी या भागातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला.

एकच वेळ हाेताे पाणीपुरवठा-    उन्हाळ्यामध्ये पाण्याची अधिकाधिक गरज भासते. त्याचा वापरही वाढत असताे. मात्र पाणीटंचाईमुळे पुरेसे पाणी मिळत नाही. आता गेल्या आठ दिवसांपासून गाेकुलनगर, माता मंदिर परिसर व शहरातील बऱ्याच वाॅर्डांत केवळ २० ते २५ मिनिटे दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत गडचिराेली शहरात पाणी संकट पुन्हा तीव्र हाेणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.

 

टॅग्स :water shortageपाणीकपात