शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

गडचिराेलीमध्ये पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 05:00 IST

नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास सात जलकुंभ उभारण्यात आले आहेत. दाेन ठिकाणी नवीन जलकुंभ झाले आहेत. वाॅर्डावाॅर्डांत पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. वैनगंगा नदीवरील बाेरमाळा घाटावर पालिका प्रशासनाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. नदीच्या विहिरीतून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून शहरभरातील जलकुंभांमध्ये पाणीपुरवठा केला जाताे. येथून पाईपलाईनद्वारे नळधारकांना सकाळी व सायंकाळच्या सुमारास पाणी दिले जाते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळ पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून गडचिराेली शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. मात्र एप्रिल महिन्यापासूनच पालिकेची पाणी याेजना प्रभावित झाली आहे. वैनगंगा नदीची पाणीपातळी खालावल्याने आत्तापासूनच गडचिराेली शहरात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले  आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास सात जलकुंभ उभारण्यात आले आहेत. दाेन ठिकाणी नवीन जलकुंभ झाले आहेत. वाॅर्डावाॅर्डांत पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. वैनगंगा नदीवरील बाेरमाळा घाटावर पालिका प्रशासनाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. नदीच्या विहिरीतून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून शहरभरातील जलकुंभांमध्ये पाणीपुरवठा केला जाताे. येथून पाईपलाईनद्वारे नळधारकांना सकाळी व सायंकाळच्या सुमारास पाणी दिले जाते. दरवर्षी शहरात एप्रिल महिना लागला की, वाढत्या उष्णतामानामुळे पाण्याचे प्रमाण कमी हाेते. दरम्यान केवळ २० ते २५ मिनिटे नळाद्वारे पाणीपुरवठा हाेते. केवळ काही सखल भाग साेडला तर बऱ्याच वाॅर्डांत एप्रिल, मे व जून महिन्यांत अल्प पाणीपुरवठा हाेताे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान अनेकदा चामाेर्शी मार्गावरील पाईपलाईन फुटून नळ पाणीपुरवठा प्रभावित झाला हाेता. त्या वेळी नळधारकांनी विहीर व बाेअरचा आधार घेतला. 

चार दिवस गाेकुलनगरातील पाणीपुरवठा बंदचामाेर्शी मार्गावरील ४५० एमएस रायझिंग मेन पाईपलाईन शिफ्टिंगचे काम ४ व ५ मे राेजी करण्यात आले. त्या वेळी शहरातील पाणीपुरवठा दाेन दिवस बंद राहणार असल्याचे न. प. प्रशासनाने जाहीर केले हाेते. मात्र गाेकुलनगर व माता मंदिर परिसरातील नळ पाणीपुरवठा तब्बल चार ते पाच दिवस बंद हाेता. माता मंदिर परिसरात १० मे राेजी मंगळवारला सायंकाळच्या सुमारास नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. परिणामी या भागातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला.

एकच वेळ हाेताे पाणीपुरवठा-    उन्हाळ्यामध्ये पाण्याची अधिकाधिक गरज भासते. त्याचा वापरही वाढत असताे. मात्र पाणीटंचाईमुळे पुरेसे पाणी मिळत नाही. आता गेल्या आठ दिवसांपासून गाेकुलनगर, माता मंदिर परिसर व शहरातील बऱ्याच वाॅर्डांत केवळ २० ते २५ मिनिटे दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत गडचिराेली शहरात पाणी संकट पुन्हा तीव्र हाेणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.

 

टॅग्स :water shortageपाणीकपात